शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

जंगल सत्याग्रहाची भूमी उपेक्षितच, ८७ वर्षे शासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:33 IST

इंग्रजांच्या अन्यायाविरोधात १९३० मध्ये देशभर जंगल सत्याग्रह सुरू करण्यात आला. उरण तालुक्यातील चिरनेरमध्ये २५ सप्टेंबरला झालेल्या ऐतिहासिक आंदोलनामध्ये १३ भूमिपुत्रांनी हौतात्म्य पत्करले.

नामदेव मोरे, वैभव गायकरनवी मुंबई : इंग्रजांच्या अन्यायाविरोधात १९३० मध्ये देशभर जंगल सत्याग्रह सुरू करण्यात आला. उरण तालुक्यातील चिरनेरमध्ये २५ सप्टेंबरला झालेल्या ऐतिहासिक आंदोलनामध्ये १३ भूमिपुत्रांनी हौतात्म्य पत्करले. ८७ वर्षांनंतरही आंदोलनाच्या ठिकाणी भव्य स्मारक उभारण्याकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. स्मृतिदिनी शासकीय मानवंदना वगळता या ठिकाणाकडे कोणीच फिरकत नसल्याने स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाची घटना व भूमिपुत्रांचे हौतात्म्य विस्मरणात जावू लागले आहे.जुलमी इंग्रज सरकारने १९३० च्या दरम्यान आदिवासींचा जंगलावरील हक्क नाकारला. जंगलातून लाकूड, गवत गोळा करणे, फळे व वनौषधी गोळा करण्यावरही निर्बंध लाधले. गाई - म्हशींनाही जंगलात सोडण्यास मज्जाव करण्यात आला. या अन्यायाविरोधात देशभर आंदोलन सुरू झाले. देशातील पहिला जंगल सत्याग्रह सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील बिळशी येथे झाला. १८ जुलै ते ५ सप्टेंबर १९३० दरम्यान तेथे आंदोलन करण्यात आले. यानंतर देशातील सर्वात मोठा जंगल सत्याग्रह उरण तालुक्यातील चिरनेरच्या अक्काताई जंगलामध्ये झाला. २५ सप्टेंबरला ठाणे व रायगड जिल्ह्यातील ६ हजारपेक्षा जास्त आदिवासी नागरिकांनी चिरनेरमधील आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता. इंग्रजांचे आदेश झुगारून गाई - म्हशी जंगलामध्ये चरण्यासाठी घेवून जाण्याचा निर्धार केला. ‘जंगल आमच्या हक्काचे’ च्या घोषणा देण्यात आल्या. आंदोलन चिरडून काढण्यासाठी इंग्रजांनी गोळीबार करण्याचा आदेश दिला. या गोळीबारामध्ये आंदोलकांसह एकूण १३ जण हुतात्मा झाले. देशभर सुरू असलेल्या आंदोलनामध्ये चिरनेरमध्ये सर्वाधिक हुतात्मा झाले. या घटनेचे पडसाद पूर्ण देशभर उमटले. भूमिपुत्रांच्या पराक्रमाची दखल इतिहासाने घेतली. परंतु स्वातंत्र्यानंतर या हुतात्म्यांचे चांगले स्मारक उभारण्याची आवश्यकताही शासनाला वाटली नाही.चिरनेरमधील ऐतिहासिक लढ्याच्या स्मृती येथील ग्रामस्थांनी प्राणपणाने जपल्या आहेत. हुतात्म्यांचे स्मारक उभारले आहे. प्रत्येक हुतात्म्याची माहिती नागरिकांपर्यंत जावी, भावी पिढीला देशभक्तांच्या त्यागाची माहिती मिळावी यासाठी प्रयत्न केले आहेत. परंतु शासनाने मात्र अद्याप या स्मारकासाठी काहीही केलेले नाही. स्मारकाची देखभाल व साफसफाईही ग्रामपंचायतीच्यावतीने केली जात