शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

वीजवाहिनीमुळे जीवाला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 02:47 IST

महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे घणसोली परिसरातील पाच गावांतील नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे.

नवी मुंबई : महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे घणसोली परिसरातील पाच गावांतील नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. रविवारी पावसामुळे रस्त्यावरील उघड्या केबल्समधून धूर येऊ लागल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली होती.पावसाळा सुरू झाल्यापासून परिसरातील विजेचा लपंडाव सुरूच आहे. गावातील केबलच्या माध्यमातून इंटरनेट वापर करणाऱ्या लोकांना आणि महापालिका, नागरी आरोग्य केंद्र, टपाल कार्यालय, व्यावसायिक, रु ग्णालये, दुकानदार, तसेच डॉक्टर, वकील तसेच शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. त्यातच पाण्याचे मोटार पंप बंद असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी अतोनात हाल होत आहेत. हा वीज महावितरण कंपनीचा खेळखंडोबा त्वरित न थांबल्यास ग्रामस्थ महावितरणच्या ऐरोली कार्यालयाला धडक देतील, असा इशारा देण्यात आला आहे. नवी मुंबई महापालिकेच्या वतीने कोट्यवधी रु पये खर्चून नवी मुंबईत भूमिगत केबल्स टाकलेल्या आहेत. त्यापैकी घणसोली एफ विभाग परिसरात आतापर्यंत या परिसरात ९0 टक्के विद्युत तारा भूमिगत करण्याचे काम पूर्ण झाले असून, १0 टक्के तारा ओव्हरहेड खांबावरून आल्यामुळे या तारा तुटण्याच्या प्रकारात वाढ होत आहे.भूमिगत करण्यात आलेल्या मोठमोठ्या उच्च दाबाचा विद्युत पुरवठा करणाºया केबल्स आता थेट बाहेर दिसत असल्यामुळे रस्त्यावरून चालताना किंवा वाहने नेताना याच उघड्या केबल्सवरून न्यावे लागत आहे. घणसोली गावात चिंचआळी येथे गोविंद पाटील चाळीसमोर तर रस्त्यावर उच्च दाब असलेल्या ओव्हरहेड उघड्या तारा जमिनीपासून केवळ तीन ते चार फूट उंचीपर्यंत लोंबकळत असल्याने या उघड्या तारांचा शॉक लागून मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची दाट शक्यता असल्याने महावितरण कंपनीने या प्रकरणी गंभीर दखल घेऊन तारांची समस्या त्वरित दूर करावी, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने महावितरणकडे करण्यात आली आहे.