शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

खतकुंड्या बनल्या कचराकुंड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 01:57 IST

पनवेल महानगरपालिकेने स्वच्छता सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी खतकुंड्या उभारल्या होत्या

- अरुणकुमार मेहत्रे कळंबोली : पनवेल महानगरपालिकेने स्वच्छता सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी खतकुंड्या उभारल्या होत्या; परंतु आता या खतकुंड्यांचे रूपांतर कचराकुंड्यांत झाल्याचे दिसून आले आहे. खतनिर्मितीच्या हेतूने निर्माण करण्यात आलेल्या कुंड्यांत आता कचरा साठविला जात असल्याने महापालिकेचे लाखो रुपये पाण्यात गेल्याची चर्चा पनवेलमध्ये सुरू आहे.पनवेल महानगरपालिकेने महत्त्वाच्या ठिकाणी खतकुंड्या बांधल्या आहेत, त्यामध्ये पनवेल शहर, छोटा आणि मोठा खांदा, कळंबोली, कामोठे तसेच काही समाविष्ट गावांमध्ये ५० पेक्षा जास्त खतकुंड्या बांधण्यात आल्या आहेत. आणखी काही ठिकाणी त्या बांधण्यात येणार आहेत. प्री कास्ट पॅनेलच्या माध्यमातून या कंपोस्टिंग बिन्स तयार करण्यात आल्या आहेत. या पाठीमागे ओला कचरा त्याचबरोबर पालापाचोळ्यावर कंपोस्ट खतनिर्मितीचा संकल्प करण्यात आला होता, यातून निर्माण होणाऱ्या खताचा वापर उद्यान, गार्डन तसेच झाडांसाठी करण्यात येणार होता. त्याचबरोबर जास्त खत निर्माण झाले तर त्याची विक्र ी करून उत्पन्न मिळविण्याचे ध्येय होते.मात्र, पनवेल शहरात तसेच महापालिका हद्दीत फेरफटका मारला तर या प्री कास्ट कंपोस्टिंग बिन्समध्ये कचरा टाकला जात असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे, शेजारच्या भिंतीवर कचरा घंटागाडीतच टाका, इतरत्र टाकल्यास १५० रुपये दंड आकारला जाईल, असा संदेश लिहिण्यात आला आहे.>आपल्या परिसराची स्वच्छता राखणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे. त्यासाठी प्रशासनाने खतकुंड्या तयार केल्या आहेत. यात ओला आणि सुका कचरा वेगळा करून टाकणे अपेक्षित आहे; परंतु खतकुंड्यात प्लॅस्टिक, टायर अशा प्रकारे सुका कचरा टाकला जातो. त्यासाठी जनजागृतीची गरज असून यासंदर्भात महापालिकेच्या वतीने लवकरच उपाययोजना करण्यात येतील.- डॉ. अरु णकुमार भगत, आरोग्य सभापती>सहायक आयुक्त अनभिज्ञघनकचरा व्यवस्थापनाची जबाबदारी सहायक आयुक्त श्याम पोशेट्टी यांच्यावर देण्यात आली आहे. महापालिकेने किती खतकुंड्या बांधल्या, त्यातून किती कंपोस्ट खत तयार झाले, याबाबत पोशेट्टी यांना विचारले असता, याबाबत आपल्याला काहीच माहीत नसल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.स्वच्छ सर्वेक्षणाकरिता या खतकुंड्या बांधून सेल्फीगिरी करण्यात आली, पुढे त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. कचराकुंड्या तर सोडाच; पण इतर प्रकल्पसुद्धा बंद पडायला लागले आहेत, याला सत्ताधारी आणि प्रशासन जबाबदार आहे. - अरविंद म्हात्रे, नगरसेवक