शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
2
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
3
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी
4
पठ्ठ्याने एकहाती सामना फिरवला! तब्बल ८ षटकार ठोकून टीम डेव्हिडने केली गोलंदाजांची धुलाई
5
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
6
Viral Video : भर रस्त्यात हाय वोल्टेज ड्रामा! पत्नीने पतीच्या कानशिलात लगावल्या, कशावरून सुरू झालेला वाद?
7
आमिर खानच्या कुटुंबियांनी जारी केलं स्टेटमेंट, भाऊ फैजल खानचे सर्व आरोप फेटाळले
8
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
9
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
10
Video: अल्लू अर्जुनने विमानतळावर अधिकाऱ्यासमोर दाखवला माज; अखेर काढावाच लागला मास्क
11
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
12
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
13
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
14
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
15
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
16
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
17
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
18
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
19
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
20
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार

अधिकाऱ्यांना भूमिपुत्रांनी लावले पिटाळून

By admin | Updated: November 17, 2016 05:15 IST

शासनाने विकासाच्या नावावर अणुऊर्जा प्रकल्प, थर्मल पॉवरची उभारणी करून स्थानिक जनतेची कशी फसवणूक केली आहे,

हितेन नाईक

पालघर : वाढवण बंदर उभारणीबाबत वाढवण, वरोरच्या ग्रामस्थांशी चर्चा करण्यासाठी आलेल्या जेएनपीटीच्या अधिकाऱ्यांना आमचा एकमताने विरोध असल्याचे ग्रामस्थांनी ठणकावून सांगीत बुधवार पर्यंत शासनाने विकासाच्या नावावर अणुऊर्जा प्रकल्प, थर्मल पॉवरची उभारणी करून स्थानिक जनतेची कशी फसवणूक केली आहे, हे आम्ही उघड्या डोळ्यांनी पहात असून शेवटच्या श्वासा पर्यंत बंदराला विरोध करण्याचा मनसुबा स्थानिकांनी यावेळी व्यक्त केला व अधिकाऱ्यांना परत पाठविले. डहाणू तालुक्यातील वाढवण येथे सन १९९८ साली पी अँड ओ या आॅस्ट्रोलियन कंपनीने २९ धक्यांचे उभारीत असलेल्या प्रस्तावित बंदराला डहाणू ते पालघर मधील मच्छिमार, डायमेकर, दलित, आदिवासी ई. समाजाने एकजुटीने विरोध केला होता. व ते हाणून पाडले होते. डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणानेही परवानगी नाकारल्याने शासनाला ते बंदर रद्द करावे लागले होते. त्यामुळे शेकडो वर्षा पासून मासेमारी, बागायती क्षेत्रासह डायमेकिंग व्यवसाय करून शांततेने आपला उदरनिर्वाह करणाऱ्या ग्रामस्थांना दिलासा मिळाला होता. अशा वेळी स्थानिकांना उध्वस्त करणारा हे बंदर आता १८ वर्षांनी पुन्हा एकदा येथील माथी मारण्याचा प्रयत्न केला जात असल्याने असंतोष आहे. वाढवणच्या किनाऱ्यापासून समुद्रात ४.५ नॉटिकल मैल खोल समुद्रात हे बंदर उभारण्यात येणार असून कोणतेही गाव विस्थापित केले जाणार नसून एक इंच ही जमीन संपादित केली जाणार नाही अशी फसवी विधाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केल्याने ग्रामस्था मधून संताप व्यक्त केला जात आहे. या बंदरा बाबत करण्यात आलेल्या सामंजस्य करारात म्हटल्याप्रमाणे या बंदरातील माल उतरविण्यासाठी चौपदरी रस्ते आणि रेल्वे ट्रॅक उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात जमीन संपादित करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. या बंदरात कोळसा, आॅइल, धान्य, रसायन, सिमेंट ई ची कंटेनर द्वारे वाहतूक केली जाणार असून वार्षिक १३२ मिलियन टन इतकी प्रचंड क्षमता या बंदराची आहे. त्यामुळे या मालाच्या वाहतूकीसाठी जमीन लागणार असल्याने शासन खोटी माहिती देऊन स्थानिकांच्या भावनांशी खेळत असल्याचा आरोप होत आहे. त्याचे कोणतेही उत्तर नाशासनाकडे आहे, ना अधिकाऱ्यांकडे.