शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोतवाल स्मारक उपेक्षित

By admin | Updated: January 4, 2017 05:06 IST

स्वातंत्र्य लढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्मा वीर भाई कोतवाल व हिराजी पाटील यांच्या सिद्धगड येथील स्मारकाची ७३ वर्षांपासून उपेक्षा सुरू आहे. स्मारकाची प्रचंड दुरवस्था

- नामदेव मोरे,  नवी मुंबईस्वातंत्र्य लढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्मा वीर भाई कोतवाल व हिराजी पाटील यांच्या सिद्धगड येथील स्मारकाची ७३ वर्षांपासून उपेक्षा सुरू आहे. स्मारकाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. २ जानेवारीला वर्षातून एकदा अभिवादन करण्यासाठी शासकीय यंत्रणा स्मारकस्थळी हजेरी लावते. यानंतर वर्षभर कोणीही फिरकत नाही. सात दशकांमध्ये स्मारकावर पत्र्याचे शेडही बांधता आले नसून, सिद्धगडावर जाण्यासाठी रस्ता बनविण्यासही शासनास अपयश आले आहे. देशासाठी रक्त सांडणाऱ्या क्रांतिकारकांची उपेक्षा पाहून इतिहासप्रेमी नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली असून, हे ठिकाण राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे. हुतात्मा वीर भाई कोतवाल व हिराजी पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त २ जानेवारीला मुरबाड तालुक्यातील सिद्धगडावर पाच हजार इतिहासप्रेमींनी हजेरी लावली. २ जानेवारी १९४३ ला इंग्रजांनी या दोन्ही क्रांतिकारकांवर गोळीबार केला. रेल्वे रूळ उखडून व विजेचे टॉवर कापून इंग्रजांना जेरीस आणणाऱ्या या वीरांची समाधी सात दशकांपासून उपेक्षितच राहिली आहे. मुरबाड तालुक्यातील म्हसा गावातून सिद्धगडाकडे जाणारा रस्ता आहे. १३ किलोमीटरच्या रस्त्याचे अद्याप डांबरीकरण झालेले नाही. १९८२ मध्ये या परिसराचा भीमाशंकर अभयारण्यात समावेश करण्यात आला. तेव्हापासून वनविभाग रस्ता बनविण्यासाठी परवानगी देत नाही. रस्ताच नसल्याने स्मारकाकडे जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. सिद्धगडावर ज्या ठिकाणी वीर भाई कोतवाल व त्यांच्या सहकाऱ्यांवर गोळीबार झाला व जिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले अशा दोन ठिकाणी स्मारकाचा चबुतरा करण्यात आला आहे. गोळीबार झालेले ठिकाण ओढ्यात आहे. पावसाळ्यात येथील धबधब्यावर पर्यटक गर्दी करतात व स्मारकाच्या चौथऱ्यावर मद्यपान करत बसतात. अंत्यसंस्कार झालेले ठिकाण शेतामध्ये आहे. ७३ वर्षांमध्ये येथे चांगले स्मारक उभारता आलेले नाही. आहे त्या स्मारकाच्या चौथऱ्यावर पत्र्याचे शेडही उभारता आलेले नाही. समाधी परिसराचा विकास केलेला नाही. देशासाठी आयुष्याचे बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांच्या समाधी परिसरात साधे पेव्हर ब्लॉकही बसविले नाहीत. आझाद दस्त्याच्या कर्तृत्वाची माहिती देणारा एखादा फलकही येथे बसविण्यात आला नसल्याने इतिहासप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली आहे.राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याची मागणीवीर भाई कोतवाल व हिराजी पाटील यांचे स्मृतिस्थळ राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याची मागणी समाधीस्थळास भेट देण्यास आलेले इतिहासप्रेमी संजय साळुंखे यांनी व्यक्त केली आहे. समाधीस्थळाचा विकास करण्यात यावा. भाई कोतवाल यांच्या कर्तृत्वाचा आलेख चित्रातून रेखाटण्यात यावा. आझाद दस्त्याने उखडलेले रेल्वे रूळ, कापलेले विजेचे टॉवर व इतर सर्व माहितीपट पर्यटकांना वाचण्यास व पाहावयास मिळावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. इतिहासप्रेमींनी केलेल्या मागण्या- सिद्धगड परिसर निसर्ग पर्यटनस्थळ म्हणून विकसित व्हावा.- आझाद दस्त्याच्या कर्तृत्वाची माहिती देणारे संग्रहालय उभारण्यात यावे.- म्हसा गाव ते समाधीस्थळ १३ किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण करावे.- समाधीस्थळावर सुरक्षा रक्षक नेमून मद्यपार्ट्या करणाऱ्यांवर कारवाई करावी.