शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
5
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
6
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
7
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
8
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
9
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
10
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
11
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
12
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
13
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
14
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
15
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
16
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
17
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
18
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
19
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
20
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जंगल सत्याग्रहाची भूमी उपेक्षितच, ८७ वर्षे शासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:33 IST

इंग्रजांच्या अन्यायाविरोधात १९३० मध्ये देशभर जंगल सत्याग्रह सुरू करण्यात आला. उरण तालुक्यातील चिरनेरमध्ये २५ सप्टेंबरला झालेल्या ऐतिहासिक आंदोलनामध्ये १३ भूमिपुत्रांनी हौतात्म्य पत्करले.

नामदेव मोरे, वैभव गायकरनवी मुंबई : इंग्रजांच्या अन्यायाविरोधात १९३० मध्ये देशभर जंगल सत्याग्रह सुरू करण्यात आला. उरण तालुक्यातील चिरनेरमध्ये २५ सप्टेंबरला झालेल्या ऐतिहासिक आंदोलनामध्ये १३ भूमिपुत्रांनी हौतात्म्य पत्करले. ८७ वर्षांनंतरही आंदोलनाच्या ठिकाणी भव्य स्मारक उभारण्याकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. स्मृतिदिनी शासकीय मानवंदना वगळता या ठिकाणाकडे कोणीच फिरकत नसल्याने स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाची घटना व भूमिपुत्रांचे हौतात्म्य विस्मरणात जावू लागले आहे.जुलमी इंग्रज सरकारने १९३० च्या दरम्यान आदिवासींचा जंगलावरील हक्क नाकारला. जंगलातून लाकूड, गवत गोळा करणे, फळे व वनौषधी गोळा करण्यावरही निर्बंध लाधले. गाई - म्हशींनाही जंगलात सोडण्यास मज्जाव करण्यात आला. या अन्यायाविरोधात देशभर आंदोलन सुरू झाले. देशातील पहिला जंगल सत्याग्रह सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील बिळशी येथे झाला. १८ जुलै ते ५ सप्टेंबर १९३० दरम्यान तेथे आंदोलन करण्यात आले. यानंतर देशातील सर्वात मोठा जंगल सत्याग्रह उरण तालुक्यातील चिरनेरच्या अक्काताई जंगलामध्ये झाला. २५ सप्टेंबरला ठाणे व रायगड जिल्ह्यातील ६ हजारपेक्षा जास्त आदिवासी नागरिकांनी चिरनेरमधील आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता. इंग्रजांचे आदेश झुगारून गाई - म्हशी जंगलामध्ये चरण्यासाठी घेवून जाण्याचा निर्धार केला. ‘जंगल आमच्या हक्काचे’ च्या घोषणा देण्यात आल्या. आंदोलन चिरडून काढण्यासाठी इंग्रजांनी गोळीबार करण्याचा आदेश दिला. या गोळीबारामध्ये आंदोलकांसह एकूण १३ जण हुतात्मा झाले. देशभर सुरू असलेल्या आंदोलनामध्ये चिरनेरमध्ये सर्वाधिक हुतात्मा झाले. या घटनेचे पडसाद पूर्ण देशभर उमटले. भूमिपुत्रांच्या पराक्रमाची दखल इतिहासाने घेतली. परंतु स्वातंत्र्यानंतर या हुतात्म्यांचे चांगले स्मारक उभारण्याची आवश्यकताही शासनाला वाटली नाही.