शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

बीपीएलची अंतिम यादी रखडली

By admin | Updated: January 4, 2016 02:46 IST

सरकारच्या दिरंगाईमुळे कल्याण- डोंबिवली महापालिका हद्दीतील दारिद्रयरेषेखालील कुटुंबांची अंतिम यादी गेल्या दहा वर्षांपासून प्रसिद्ध झालेली नाही.

मुरलीधर भवार ,  कल्याणसरकारच्या दिरंगाईमुळे कल्याण- डोंबिवली महापालिका हद्दीतील दारिद्रयरेषेखालील कुटुंबांची अंतिम यादी गेल्या दहा वर्षांपासून प्रसिद्ध झालेली नाही. यासंबधी महापालिका प्रशासनाकडे विचारणा केली असता, लवकरच यादी प्रसिद्ध केली जाईल. तिचे काम सुरू आहे, अशी सरकारी छापाची उत्तरे वेळोवेळी दिली जातात. त्यामुळे दारिद्रयरेषेखालील कुटुंबांना सरकारी योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागणार, असे दिसत आहे. सहायक प्रकल्प अधिकारी सारिका परदेशी यांनी सांगितले की, यादीला दिरंगाई नगरपरिषद संचालकांकडून झालेली आहे. त्यांच्याकडून मान्यता आल्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही. यादीसाठीचे सर्वेक्षण सुवर्ण जयंतीसाठी करण्यात आले होते. आता राष्ट्रीय नागरी उपजीविका ही योजना नव्याने आली आहे. त्यात ७५ टक्के अर्थसाहाय्य दारिद्रयरेषेखालील कुटंबांना केले जाणार आहे. २५ टक्के अर्थसाहाय्य अनुसूचित जाती-जमाती, अल्पसंख्याक, अपंग यांना केले जाणार आहे. महापालिका हद्दीत ६०० महिला बचत गट आहेत. त्यापैकी ३५० महिला बचत गट सक्रिय आहेत. राष्ट्रीयीकृत बँकांकडून सात टक्के व्याजदराने बचत गटांना कर्जपुरवठा केला जातो. त्यापैकी ३ टक्के रक्कम बँका परत करतात. प्रत्यक्षात हे कर्ज बचत गटांना ४ टक्के दराने पडते. २५ आॅगस्ट २०१४ पासून नव्या योजनेचे काम सुरू झाले आहे. महिला बचत गटासाठी १० सदस्य संख्येची अट असल्याने नव्याने ३० बचत गट स्थापन करण्यात आले आहेत. स्वयंरोजगारासाठी १८० अर्ज कर्जासाठी प्राप्त झालेले असून त्यापैकी ६५ प्रकरणे मंजूर झालेली आहेत. महिला बचत गटांसाठी ४२ प्रकरणे आली असून त्यापैकी १२ मंजूर झालेली आहेत. कर्जाची मर्यादा ही १० लाखांची असली तरी महिला बचत गट १० लाखांचा व्यवसाय उभारू शकत नाही. त्यामुळे अडीच ते तीन लाख रुपये कर्जाची मर्यादा आहे. बँकाही इतक्याच रकमेचे कर्ज मंजूर करतात. अनेक महिला बचत गटांत कलह निर्माण झाल्यावर त्याचा परिमाण कर्ज परतफेडीवर होतो. नव्या राष्ट्रीय नागरी उपजीविका योजनेसाठी दारिद्रयरेषेच्या यादीचा उपयोग होणार नाही. सरकारने आर्थिक जातनिहाय जनगणना केली आहे. या जनगणना यादीचा उपयोग केला जाणार आहे.