शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका शाळेतील तरणतलावाचा शुभारंभ

By admin | Updated: May 9, 2016 02:36 IST

स्मार्ट सिटीकडे झेप घेणाऱ्या नवी मुंबई नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळाही स्मार्ट होत असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जाणार आहे.

नवी मुंबई : स्मार्ट सिटीकडे झेप घेणाऱ्या नवी मुंबई नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळाही स्मार्ट होत असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जाणार आहे. रबालेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील महापालिकेच्या राजर्षी शाहू महाराज विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी राज्यातील पहिला तरणतलाव सुरू करण्यात आला आहे. झोपडपट्टी वसाहतीमधील विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत असून, या विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच क्रीडाक्षेत्रातही उंची गाठता यावी याकरिता विविध उपक्रम राबविले जातात. या तरण तलावाच्या शुभारंभ प्रसंगी एलिफंटा ते गेटवे आॅफ इंडिया अंतर पार केलेल्या वेदांत सावंत आणि राज पाटील या जलतरणपटूूंनी विद्यार्थ्यांना पोहण्याचे धडे दिले. महापौर सुधाकर सोनवणे यांच्या प्रभागातील या शाळेत उद्यान, प्रशस्त वर्ग, मुलांसाठी विविध खेळणी तसेच खेळाचे प्रशिक्षण आदी विकासकामेही करण्यात आली आहे. या शाळेत बालवाडीमध्ये ३०० विद्यार्थी शिक्षण घेत असून इतर महापालिका शाळांपेक्षा या शाळेची पटसंख्या जास्त आहे. मराठी माध्यमात ३००० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तर हिंदी माध्यमात २०००हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहे. या शाळेतून चांगले जलतरणपटी घडविण्याकरिता तरणतलावाचा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. २० बाय ४० च्या या तरण तलावांभोवती संरक्षण जाळी लावण्यात आली आहे. अनसया चॅरिटेबल ट्रस्ट आणि लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या या तरण तलावात विद्यार्थ्यांना जलतरणाचे धडे दिले जाणार असून, राज्य तसेच राष्ट्रीय पातळी जलतरणपटू या माध्यमातून तयार केले जाणार असल्याची माहिती महापौर सुधाकर सोनवणे यांनी दिली. ८० हजार लीटरची क्षमता असलेल्या या तरण तलावासाठी बोअरींगचे (बोअरवेल) पाणी वापरले जात असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले. उन्हाळ््याच्या सुटीमध्ये चार ते नऊ वयोगटातील कामगारांच्या मुलांना या ठिकाणी सकाळी प्रशिक्षण दिले जात असून शाळा सुरू झाल्यानंतर वर्गनिहाय या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. भरमसाठ फी आकारणाऱ्या खासगी संस्थांमध्ये नाव नोंदवून प्रशिक्षण घेण्याची ऐपत गरीबांकडे नसते. त्यामुळे त्यांच्या मुलांना तज्ज्ञांच्या देखरेखीखाली प्रशिक्षण दिले जाणार आहे. या परिसरात तीनही उद्यानांना बोअरवेलचे पाणी वापरले जाते. (प्रतिनिधी)