शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

खारघर स्थानकात सुविधांचा अभाव

By admin | Updated: November 2, 2015 02:10 IST

नवी मुंबईमधील शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखले जाणारे खारघर रेल्वे स्थानक सध्या अनेक समस्यांनी ग्रासले आहे. याकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत

पनवेल : नवी मुंबईमधील शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखले जाणारे खारघर रेल्वे स्थानक सध्या अनेक समस्यांनी ग्रासले आहे. याकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. या रेल्वे स्थानकातून दररोज ४० ते ४५ हजार प्रवासी ये-जा करतात. रेल्वे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देवून स्थानकातील समस्यांचे निराकरण करावे, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने रेल्वेचे मंडळ वाणिज्य प्रबंधक व्ही. ए. मिलनरॉय यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. खारघर रेल्वे स्थानकात पूर्ण वेळ स्टेशन मास्तर नाही. तिकीट खिडक्यांजवळ इंडिकेटर नाही, बंद असलेल्या तिकीट खिडक्या, फलाटावरील बंद असलेले पंखे, लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी आरक्षणाची व्यवस्था नाही, अस्वच्छता असे विविध प्रश्न प्रवाशांना येथे भेडसावत आहेत. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.विशेष म्हणजे, खारघर स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या आकडेवारीनुसार, रेल्वेला याठिकाणाहून दीड ते दोन कोटींचे उत्पन्न मिळते. तरी देखील अनेक वर्षांपासून या समस्या ‘जैसे थे’ असल्याची प्रतिक्रि या खारघरचे शिवसेना उपविभाग प्रमुख रामचंद्र देवरे यांनी दिली. या समस्या सोडविण्याचे निवेदन रेल्वेच्या मंडळ वाणिज्य अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे देवरे यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख वासुदेव घरत, शाखा प्रमुख हरिश्चंद्र वारंग, रमेश सावंत, नितीन कचरे, उत्तम मोर्बेकर, हरी कांबळे आदी कार्यक र्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)