शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

फळांच्या राजाचे राज्य सुरू

By admin | Updated: April 26, 2017 00:27 IST

मुंबईसह महाराष्ट्रभर फळांचा राजा आंब्याचे राज्य सुरू झाले आहे. मुंबई एपीएमसीमध्ये रोज १ लाखपेक्षा जास्त पेट्यांमधून आंबा विक्रीसाठी येत आहे.

नामदेव मोरे / नवी मुंबई मुंबईसह महाराष्ट्रभर फळांचा राजा आंब्याचे राज्य सुरू झाले आहे. मुंबई एपीएमसीमध्ये रोज १ लाखपेक्षा जास्त पेट्यांमधून आंबा विक्रीसाठी येत आहे. सरासरी २२ टन मालाची विक्री होत आहे. कोकणासह दक्षिणेतील राज्यांमधून मोठ्या प्रमाणात माल विक्रीसाठी येत असून मेअखेरपर्यंत हंगाम सुरू राहणार आहे. देशात सर्वाधिक आंब्याची विक्री मुंबईमध्ये होत असते. मुंबई बाजार समितीमध्ये रोज १ लाखपेक्षा जास्त पेट्यांची आवक होत आहे. विक्रीसाठी येणाऱ्या सर्व फळांमध्ये आंब्याचे प्रमाण ९० टक्के आहे. बाजार समिती पूर्णपणे आंबामय झाली आहे. रोज ३५० ते ४०० ट्रक, टेंपोमधून माल विक्रीसाठी येत आहे. सद्यस्थितीमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्गमधून ५० हजार पेट्यांची आवक होत आहे. ४ ते ८ डझनची पेटी ६०० ते १४०० रुपये दराने विकली जात आहे. मुंबईमध्ये कर्नाटकमधून मोठ्या प्रमाणात आवक होवू लागली आहे. तेथील हापूस आंबा ३५ ते ६५ रुपये किलो दराने विकला जात असून त्यामुळे कोकणच्या हापूसचे दर गडगडू लागले आहेत. हापूसप्रमाणे गुजरातवरून केसरची आवक होत असून होलसेल मार्केटमध्ये ४० ते ५० रुपये दराने विक्री होत आहे. राजापुरी ३० रुपये किलो, बदामी २० ते ४० रु. किलो, लालबाग १० रु.किलो दराने विकला जात आहे. पुढील काही दिवसामध्ये गुजरातचा हापूस आंबाही विक्रीसाठी येत आहे. कोकणच्या मालाची आवक थोडी कमी झाली असून पुढील १५ दिवसांमध्ये पुन्हा आवक वाढण्याची शक्यता आहे. बाजार समितीमध्ये प्रचंड आवक झाल्याने वाहतूककोंडी होवू नये व अडथळा निर्माण होवू नये यासाठी जादा कर्मचारी तैनात केले आहेत. तात्पुरत्या स्वरूपात जादा माथाडी कामगार काम करत आहेत. राज्यातील इतर शहरांच्या तुलनेमध्ये सर्वाधिक आवक मुंबईमध्ये होत आहे.