चिरनेरमधील ऐतिहासिक लढ्याच्या स्मृती येथील ग्रामस्थांनी प्राणपणाने जपल्या आहेत. हुतात्म्यांचे स्मारक उभारले आहे. प्रत्येक हुतात्म्याची माहिती नागरिकांपर्यंत जावी, भावी पिढीला देशभक्तांच्या त्यागाची माहिती मिळावी यासाठी प्रयत्न केले आहेत. परंतु शासनाने मात्र अद्याप या स्मारकासाठी काहीही केलेले नाही. स्मारकाची देखभाल व साफसफाईही ग्रामपंचायतीच्यावतीने केली जात आहे. सरकारच्यावतीने २५ सप्टेंबरला हुतात्म्यांना मानवंदना दिली जाते, परंतु या व्यतिरिक्त दुसरे काहीही केले जात नाही. ज्या ठिकाणी प्रत्यक्ष गोळीबार झाला त्या अक्काताई जंगल परिसरातील घटनास्थळी साधा माहिती फलकही अद्याप लावलेला नाही. हुतात्म्यांची माहिती चिरनेर गावच्या बाहेरील नागरिकांना मिळेल अशी काहीही व्यवस्था अद्याप केलेली नाही. शासनाच्या संकेतस्थळांवरही याविषयी फारशी माहिती दिली जात नाही. अभ्यासक्रमामध्येही या घटनेविषयीचा उल्लेख अद्याप कधीच करण्यात आलेला नाही. उरण तालुका, रायगड जिल्हा व राज्यातील एकाही प्रकल्पाला, शहरातील चौकांना जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांचे नाव अद्याप दिलेले नाही. ही उपेक्षा कधी थांबणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करू लागले आहेत.हुतात्मा स्तंभचिरनेरमध्ये १३ हुतात्म्यांच्या स्मरणार्थ जानेवारी १९३२ मध्ये स्तंभ उभारला,परंतु इंग्रज सरकारने जूनमध्ये तो पाडला.पुढे जानेवारी १९३९ मध्ये नामदारबा. ग. खेर यांच्या उपस्थितीमध्ये स्मृतीस्तंभ पुन्हा उभारण्यात आला. ग्रामस्थांनी या स्तंभाची काळजी घेवून त्याची जपणूक केली आहे.छत्तीसगढ सरकारने जपला इतिहासदेशात जंगल सत्याग्रहाची सुरवात महाराष्ट्रातून झाली. सांगली, मराठवाडा व रायगड जिल्ह्यातील चिरनेरमध्ये तीव्र आंदोलने झाली. चिरनेरमध्ये १३ जण हुतात्मा झाले.महाराष्ट्रानंतर सर्वात मोठे आंदोलन छत्तीसगढमध्ये झाले. आपल्या सरकारने जंगल सत्याग्रहाच्या स्मृती जपल्या नसल्याने हा इतिहास नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.दुसरीकडे छत्तीसगढ सरकारने जंगल सत्याग्रहाच्या स्मृती जपल्या आहेत. या विषयावर अनेक पुस्तके लिहिण्यात आली आहेत. स्मारके उभारण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील आंदोलनाचे संदर्भही तेथील साहित्यामध्ये आढळतात, परंतु महाराष्ट्र सरकार मात्र याविषयी फारसे काही करत नाही.हुतात्मा स्मारकाविषयी पुढील कामे करण्यात यावीतचिरनेरमध्ये भव्य राष्ट्रीय स्मारक उभारण्यात यावेजंगल आंदोलनाचा इतिहास पाठ्यपुस्तकातून शिकविण्यात यावाचिरनेरला पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्यात यावेजंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांची नावे नवी मुंबई, रायगडमधील मोठ्या प्रकल्पांना द्यावीहुतात्मा स्मारक परिसरातील तलावाचे सुशोभीकरणचिरनेर आंदोलनामधील हुतात्म्यांची नावेधाकू गवत्या फोबेरकर - चिरनेररघुनाथ मोरेश्वर न्हावी - कोप्रोलीरामा बामा कोळी - मोठी जुईआनंदा माया पाटील - धाकटी जुईपरशुराम रामा पाटील - पाणदिवेहसुराम बुध्या पाटील - खोपटेनाग्या महादू कातकरी - चिरनेरआलू बेमट्या म्हात्रे - दिघोडेनारायण पांडू कदम - पनवेलहरी नारायण तवटेजयराम बाबाजी सावंतकाशिनाथ जनार्दन शेवडेकेशव महादेव जोशी - मामलेदार