शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
4
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
5
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
6
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
7
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
8
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
9
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
10
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
11
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
12
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
13
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
14
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
15
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
16
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
17
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
18
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
19
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
20
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...

राहत्या जागेवर कायदेशीर हक्क

By admin | Updated: February 16, 2017 02:15 IST

महाराष्ट्र कूळवहिवाट व शेतजमीन अधिनियमांतर्गत राज्याच्या महसूल व वन विभागाने ४ जानेवारी २०१७ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार

अलिबाग : महाराष्ट्र कूळवहिवाट व शेतजमीन अधिनियमांतर्गत राज्याच्या महसूल व वन विभागाने ४ जानेवारी २०१७ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, आता आदिवासी दलितांसह सर्व जातीय शेतमजूर, कुळांना व ग्रामीण कारागिरांना यामुळे राहत्या जागेवर कायदेशीर हक्क मिळणार आहे, त्यांना आता बेदखल करता येणार नाही, अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी दिली आहे.जानेवारी २०१७ रोजी महाराष्ट्र शासनाने ही महत्त्वाची अधिसूचना जारी केली आहे. सर्व भूमिहीन शेतमजूर, कुळे, ग्रामीण कारागीर, म्हणजेच बारा बलुतेदार जे खासगी जमिनीवर राहत आहेत, बहुतेक ठिकाणी ते जमीनदार, पूर्वीचे खोत यांच्या जमिनीवर राहत आले आहेत, ते आता राहत्या जागेचे मालक होणार आहेत. त्यांनी आपापल्या राहत्या जागेसंबंधी तहसील कचेरीत पुराव्यासह अर्ज करणे आवश्यक आहे. ३१ मार्चपर्यंत सध्या मुदत आहे. संपूर्ण महाराष्ट्राला ही अधिसूचना लागू असल्याचे महाजन यांनी सांगितले. हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. जो कूळ कायद्याच्या कलम १७ ब या तरतुदीचा भाग आहे. जी अधिसूचना पूर्वीच निघायला हवी होती; पण आता संघटनेने सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले आहे. या प्रश्नाकडे राज्यपालांचे लक्ष वेधल्यानंतर त्यांनी दिलेल्या आदेशानुसार शासनाने एक समिती गठित केली. या समितीत उल्का महाजन आणि सुरेखा दळवी यांचा समावेश होता.या समितीने शासनाला केलेल्या शिफारशी शासनाने स्वीकारल्या व हा निर्णय ४ जानेवारीला करण्यात आला आहे. आदिवासी दलितांसह सर्व जातीय शेतमजूर, कुळांना व ग्रामीण कारागिरांना यामुळे राहत्या जागेवर कायदेशीर हक्क मिळणार आहे, त्यांना आता बेदखल करता येणार नाही. ही माहिती खेडोपाडी पोहोचणे आवश्यक असल्याचे महाजन यांनी सांगितले.