शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

खारघर - पनवेल एनएमएमटी सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 02:35 IST

खारघर ते पनवेल या मार्गावर एनएमएमटी बससेवा सुरू करावी, अशी मागणी नगरसेविका संजना समीर कदम यांनी नवी मुंबई महापालिका परिवहन व्यवस्थापकांकडे पत्राद्वारे केली आहे.

पनवेल : खारघर ते पनवेल या मार्गावर एनएमएमटी बससेवा सुरू करावी, अशी मागणी नगरसेविका संजना समीर कदम यांनी नवी मुंबई महापालिका परिवहन व्यवस्थापकांकडे पत्राद्वारे केली आहे.तीन लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या खारघर शहरात जवळपास ४0 सेक्टर आहेत. नागरिकांना विविध कामांसाठी पनवेल तहसील, प्रांत, पंचायत समिती आणि पनवेल पालिकेच्या मुख्यालयात नेहमीच जावे लागतात.जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठेत येथील बाजारपेठेचा उल्लेख आजही होतो. शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रहिवासी, जातीचा आणि उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी पनवेल तहसील कार्यालयात जावे लागते. याशिवाय खारघर सेक्टर २५ ते ४0 परिसरातील नागरिकांना कोपरा अथवा हिरानंदानी बस थांब्यावर जाण्यासाठी ५0 ते १00 रु पये रिक्षासाठी खर्च करावे लागतात. त्यामुळे शालेय विद्यार्थी आणि नागरिकांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.नवी मुंबई महानगरपालिका परिवहन विभागाने रॅपिड अ‍ॅक्शनफोर्स, सेक्टर ३४, रामशेठ ठाकूर कॉलेज, रांजणपाडा, वास्तुविहार, घरकूल, डेली बाजार आणि शिल्प चौक व हिरानंदानी मार्गे पनवेल या मार्गावर बससेवा सुरू केल्यास नागरिकांची चांगली सोय होईल आणि परिवहनच्या उत्पन्नातहीवाढ होईल. परिवहन विभागाने तातडीने सर्वेक्षण करून बससेवा सुरू करावी, अशी मागणी कदम यांनी केली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई