शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
4
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
5
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
6
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
7
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
8
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
9
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
10
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
11
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
12
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
13
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
14
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
15
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
16
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
17
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
18
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
19
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
20
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?

ध्वनिप्रदूषणाच्या विळख्यात पनवेलकर

By admin | Updated: February 9, 2016 02:29 IST

मुंबई, नवी मुंबईप्रमाणे पनवेल परिसरालाही ध्वनिप्रदूषणाचा विळखा पडला आहे. वाहनांची वाढती संख्या, गरज नसताना वाजविण्यात येणारे हॉर्न यामुळे आवाजाची पातळी रात्री ४५ ते

- नामदेव मोरे,  नवी मुंबई मुंबई, नवी मुंबईप्रमाणे पनवेल परिसरालाही ध्वनिप्रदूषणाचा विळखा पडला आहे. वाहनांची वाढती संख्या, गरज नसताना वाजविण्यात येणारे हॉर्न यामुळे आवाजाची पातळी रात्री ४५ ते ५८ व दिवसा ६० ते ७१ डेसिबलपर्यंत जात आहे. दिवस-रात्र सुरू असलेल्या गोंगाटामुळे शहरवासीयांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ध्वनिप्रदूषण ही देशातील सर्वच शहरांमधील गंभीर समस्या झाली आहे. वाहनांची वाढती संख्या, उत्सवांमधील डीजेसह मोठ्या आवाजातील साऊंड सिस्टीम, अनावश्यकपणे वाजविण्यात येणारे हॉर्न यामुळे मर्यादेपेक्षा जास्त गोंगाट दिवस-रात्र सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या गोंगाटामधून पनवेलही सुटलेले नाही. पनवेल एस. टी. स्टँड परिसरात नियमित वाहनांची गर्दी असते. याठिकाणी वाहतूक नियमांचे योग्य पालन न केल्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होत असते. चक्का जाम झाल्यानंतर प्रत्येक वाहनचालक विनाकारण हॉर्न वाजवत असल्याने प्रवाशांना कानठळ्या बसत आहेत. उरण नाका, मच्छी मार्केट, पटेल मोहल्ला, शिवाजी चौक व इतर सर्वच महत्त्वाच्या ठिकाणी हीच स्थिती आहे. पनवेलमध्ये पूर्णपणे व्यावसायिक नोड नाही. निवासी व वाणिज्य अशी संमिश्र रचना सर्वच ठिकाणी आहे. वास्तविक या सर्व ठिकाणी रात्री ४५ व दिवसा ५५ डेसिबल एवढा आवाज असणे आवश्यक आहे. परंतु अनेक ठिकाणी आवाजाची पातळी रात्री ४५ ते ५८ पर्यंत जावू लागली आहे. दिवसा अनेक ठिकाणी ६० ते ७१ डेसिबलपर्यंत आवाजाची मर्यादा जात आहे. वाहन चालक आवश्यकता नसतानाही वारंवार हॉर्न वाजवत असल्याने ध्वनिप्रदूषणाची समस्या गंभीर होत आहे. याशिवाय लग्न, उत्सव व इतर सार्वजनिक कार्यक्रमांच्या दरम्यान साऊंड सिस्टीमचा आवाज वाढविला जात आहे. पनवेल एस. टी. स्टँड परिसरात हॉस्पिटलही आहेत. इतरही काही ठिकाणी हॉस्पिटल असणाऱ्या ठिकाणी वाहनांचा गोंगाट वाढत असून त्यामुळे रुग्णांना त्रास होत आहे. पनवेलमध्ये शाळा, मंदिर, रुग्णालय परिसरामध्ये शांतता क्षेत्राचे फलक लावणे आवश्यक आहे. परंतु अनेक ठिकाणी नो हॉर्नचे फलक लावलेले नाहीत. यामुळे शांतता क्षेत्र असणाऱ्या ठिकाणीही बिनधास्तपणे वाहनचालक हॉर्न वाजवत असतात. ध्वनिप्रदूषणाचा गंभीर परिणाम आरोग्यावर होवू लागला आहे. जादा आवाजामुळे बहिरेपणा येतोच याशिवाय नागरिकांमधील चिडचिडेपणा वाढतो. वारंवार डोके दुखणे व इतर आजारांनाही सामोरे जावे लागते. नो हॉर्न चळवळीची गरजशहरवासीयांना ध्वनिप्रदूषणाच्या विळख्यातून सोडविण्यासाठी नो हॉर्न चळवळ राबविण्याची गरज आहे. सिग्नल सुरू असताना, ट्रॅफिक जाम झालेले असताना विनाकारण हॉर्न वाजवू नये, अशी स्वयंशिस्त प्रत्येक चालकाने पाळली पाहिजे. शाळा, रुग्णालय परिसरामधून जातानाही हॉर्न वाजविणे बंद केले पाहिजे. फक्त वाहतूक पोलीस ध्वनिप्रदूषण थांबवू शकत नाहीत. शहरवासीयांनी स्वयंस्फूर्तपणे नो हॉर्न प्लीज ही मोहीम राबविण्याची वेळ आली आहे. शांतता क्षेत्रे घोषित करावीशहरात शिक्षण संस्था, रुग्णालय, वृद्धाश्रम व इतर महत्त्वाच्या ठिकाणी शांतता क्षेत्रे घोषित करून, तसे बोर्ड वाहनधारकांना दिसतील अशापद्धतीने लावले पाहिजेत. शाळेच्या बाहेर मुलांना सोडण्यासाठी व पुन्हा घरी घेऊन जाण्यासाठी येणाऱ्या पालकांनी व स्कूलबसचालकांनीही हॉर्न वाजविणे थांबविले पाहिजे. शांतता क्षेत्रात गोंगाट करणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे. पनवेलमध्ये वाहनचालक वाहतुकीच्या नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. सिग्नल, वाहतूककोंडी झाल्यानंतर मोठ्याने हॉर्न वाजविले जात आहेत. वाहने रोडवर उभी केल्यामुळेही वाहतुकीला अडथळा निर्माण होतो व पुन्हा हॉर्नचा गोंगाट सुरू होतो. याशिवाय उत्सव काळातही ध्वनिक्षेपकाचा आवाज जास्त असून, प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वांनी स्वयंशिस्त पाळणे महत्त्वाचे आहे. - अरुण भिसे, पोलीस निरीक्षक, पनवेल वाहतूक विभाग