शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

नियम तोडणाऱ्यांचा परवाना रद्द

By admin | Updated: January 7, 2016 01:02 IST

वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाऱ्या व इतर नियम तोडणारांचा वाहन चालविण्याचा परवाना रद्द करण्यात येणार आहे. वाहतूक पोलीस व आरटीओने संयुक्त मोहीम राबवून धडक कारवाई

नवी मुंबई : वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाऱ्या व इतर नियम तोडणारांचा वाहन चालविण्याचा परवाना रद्द करण्यात येणार आहे. वाहतूक पोलीस व आरटीओने संयुक्त मोहीम राबवून धडक कारवाई सुरू केली असून, अनेकांना परवाना रद्द करण्यासाठीची नोटीस दिली आहे. नवी मुंबईमध्ये वाहनचालकांमध्ये बेशिस्तपणा वाढत आहे. नो पार्किंगमध्ये वाहने उभी करणे, वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे, मोटारसायकल चालविताना हेल्मेटचा वापर न करणारांचे प्रमाण वाढत आहे. वाहतूक पोलीस नियमितपणे कारवाई करतात. परंतु २०० रुपयांचा दंड भरून पुन्हा चालक नियम तोडत असल्याचे निदर्शनास येऊ लागले होते. यामुळे आरटीओ व वाहतूक पोलिसांनी नियम तोडणारांविरोधात कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. सानपाडा रेल्वे स्टेशनसमोर संयुक्त मोहीम राबविण्यात आली. मोटारसायकल चालविताना मोबाइलवर बोलणाऱ्या चालकांची लायसन्स ताब्यात घेतले आहे. संबंधितांना मोटार वाहतूक कायदा १९८८ चे कलम १९ (१) अंतर्गत नोटीस देण्यात आली आहे. संबंधित व्यक्तीने उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे स्वत: उपस्थित राहून लासन्स रद्द का करू नये, यासाठीचे स्पष्टीकरण देणे बंधनकारक आहे. सुनावणीसाठी उपस्थित राहिले नाहीत तर लायसन्स कायमस्वरूपी रद्द केले जाणार आहे. वाहतुकीचे नियम हे कारवाईसाठी नाही तर सुरक्षिततेसाठी आहेत. नागरिकांनी स्वत:च्या व इतरांच्या सुरक्षिततेसाठी नियमांचे पालन केले पाहिजे. याविषयी वारंवार जनजागृती करून व दंडात्मक कारवाई केल्यानंतरही वाहनचालक नियम तोडत आहेत. वाहन चालविताना मोबाइलवर बोलल्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढत आहे. यामुळेच पोलिसांनी कडक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. यापुढे नागरिकांनी नियम पाळले नाहीत तर त्यांचा परवानाच रद्द केला जाणार आहे. यामुळे चालकांनी तंतोतंत नियमांचे पालन करावे, असे आवाहन उपप्रादेशिक अधिकारी संजय धायगुडे यांनी केले आहे. कारवाई केलेल्या काही चालकांना त्यांनी स्वत: लायसन्स रद्द करण्यासाठीची नोटीस दिली आहे. ही कारवाई नियमितपणे सुरूच ठेवली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)