शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
3
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
4
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
5
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
6
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
7
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
8
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
9
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
10
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
11
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
12
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
13
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
14
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
15
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
16
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
17
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
18
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
19
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
20
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल

खारफुटीच्या जंगलांचा होतोय -हास,  मार्गदर्शक तत्त्वांना हरताळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 01:04 IST

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी खारफुटीचे संरक्षण करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

नवी मुंबई : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी खारफुटीचे संरक्षण करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली आहेत. याचे पालन करण्याची जबाबदारी स्थानिक प्राधिकरणांवर सोपविण्यात आली आहे. मात्र, नवी मुंबई परिसरात न्यायालयाच्या या मार्गदर्शक तत्त्वांना सपशेल हरताळ फासला जात आहे. खारफुटीची सर्रास तोड केली जात आहे. खारफुटीचा ºहास थांबविण्यासाठी केलेल्या उपाययोजना तोकड्या ठरत असल्याचे दिसून आले आहे.नवी मुंबई शहराला १५० कि.मी.चा सागरकिनारा लाभला आहे. यात सुमारे दीड हजार हेक्टरचे क्षेत्र खारफुटीने व्यापले आहे. या खारफुटीचे संरक्षण करण्याची जबाबदारी स्थानिक प्राधिकरणांवर सोपविली आहे; परंतु प्रभावी अंमलबजावणीअभावी खारफुटी संरक्षणाला मर्यादा पडल्या आहेत. खाडी किनाºयावर मातीचा भराव टाकून नवी मुंबई शहराची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे अगोदरच मोठ्या प्रमाणात खारफुटींचा ºहास झाला आहे. खारफुटीच्या संरक्षणासाठी अनेक पर्यावरण संस्थांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील विशेषत: नवी मुंबई परिसरातील खारफुटींचे संरक्षण करण्यासाठी स्थानिक प्राधिकरणाने कठोर पावले उचलण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत; परंतु स्थानिक प्राधिकरण असलेल्या नवी मुंबई महापालिकेकडून यासंदर्भात ठोस कार्यवाही होताना दिसत नाही. याचा परिणाम म्हणून आजही मोठ्या प्रमाणात खारफुटींची कत्तल करून बेकायदा बांधकामे केली जात आहेत. अनेक ठिकाणी रातोरात मातीचा भराव टाकून खारफुटी नष्ट केली जात आहे. वाशी ते ऐरोली दरम्यानच्या खाडीकिनाºयावर वसलेल्या गावांचा अनधिकृतरीत्या खाडीत विस्तार होताना दिसत आहे. अनेकांनी खारफुटींची तोड करून त्यावर बेकायदा बांधकामे उभारली आहेत. विशेषत: कोपरखैरणे, घणसोली, गोठीवली ही गावे तर हळूहळू खाडीत विस्तारताना दिसत आहेत. स्थानिक पोलीस व संबंधित विभागाच्या अधिकाºयांना हाताशी धरून भूमाफियांनी या परिसरात उच्छाद मांडला आहे.खारफुटींच्या संरक्षणासाठी कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली वर्षभरापूर्वी एक समिती गठीत केली आहे. खारफुटीची तोड थांबविण्यासाठी या समितीने विविध उपाययोजना सूचित केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मध्यंतरी खारफुटी क्षेत्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव तयार केला होता; परंतु त्यावरील खर्च कोणी करायचा? यावरून हा प्रस्ताव बारगळला, तर काही ठिकाणी खारफुटीकडे जाणाºया मार्गावर कृत्रिम अडथळे निर्माण करण्याचा प्रयोग करण्यात आला. एकूणच महापालिका आणि वन विभागाच्या तकलादू उपाययोजनांना भीक न घालता भूमाफियांनी आपल्या कारवाया सुरूच ठेवल्याचे दिसून आले आहे.महापालिकेची उदासीनता : खारफुटीच्या रक्षणासाठी खारफुटी प्रोटेक्शन ब्रिगेडची निर्मिती करण्याचा निर्णय ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतला आहे. यात पोलीस, महापालिका आणि पर्यावरणप्रेमी संस्थांचा सहभाग असणार आहे. मीरा-भार्इंदर महापालिकेनेही या संकल्पनेवर आधारित पथक तयार करण्याची कार्यवाही सुरू केली आहे; परंतु नवी मुंबई महापालिकेने यासंदर्भात अद्यापि कोणतीही कार्यवाही केली नसल्याचे दिसून आले आहे.खारफुटीवर उपग्रहाची नजर; प्रस्ताव कागदावरचकिनारपट्टीवरील किती खारफुटीचे क्षेत्र नष्ट झाले आहे, हे प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी करणे, हे वन विभागासमोर मोठे आव्हान आहे. त्यासाठी वन विभागाने भारतीय अंतराळ संशोधन केंद्राकडून मदत घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार उपग्रहाच्या माध्यमातून खारफुटीच्या जंगलांची छायाचित्रे घेण्याचे प्रस्तावित केले होते. तसेच या उपग्रहाच्या माध्यमातून खारफुटीच्या जंगलांवर नजर ठेवली जाणार होती. तेथे होणाºया अवैध हालचाली टिपण्याचे प्रयोजन होते. परंतु, हा प्रस्तावसुद्धा कागदावरच सीमित राहिल्याचे दिसून आले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई