शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
2
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
3
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे
4
“रमी प्रकरणाची सखोल चौकशी आवश्यक, पण माणिकराव कोकाटे...”; सुनील तटकरे स्पष्टच बोलले
5
उत्तर प्रदेशवाले काय करतील याचा नेम नाही! बनावट दूतावास उभारले, ४४ लाखांसह राजनैतिक वाहने जप्त; नेमकं प्रकरण काय?
6
"उत्तर गाझा विलीन करणार, तेथे ज्यूंना वसवणार अन् पॅलेस्टिनींना...!" असा आहे इस्रायलचा 'खतरनाक' इरादा!
7
आधी iPhone ला खेळणं म्हटलं! हळू हळू ढासळत गेलं Blackberry चं साम्राज्य; वाचा पतनाची संपूर्ण कहाणी
8
सुरज चव्हाण अखेर सापडला; छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी घेतलं ताब्यात
9
सोन्या-चांदीच्या दरात जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा खिशाला किती कात्री लागणार, काय आहेत नवे दर?
10
निवडणूक आयोगाने सुरू केली उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तयारी; लवकरच तारीख जाहीर होणार
11
"ट्रम्प २५ वेळा युद्ध थांबवल्याचे म्हणाले, पण PM मोदी एकदाही...;" शस्त्रसंधीवरून राहुल गांधींनी सरकारला घेरले
12
गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: दीप पूजनाचे महत्त्व काय? वाचा, भारतीय संस्कारांचे महात्म्य
13
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
14
देवेंद्र फडणवीसांसाठी आम्ही बाजीप्रभुंसारखं लढायला तयार; गोपीचंद पडळकर काय बोलले?
15
"मी खूप सुंदर आणि तू..."; लग्नानंतर नवऱ्याने कष्टाने बायकोला शिकवलं, आता तिनेच दिली धमकी
16
गणेशोत्सव मंडळांच्या मोठ्या मूर्तीचे विसर्जन समुद्रात करणार; सरकारचे कोर्टात प्रतिज्ञापत्र
17
शाहीद कपूरचा 'छत्रपती शिवाजी महाराज' सिनेमा बंद पडला, दिग्दर्शकाने सिस्टीमला ठरवलं 'क्रूर'
18
दौंडच्या कलाकेंद्रात गोळीबार झाल्याची चर्चा; पोलिसांनी चौकशीअंती दावा फेटाळला, पण राजकारणाला वेग आला!
19
एक फोन कॉल, ज्येष्ठ मंत्र्यांशी वाद अन् तयार झाली जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याची स्क्रिप्ट?
20
लाच घेताना व्हिडीओ बनवायला सुरुवात केली, मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न; मुंबईतील ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल

खारघरमध्ये ‘लोकमत’चे जलमित्र अभियान

By admin | Updated: May 26, 2016 02:57 IST

गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी पाऊस पडल्याने धरणात जलसाठा मर्यादित राहिला आहे, त्यामुळे टंचाईग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक सामाजिक संस्था व

कळंबोली : गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी पाऊस पडल्याने धरणात जलसाठा मर्यादित राहिला आहे, त्यामुळे टंचाईग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक सामाजिक संस्था व शासनाकडून पाणीबचतीचा संदेश देण्यात येत आहेत. त्याचबरोबर ‘लोकमत’ने सुध्दा जलमित्र अभियान हाती घेतले असून या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. बुधवारी खारघर येथील नामांकित थ्री स्टार हॉटेलमध्ये हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी ग्राहकांचे पाणी बचतीविषयी प्रबोधन केले.लोकमत वृत्त समूह सातत्याने सामाजिक विषय हाती घेवून लोकांमध्ये जनजागृती करत आहे. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात पाणीटंचाई त्याचबरोबर दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. असे असतानाही शहरात बहुतांशी ठिकाणी पाण्याचा अपव्यय केला जात आहे. गरजेपेक्षा जास्त पाण्याचा वापर करून नासाडी केली जात आहे. विशेष करून हॉटेलमध्ये पाण्याचा अपव्यय करण्यात येत आहे. अर्धा ग्लास पाणी हवे असेल तर त्याकरिता संपूर्ण ग्लास पाणी घेवून त्याचा अपव्यय केला जात असल्याचे स्पष्ट झाल्याने ‘लोकमत’ने विशेष करून हॉटेलमध्ये जलमित्र अभियान हाती घेतले आहे. त्यानुसार बुधवारी सायन-पनवेल महामार्गालगत हिरानंदानी संकुलात असलेल्या थ्री स्टार या हॉटेलमध्ये हे अभियान राबविण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पाटील, थ्री स्टारचे व्यवस्थापक रितेश सिन्हा, मयूर हरळकर, विश्वनाथ शेट्टी, जुबेर खान उपस्थित होते.सुरुवातीला हॉटेलमध्ये सेवा पुरविणाऱ्या वेटरना बोलावून पाण्याचा अपव्यय टाळण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्याचरोबर ग्राहकांबरोबर सुध्दा संवाद साधून पाणीबचतीचा संदेश देण्यात आला. मी मूळचा नांदेड म्हणजे मराठवाड्यातील असून पाण्याचे महत्त्व काय आहे याची जाणीव मला आहे. कारण या ठिकाणी सातत्याने दुष्काळ पडतो. शालेय जीवनात आम्ही पहाटे उठून दूर जावून बैलगाडीतून पाणी आणत होतो आणि तेच पुरवून पुरवून वापर करत असल्याचे प्रकाश निलेवाड यांनी सांगितले. पाण्याअभावी पैनगंगा धबधबा बंद पडल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. पाणीबचतीबाबत ‘लोकमत’ने जे जलमित्र अभियान हाती घेतले त्याबद्दल निलेवाड यांनी कौतुक करीत शुभेच्छा दिल्या. थ्री स्टारचे व्यवस्थापक रितेश सिन्हा यांनी पाणीबचतीबाबत ‘लोकमत’ने घातलेली साद अतिशय योग्य असल्याचे सांगितले. त्यानुसार आम्ही आगामी काळात पाण्याचा अपव्यय करणार नाही अशी ग्वाही देवून वेटर आणि ग्राहकांमध्ये जागृती करणार असल्याचेही सांगितले. (वार्ताहर) पत्रकाद्वारे प्रबोधनथ्री स्टार हॉटेलमध्ये ग्राहक आणि वेटर यांना जलमित्र अभियानांतर्गत मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर हॉटेलमध्ये भिंतीवर माहिती पत्रक लावण्यात आले. त्याचबरोबर वॉश बेसिन आणि टेबलवर जलबचतीची माहिती देणारे माहिती पत्रक ठेवण्यात आले. हे पत्रक सगळ्यांचे लक्ष आकर्षित करून घेत होते. टेबलवर पिवून उरलेले ग्लासातील पाणी एका भांड्यामध्ये संचय करण्यात आले.