शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

एमआयडीसीच्या पाण्यात अळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 23:50 IST

नवी मुंबई शहरातील पावणे ते दिघा भागातील नागरिकांना एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जातो.

नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील पावणे ते दिघा भागातील नागरिकांना एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जातो. दिघा येथे या पाण्यात अळ्या आढळल्या आहेत, त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शनिवार, १ नोव्हेंबर रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत राष्ट्रवादीचे नगरसेवक नवीन गवते यांनी प्रशासनाला धारेवर धरत प्रशासनाचे दिघा भागात दुर्लक्ष असून, नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप त्यांनी केला.नवी मुंबई महापालिकेच्या मालकीच्या असलेल्या मोरबे धरणातू संपूर्ण शहराला पाणीपुरवठा केला जात नाही. पावणे ते दिघा भागात एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जातो. आठवड्यातून एक दिवस एमआयडीसीकडून पाणी बंद ठेवण्यात येते, तसेच त्यानंतर दोन-तीन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा केला जातो. दिघा भागात पाण्याचा साठा करून ठेवण्यासाठी उच्चस्तरीय आणि भूमिगत जलकुंभ नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शनिवारी या पाण्यात अळ्या आढळल्याने नागरिकांच्या आरोग्याचा मुद्दा ऐरणीवर आला असून, नागरिकांमध्ये घबराहट पसरली आहे. महापालिकेचे कार्यकारी अभियंता संजय देसाई यांनी महापे ते दिघा पाण्याच्या लाइनचे काम सुरू असून, आॅगस्टपर्यंत पूर्ण करण्याच्या अनुषंगाने नियोजन करण्यात आल्याचे सांगितले. एमआयडीसीकडून पुरवठा होणाऱ्या पाण्याची पाहणी करून पाण्याच्या लाइन स्वच्छ करण्याबाबत एमआयडीसीलाला सांगण्यात येईल. ओएस वनच्या भूखंडावर पाण्याच्या अनुषंगाने टाक्यादेखील बांधण्यात येणार असल्याचे सांगितले. शिवसेनेचे नगरसेवक द्वारकानाथ भोईर यांनी एमआयडीसी जरी पाणीपुरवठा करीत असली, तरी महापालिकेच्या अधिकाºयांनी याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे सांगत अधिकाºयांचे याकडे दुर्लक्ष झाले असल्याने नागरिकांच्या जीवाशी खेळ चालला असल्याचा आरोप त्यांनी केला. स्थायी समितीचे सभापती सुरेश कुलकर्णी यांनी पाण्याचे नमुने तपासण्यात यावेत, अधिकाºयांनी त्वरित त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करावी आणि असे प्रकार घडू नयेत, या दृष्टीने काळजी घेण्याचे आदेश प्रशासनाला दिले.