शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

खारघरमध्ये ‘लोकमत’चे जलमित्र अभियान

By admin | Updated: May 26, 2016 02:57 IST

गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी पाऊस पडल्याने धरणात जलसाठा मर्यादित राहिला आहे, त्यामुळे टंचाईग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक सामाजिक संस्था व

कळंबोली : गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी पाऊस पडल्याने धरणात जलसाठा मर्यादित राहिला आहे, त्यामुळे टंचाईग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक सामाजिक संस्था व शासनाकडून पाणीबचतीचा संदेश देण्यात येत आहेत. त्याचबरोबर ‘लोकमत’ने सुध्दा जलमित्र अभियान हाती घेतले असून या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. बुधवारी खारघर येथील नामांकित थ्री स्टार हॉटेलमध्ये हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी ग्राहकांचे पाणी बचतीविषयी प्रबोधन केले.लोकमत वृत्त समूह सातत्याने सामाजिक विषय हाती घेवून लोकांमध्ये जनजागृती करत आहे. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात पाणीटंचाई त्याचबरोबर दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. असे असतानाही शहरात बहुतांशी ठिकाणी पाण्याचा अपव्यय केला जात आहे. गरजेपेक्षा जास्त पाण्याचा वापर करून नासाडी केली जात आहे. विशेष करून हॉटेलमध्ये पाण्याचा अपव्यय करण्यात येत आहे. अर्धा ग्लास पाणी हवे असेल तर त्याकरिता संपूर्ण ग्लास पाणी घेवून त्याचा अपव्यय केला जात असल्याचे स्पष्ट झाल्याने ‘लोकमत’ने विशेष करून हॉटेलमध्ये जलमित्र अभियान हाती घेतले आहे. त्यानुसार बुधवारी सायन-पनवेल महामार्गालगत हिरानंदानी संकुलात असलेल्या थ्री स्टार या हॉटेलमध्ये हे अभियान राबविण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पाटील, थ्री स्टारचे व्यवस्थापक रितेश सिन्हा, मयूर हरळकर, विश्वनाथ शेट्टी, जुबेर खान उपस्थित होते.सुरुवातीला हॉटेलमध्ये सेवा पुरविणाऱ्या वेटरना बोलावून पाण्याचा अपव्यय टाळण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्याचरोबर ग्राहकांबरोबर सुध्दा संवाद साधून पाणीबचतीचा संदेश देण्यात आला. मी मूळचा नांदेड म्हणजे मराठवाड्यातील असून पाण्याचे महत्त्व काय आहे याची जाणीव मला आहे. कारण या ठिकाणी सातत्याने दुष्काळ पडतो. शालेय जीवनात आम्ही पहाटे उठून दूर जावून बैलगाडीतून पाणी आणत होतो आणि तेच पुरवून पुरवून वापर करत असल्याचे प्रकाश निलेवाड यांनी सांगितले. पाण्याअभावी पैनगंगा धबधबा बंद पडल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. पाणीबचतीबाबत ‘लोकमत’ने जे जलमित्र अभियान हाती घेतले त्याबद्दल निलेवाड यांनी कौतुक करीत शुभेच्छा दिल्या. थ्री स्टारचे व्यवस्थापक रितेश सिन्हा यांनी पाणीबचतीबाबत ‘लोकमत’ने घातलेली साद अतिशय योग्य असल्याचे सांगितले. त्यानुसार आम्ही आगामी काळात पाण्याचा अपव्यय करणार नाही अशी ग्वाही देवून वेटर आणि ग्राहकांमध्ये जागृती करणार असल्याचेही सांगितले. (वार्ताहर) पत्रकाद्वारे प्रबोधनथ्री स्टार हॉटेलमध्ये ग्राहक आणि वेटर यांना जलमित्र अभियानांतर्गत मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर हॉटेलमध्ये भिंतीवर माहिती पत्रक लावण्यात आले. त्याचबरोबर वॉश बेसिन आणि टेबलवर जलबचतीची माहिती देणारे माहिती पत्रक ठेवण्यात आले. हे पत्रक सगळ्यांचे लक्ष आकर्षित करून घेत होते. टेबलवर पिवून उरलेले ग्लासातील पाणी एका भांड्यामध्ये संचय करण्यात आले.