शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

भूमिपुत्र करणार बेमुदत धरणे आंदोलन

By admin | Updated: February 20, 2017 06:40 IST

विनंत्या अर्ज करूनही सरकार फक्त आश्वासन देत असेल तर आता प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कांसाठी निकराचा लढा दिला

नवी मुंबई : विनंत्या अर्ज करूनही सरकार फक्त आश्वासन देत असेल तर आता प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कांसाठी निकराचा लढा दिला जाईल. प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी अर्थसंकल्प अधिवेशनादरम्यान बेमुदत धरणे आंदोलन व उपोषण करण्याचा इशारा आगरी कोळी युथ फाऊंडेशनने दिला आहे. नवी मुंबई वसविण्यासाठी भूमिपुत्रांनी १०० टक्के जमिनीचा त्याग केला. सरकारकडून जमिनीच्या मोबदल्यात अत्यंत तुटपुंजी रक्कम व ४५ वर्षांची उपेक्षा वाट्याला आली. संघर्ष केल्याशिवाय प्रकल्पग्रस्तांची एकही मागणी कधीच मान्य केलेली नाही. अर्ज व विनंत्यांना कचऱ्याची टोपली दाखविण्यात येत आहे. गरजेपोटी बांधलेली घरे, साडेबारा टक्के योजनेचे भूखंड, सार्वजनिक सुविधा, गावठाणांमधील प्रलंबित प्रश्न, प्रकल्पग्रस्तांना रोजगार व इतर अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याचे कोरडे आश्वासन दिले जात आहे. यामुळे आता सरकारला जाब विचारण्याचा निर्णय भूमिपुत्र तरूणांनी घेतला आहे. आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी नुकतीच कोपरखैरणेमधील खारी कळवा शेतकरी संघटनेच्या सभागृहात बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला २८ गावांमधील ३०० पेक्षा जास्त तरूण सहभागी होते. विशेष म्हणजे यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. नवी मुंबईमध्ये जर इथला भूमिपुत्र सुखाने जगू शकत नसेल तर इतर कोणालाही नवी मुंबईत सुखाने जगण्याचा अधिकार नाही, असा इशारा यावेळी शासन व प्रशासनाला देण्यात आला. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे. अधिवेशनाच्या दरम्यान बेलापूरमध्ये मैदानावर उपोषण व धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त भूमिपुत्रांचा सहभाग व्हावा यासाठी गाव बैठका घेण्याचे निश्चित करण्यात आले. कोपरखैरणेमध्ये झालेल्या बैठकीला युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष नीलेश पाटील, मनोज म्हात्रे, मंगेश म्हात्रे, रवी मढवी, भानुदास भोईर, अरविंद पाटील, सुभाष म्हात्रे व इतर तरूण उपस्थित होते.शासन व प्रशासनाला इशारा प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न सोडविले जात नसल्याने प्रकल्पग्रस्त तरूणाईमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. कोपरखैरणेमध्ये झालेल्या बैठकीमध्ये भूमिपुत्रांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. नवी मुंबईमध्ये जर इथल्या भूमिपुत्रांना सुखाने जगता येत नसेल तर इतर कोणालाही सुखाने जगण्याचा अधिकार नाही, असा स्पष्ट इशारा शासन व प्रशासनाला देण्यात आला.