शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

‘गेल’ मोजतेय शेवटची घटका

By admin | Updated: January 7, 2016 00:54 IST

प्रकल्पांच्या नावावर शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन त्या तशाच तिष्ठत ठेवायच्या अथवा तेथे काही काळ प्रकल्प उभारुन कालांतराने तो प्रकल्पच बंद करायचा.

आविष्कार देसाई, अलिबागप्रकल्पांच्या नावावर शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन त्या तशाच तिष्ठत ठेवायच्या अथवा तेथे काही काळ प्रकल्प उभारुन कालांतराने तो प्रकल्पच बंद करायचा. जिल्ह्यातील हे विदारक चित्र आजही थांबलेले नाही. अलिबाग तालुक्यातील उसर येथील गेल इंडिया कंपनीच्या निमित्ताने अशी पुनरावृत्ती होऊ पाहत आहे. त्याचा फटका ७५० कामगारांसह हजारोच्या संख्येने स्थानिकांना मोठ्या प्रमाणात बसणार आहे. त्यामुळे स्थानिक काँग्रेसने त्याला कडाडून विरोध केला आहे.उसर येथील गेल कंपनीला नियमित होणारा गॅस पुरवठा हा उत्तरेकडील कंपन्यांना वळविण्यात आल्याने सुमारे साडेचार हजार कोटी रुपयांची कंपनी बंद पडण्याच्या मार्गावर आहे. १९९८ मध्ये सुरु झालेली कंपनी आता गॅस पुरवठ्याअभावी अखेरची घटका मोजत आहे. या कंपनीला गॅसचा पुरवठा पूर्ववत करावा, अन्यथा प्रकल्पग्रस्तांना एकरी एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई देऊन जमिनीही परत कराव्यात. यासाठी राज्य सरकारने वेळीच हस्तक्षेप करुन केंद्र सरकारला विनंती करावी, अशी मागणी करणारे निवेदन काँग्रेसचे अलिबाग तालुकाध्यक्ष अनंत गोंधळी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.८० च्या दशकात एमआयडीसी कायद्यानुसार उसर परिसरातील सुमारे ३३० एकर जमिनींचे संपादन केले होते. २४७ शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी प्रकल्पासाठी दिल्या होत्या. प्रकल्प आल्याने रोजगाराच्या संधी निर्माण होऊन तरुणांच्या हाताला काम मिळेल या आशेवर जमिनी दिल्या होत्या. याबाबत गेल इंडिया कंपनीचे अधिकारी हंसराज मेश्राम यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.