शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

‘गेल’ मोजतेय शेवटची घटका

By admin | Updated: January 7, 2016 00:54 IST

प्रकल्पांच्या नावावर शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन त्या तशाच तिष्ठत ठेवायच्या अथवा तेथे काही काळ प्रकल्प उभारुन कालांतराने तो प्रकल्पच बंद करायचा.

आविष्कार देसाई, अलिबागप्रकल्पांच्या नावावर शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन त्या तशाच तिष्ठत ठेवायच्या अथवा तेथे काही काळ प्रकल्प उभारुन कालांतराने तो प्रकल्पच बंद करायचा. जिल्ह्यातील हे विदारक चित्र आजही थांबलेले नाही. अलिबाग तालुक्यातील उसर येथील गेल इंडिया कंपनीच्या निमित्ताने अशी पुनरावृत्ती होऊ पाहत आहे. त्याचा फटका ७५० कामगारांसह हजारोच्या संख्येने स्थानिकांना मोठ्या प्रमाणात बसणार आहे. त्यामुळे स्थानिक काँग्रेसने त्याला कडाडून विरोध केला आहे.उसर येथील गेल कंपनीला नियमित होणारा गॅस पुरवठा हा उत्तरेकडील कंपन्यांना वळविण्यात आल्याने सुमारे साडेचार हजार कोटी रुपयांची कंपनी बंद पडण्याच्या मार्गावर आहे. १९९८ मध्ये सुरु झालेली कंपनी आता गॅस पुरवठ्याअभावी अखेरची घटका मोजत आहे. या कंपनीला गॅसचा पुरवठा पूर्ववत करावा, अन्यथा प्रकल्पग्रस्तांना एकरी एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई देऊन जमिनीही परत कराव्यात. यासाठी राज्य सरकारने वेळीच हस्तक्षेप करुन केंद्र सरकारला विनंती करावी, अशी मागणी करणारे निवेदन काँग्रेसचे अलिबाग तालुकाध्यक्ष अनंत गोंधळी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.८० च्या दशकात एमआयडीसी कायद्यानुसार उसर परिसरातील सुमारे ३३० एकर जमिनींचे संपादन केले होते. २४७ शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी प्रकल्पासाठी दिल्या होत्या. प्रकल्प आल्याने रोजगाराच्या संधी निर्माण होऊन तरुणांच्या हाताला काम मिळेल या आशेवर जमिनी दिल्या होत्या. याबाबत गेल इंडिया कंपनीचे अधिकारी हंसराज मेश्राम यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.