शहरं
Join us  
Trending Stories
1
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
2
या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अ‍ॅक्शनमोडवर
3
अतूट नातं! "पतीची सेवा करणं हेच..."; पाठीवर घेऊन पत्नीने पूर्ण केली १५० किमीची कावड यात्रा
4
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
5
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
6
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
7
'गुगल अन् मेटा'च्या अडचणी वाढणार! ईडीने पाठवली नोटीस, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशीसाठी बोलावले
8
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
9
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
10
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
11
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
12
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
13
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
14
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
15
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
16
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
17
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
18
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
19
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
20
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले

राहत्या जागेवर कायदेशीर हक्क

By admin | Updated: February 16, 2017 02:15 IST

महाराष्ट्र कूळवहिवाट व शेतजमीन अधिनियमांतर्गत राज्याच्या महसूल व वन विभागाने ४ जानेवारी २०१७ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार

अलिबाग : महाराष्ट्र कूळवहिवाट व शेतजमीन अधिनियमांतर्गत राज्याच्या महसूल व वन विभागाने ४ जानेवारी २०१७ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, आता आदिवासी दलितांसह सर्व जातीय शेतमजूर, कुळांना व ग्रामीण कारागिरांना यामुळे राहत्या जागेवर कायदेशीर हक्क मिळणार आहे, त्यांना आता बेदखल करता येणार नाही, अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी दिली आहे.जानेवारी २०१७ रोजी महाराष्ट्र शासनाने ही महत्त्वाची अधिसूचना जारी केली आहे. सर्व भूमिहीन शेतमजूर, कुळे, ग्रामीण कारागीर, म्हणजेच बारा बलुतेदार जे खासगी जमिनीवर राहत आहेत, बहुतेक ठिकाणी ते जमीनदार, पूर्वीचे खोत यांच्या जमिनीवर राहत आले आहेत, ते आता राहत्या जागेचे मालक होणार आहेत. त्यांनी आपापल्या राहत्या जागेसंबंधी तहसील कचेरीत पुराव्यासह अर्ज करणे आवश्यक आहे. ३१ मार्चपर्यंत सध्या मुदत आहे. संपूर्ण महाराष्ट्राला ही अधिसूचना लागू असल्याचे महाजन यांनी सांगितले. हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. जो कूळ कायद्याच्या कलम १७ ब या तरतुदीचा भाग आहे. जी अधिसूचना पूर्वीच निघायला हवी होती; पण आता संघटनेने सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले आहे. या प्रश्नाकडे राज्यपालांचे लक्ष वेधल्यानंतर त्यांनी दिलेल्या आदेशानुसार शासनाने एक समिती गठित केली. या समितीत उल्का महाजन आणि सुरेखा दळवी यांचा समावेश होता.या समितीने शासनाला केलेल्या शिफारशी शासनाने स्वीकारल्या व हा निर्णय ४ जानेवारीला करण्यात आला आहे. आदिवासी दलितांसह सर्व जातीय शेतमजूर, कुळांना व ग्रामीण कारागिरांना यामुळे राहत्या जागेवर कायदेशीर हक्क मिळणार आहे, त्यांना आता बेदखल करता येणार नाही. ही माहिती खेडोपाडी पोहोचणे आवश्यक असल्याचे महाजन यांनी सांगितले.