शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
2
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
3
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
4
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
5
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
6
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
7
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
8
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
9
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
10
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
11
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
12
MSRTC: ...तरच जेष्ठ नागरिकांना एसटी तिकिट दरात ५० टक्क्यांची सवलत, नियमात बदल!
13
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?
14
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
15
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
16
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
17
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
18
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
19
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
20
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!

पाच वर्षांत ६३२ विंधण विहिरींना लागले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 03:54 IST

दरवर्षी रायगड जिल्ह्यातील काही गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवते. त्यामुळे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून अशा गावांमध्ये विंधण विहिरी खोदल्या जातात

मयूर तांबडे पनवेल : दरवर्षी रायगड जिल्ह्यातील काही गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवते. त्यामुळे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून अशा गावांमध्ये विंधण विहिरी खोदल्या जातात. गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यातील गाव, पाड्यांमध्ये शेकडो विंधण विहिरी खोदल्या गेल्या आहेत. २०१२ ते १७ या पाच वर्षांत ६३२ विंधण विहिरी यशस्वी तर २२१ अयशस्वी झाल्या आहेत.एप्रिल-मे महिन्यात दरवर्षी रायगड जिल्ह्यात पाणीटंचाई जाणवते. शासकीय पातळीवर पाणीटंचाई दूर करण्यासाठी यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र, तरी देखील पाणीटंचाई कमी होत नसल्याचे दिसत आहे. गाव, आदिवासी वाडे, पाडे आदी ठिकाणी पाणीटंचाईच्या झळा पोहोचत आहेत. पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यामुळे २०० फुटांवर खोदण्यात येणाऱ्या विंधण विहिरी अयशस्वी होत आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून प्रत्येक तालुक्यातील संभाव्य टंचाईग्रस्त गावांच्या यादीसोबतच या टंचाईवर मात करण्यासाठी कृती आराखडा दरवर्षी तयार केला जातो. त्यानुसार मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांतील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन संभाव्य टंचाईग्रस्त गावांत विंधण विहिरी मंजूर केल्या जातात. या विंधण विहिरी मारण्यासाठी २०० फुटांची मर्यादा असते. मात्र, पाण्याची पातळी खाली गेलेली असल्याने यातील काही विंधण विहिरींना पाणी लागत नाही. त्यामुळे दुष्काळात तेरावा महिना अशी गत या टंचाईग्रस्त गाव-पाड्यांची होते.मार्च महिना उजाडला की जिल्ह्यातील काही गावे, पाडे यामध्ये पाणीटंचाई जाणवते. उन्हाचा पारा दिवसेंदिवस चढत असल्याने पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होते. पावसाळ्याच्या दिवसात पाणी अडवून ते जास्तीत जास्त जमिनीत जिरवले पाहिजे. जेणेकरून भविष्यात पुरेसा पाणीसाठा जमिनीत होईल व त्याचा टंचाईकाळात लाभ होईल. काही गावांमध्ये मार्चपासूनच पाण्याचा खडखडाट होत असल्याने तीव्र पाणीटंचाई निर्माण होते.