शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

खतकुंड्या बनल्या कचराकुंड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 01:57 IST

पनवेल महानगरपालिकेने स्वच्छता सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी खतकुंड्या उभारल्या होत्या

- अरुणकुमार मेहत्रे कळंबोली : पनवेल महानगरपालिकेने स्वच्छता सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी खतकुंड्या उभारल्या होत्या; परंतु आता या खतकुंड्यांचे रूपांतर कचराकुंड्यांत झाल्याचे दिसून आले आहे. खतनिर्मितीच्या हेतूने निर्माण करण्यात आलेल्या कुंड्यांत आता कचरा साठविला जात असल्याने महापालिकेचे लाखो रुपये पाण्यात गेल्याची चर्चा पनवेलमध्ये सुरू आहे.पनवेल महानगरपालिकेने महत्त्वाच्या ठिकाणी खतकुंड्या बांधल्या आहेत, त्यामध्ये पनवेल शहर, छोटा आणि मोठा खांदा, कळंबोली, कामोठे तसेच काही समाविष्ट गावांमध्ये ५० पेक्षा जास्त खतकुंड्या बांधण्यात आल्या आहेत. आणखी काही ठिकाणी त्या बांधण्यात येणार आहेत. प्री कास्ट पॅनेलच्या माध्यमातून या कंपोस्टिंग बिन्स तयार करण्यात आल्या आहेत. या पाठीमागे ओला कचरा त्याचबरोबर पालापाचोळ्यावर कंपोस्ट खतनिर्मितीचा संकल्प करण्यात आला होता, यातून निर्माण होणाऱ्या खताचा वापर उद्यान, गार्डन तसेच झाडांसाठी करण्यात येणार होता. त्याचबरोबर जास्त खत निर्माण झाले तर त्याची विक्र ी करून उत्पन्न मिळविण्याचे ध्येय होते.मात्र, पनवेल शहरात तसेच महापालिका हद्दीत फेरफटका मारला तर या प्री कास्ट कंपोस्टिंग बिन्समध्ये कचरा टाकला जात असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे, शेजारच्या भिंतीवर कचरा घंटागाडीतच टाका, इतरत्र टाकल्यास १५० रुपये दंड आकारला जाईल, असा संदेश लिहिण्यात आला आहे.>आपल्या परिसराची स्वच्छता राखणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे. त्यासाठी प्रशासनाने खतकुंड्या तयार केल्या आहेत. यात ओला आणि सुका कचरा वेगळा करून टाकणे अपेक्षित आहे; परंतु खतकुंड्यात प्लॅस्टिक, टायर अशा प्रकारे सुका कचरा टाकला जातो. त्यासाठी जनजागृतीची गरज असून यासंदर्भात महापालिकेच्या वतीने लवकरच उपाययोजना करण्यात येतील.- डॉ. अरु णकुमार भगत, आरोग्य सभापती>सहायक आयुक्त अनभिज्ञघनकचरा व्यवस्थापनाची जबाबदारी सहायक आयुक्त श्याम पोशेट्टी यांच्यावर देण्यात आली आहे. महापालिकेने किती खतकुंड्या बांधल्या, त्यातून किती कंपोस्ट खत तयार झाले, याबाबत पोशेट्टी यांना विचारले असता, याबाबत आपल्याला काहीच माहीत नसल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.स्वच्छ सर्वेक्षणाकरिता या खतकुंड्या बांधून सेल्फीगिरी करण्यात आली, पुढे त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. कचराकुंड्या तर सोडाच; पण इतर प्रकल्पसुद्धा बंद पडायला लागले आहेत, याला सत्ताधारी आणि प्रशासन जबाबदार आहे. - अरविंद म्हात्रे, नगरसेवक