शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसीच्या पाण्यात अळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 23:50 IST

नवी मुंबई शहरातील पावणे ते दिघा भागातील नागरिकांना एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जातो.

नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील पावणे ते दिघा भागातील नागरिकांना एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जातो. दिघा येथे या पाण्यात अळ्या आढळल्या आहेत, त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शनिवार, १ नोव्हेंबर रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत राष्ट्रवादीचे नगरसेवक नवीन गवते यांनी प्रशासनाला धारेवर धरत प्रशासनाचे दिघा भागात दुर्लक्ष असून, नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप त्यांनी केला.नवी मुंबई महापालिकेच्या मालकीच्या असलेल्या मोरबे धरणातू संपूर्ण शहराला पाणीपुरवठा केला जात नाही. पावणे ते दिघा भागात एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जातो. आठवड्यातून एक दिवस एमआयडीसीकडून पाणी बंद ठेवण्यात येते, तसेच त्यानंतर दोन-तीन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा केला जातो. दिघा भागात पाण्याचा साठा करून ठेवण्यासाठी उच्चस्तरीय आणि भूमिगत जलकुंभ नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शनिवारी या पाण्यात अळ्या आढळल्याने नागरिकांच्या आरोग्याचा मुद्दा ऐरणीवर आला असून, नागरिकांमध्ये घबराहट पसरली आहे. महापालिकेचे कार्यकारी अभियंता संजय देसाई यांनी महापे ते दिघा पाण्याच्या लाइनचे काम सुरू असून, आॅगस्टपर्यंत पूर्ण करण्याच्या अनुषंगाने नियोजन करण्यात आल्याचे सांगितले. एमआयडीसीकडून पुरवठा होणाऱ्या पाण्याची पाहणी करून पाण्याच्या लाइन स्वच्छ करण्याबाबत एमआयडीसीलाला सांगण्यात येईल. ओएस वनच्या भूखंडावर पाण्याच्या अनुषंगाने टाक्यादेखील बांधण्यात येणार असल्याचे सांगितले. शिवसेनेचे नगरसेवक द्वारकानाथ भोईर यांनी एमआयडीसी जरी पाणीपुरवठा करीत असली, तरी महापालिकेच्या अधिकाºयांनी याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे सांगत अधिकाºयांचे याकडे दुर्लक्ष झाले असल्याने नागरिकांच्या जीवाशी खेळ चालला असल्याचा आरोप त्यांनी केला. स्थायी समितीचे सभापती सुरेश कुलकर्णी यांनी पाण्याचे नमुने तपासण्यात यावेत, अधिकाºयांनी त्वरित त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करावी आणि असे प्रकार घडू नयेत, या दृष्टीने काळजी घेण्याचे आदेश प्रशासनाला दिले.