आहे. सरकारच्यावतीने २५ सप्टेंबरला हुतात्म्यांना मानवंदना दिली जाते, परंतु या व्यतिरिक्त दुसरे काहीही केले जात नाही. ज्या ठिकाणी प्रत्यक्ष गोळीबार झाला त्या अक्काताई जंगल परिसरातील घटनास्थळी साधा माहिती फलकही अद्याप लावलेला नाही. हुतात्म्यांची माहिती चिरनेर गावच्या बाहेरील नागरिकांना मिळेल अशी काहीही व्यवस्था अद्याप केलेली नाही. शासनाच्या संकेतस्थळांवरही याविषयी फारशी माहिती दिली जात नाही. अभ्यासक्रमामध्येही या घटनेविषयीचा उल्लेख अद्याप कधीच करण्यात आलेला नाही. उरण तालुका, रायगड जिल्हा व राज्यातील एकाही प्रकल्पाला, शहरातील चौकांना जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांचे नाव अद्याप दिलेले नाही. ही उपेक्षा कधी थांबणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करू लागले आहेत.हुतात्मा स्तंभचिरनेरमध्ये १३ हुतात्म्यांच्या स्मरणार्थ जानेवारी १९३२ मध्ये स्तंभ उभारला,परंतु इंग्रज सरकारने जूनमध्ये तो पाडला.पुढे जानेवारी १९३९ मध्ये नामदारबा. ग. खेर यांच्या उपस्थितीमध्ये स्मृतीस्तंभ पुन्हा उभारण्यात आला. ग्रामस्थांनी या स्तंभाची काळजी घेवून त्याची जपणूक केली आहे.छत्तीसगढ सरकारने जपला इतिहासदेशात जंगल सत्याग्रहाची सुरवात महाराष्ट्रातून झाली. सांगली, मराठवाडा व रायगड जिल्ह्यातील चिरनेरमध्ये तीव्र आंदोलने झाली. चिरनेरमध्ये १३ जण हुतात्मा झाले.महाराष्ट्रानंतर सर्वात मोठे आंदोलन छत्तीसगढमध्ये झाले. आपल्या सरकारने जंगल सत्याग्रहाच्या स्मृती जपल्या नसल्याने हा इतिहास नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.दुसरीकडे छत्तीसगढ सरकारने जंगल सत्याग्रहाच्या स्मृती जपल्या आहेत. या विषयावर अनेक पुस्तके लिहिण्यात आली आहेत. स्मारके उभारण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील आंदोलनाचे संदर्भही तेथील साहित्यामध्ये आढळतात, परंतु महाराष्ट्र सरकार मात्र याविषयी फारसे काही करत नाही.हुतात्मा स्मारकाविषयी पुढील कामे करण्यात यावीतचिरनेरमध्ये भव्य राष्ट्रीय स्मारक उभारण्यात यावेजंगल आंदोलनाचा इतिहास पाठ्यपुस्तकातून शिकविण्यात यावाचिरनेरला पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्यात यावेजंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांची नावे नवी मुंबई, रायगडमधील मोठ्या प्रकल्पांना द्यावीहुतात्मा स्मारक परिसरातील तलावाचे सुशोभीकरणचिरनेर आंदोलनामधील हुतात्म्यांची नावेधाकू गवत्या फोबेरकर - चिरनेररघुनाथ मोरेश्वर न्हावी - कोप्रोलीरामा बामा कोळी - मोठी जुईआनंदा माया पाटील - धाकटी जुईपरशुराम रामा पाटील - पाणदिवेहसुराम बुध्या पाटील - खोपटेनाग्या महादू कातकरी - चिरनेरआलू बेमट्या म्हात्रे - दिघोडेनारायण पांडू कदम - पनवेलहरी नारायण तवटेजयराम बाबाजी सावंतकाशिनाथ जनार्दन शेवडेकेशव महादेव जोशी - मामलेदार