शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

वीजवाहिनीमुळे जीवाला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 02:47 IST

महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे घणसोली परिसरातील पाच गावांतील नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे.

नवी मुंबई : महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे घणसोली परिसरातील पाच गावांतील नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. रविवारी पावसामुळे रस्त्यावरील उघड्या केबल्समधून धूर येऊ लागल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली होती.पावसाळा सुरू झाल्यापासून परिसरातील विजेचा लपंडाव सुरूच आहे. गावातील केबलच्या माध्यमातून इंटरनेट वापर करणाऱ्या लोकांना आणि महापालिका, नागरी आरोग्य केंद्र, टपाल कार्यालय, व्यावसायिक, रु ग्णालये, दुकानदार, तसेच डॉक्टर, वकील तसेच शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. त्यातच पाण्याचे मोटार पंप बंद असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी अतोनात हाल होत आहेत. हा वीज महावितरण कंपनीचा खेळखंडोबा त्वरित न थांबल्यास ग्रामस्थ महावितरणच्या ऐरोली कार्यालयाला धडक देतील, असा इशारा देण्यात आला आहे. नवी मुंबई महापालिकेच्या वतीने कोट्यवधी रु पये खर्चून नवी मुंबईत भूमिगत केबल्स टाकलेल्या आहेत. त्यापैकी घणसोली एफ विभाग परिसरात आतापर्यंत या परिसरात ९0 टक्के विद्युत तारा भूमिगत करण्याचे काम पूर्ण झाले असून, १0 टक्के तारा ओव्हरहेड खांबावरून आल्यामुळे या तारा तुटण्याच्या प्रकारात वाढ होत आहे.भूमिगत करण्यात आलेल्या मोठमोठ्या उच्च दाबाचा विद्युत पुरवठा करणाºया केबल्स आता थेट बाहेर दिसत असल्यामुळे रस्त्यावरून चालताना किंवा वाहने नेताना याच उघड्या केबल्सवरून न्यावे लागत आहे. घणसोली गावात चिंचआळी येथे गोविंद पाटील चाळीसमोर तर रस्त्यावर उच्च दाब असलेल्या ओव्हरहेड उघड्या तारा जमिनीपासून केवळ तीन ते चार फूट उंचीपर्यंत लोंबकळत असल्याने या उघड्या तारांचा शॉक लागून मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची दाट शक्यता असल्याने महावितरण कंपनीने या प्रकरणी गंभीर दखल घेऊन तारांची समस्या त्वरित दूर करावी, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने महावितरणकडे करण्यात आली आहे.