शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
2
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
3
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
4
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
5
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
6
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
9
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
10
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
11
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
12
Panvel Crime News: धक्कादायक! नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाला जन्मताच रस्त्यावर फेकलं, पनवेल येथील घटना
13
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
14
‘तशा’ किती विकासकांना अटक केली? कल्याण-डोंबिवली पालिकेला मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
15
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
16
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
17
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती
18
बांगलादेशींना नोकरी देणाऱ्यांवर होणार कारवाई; राज्य सरकारच्या आदेशात काय?
19
"तरुण दिसण्यासाठी ती गेली ५ वर्ष.."; शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी केला मोठा खुलासा
20
खराब हवामानामुळे पिकाचे होणारे नुकसान टाळता येणार, नव्या टेक्नोलॉजीचा शेतकऱ्यांना फायदाच!

खैरवाडी दोन दिवसांपासून अंधारात

By admin | Updated: November 10, 2016 03:44 IST

पनवेल तालुक्यातील खैरवाडी येथील विजेचे पोल कोसळल्यामुळे दोन दिवसांपासून आदिवासी बांधवांना अंधारात राहावे लागत आहे.

पनवेल : पनवेल तालुक्यातील खैरवाडी येथील विजेचे पोल कोसळल्यामुळे दोन दिवसांपासून आदिवासी बांधवांना अंधारात राहावे लागत आहे. महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका येथील नागरिकांना बसत आहे. दोन दिवस उलटून गेले तरी देखील महावितरणने येथील विजेचे पोल बसविले नाहीत. त्यामुळे येथील नागरिकांचे हाल होत आहेत.पनवेलपासून जवळपास १० किलोमीटरवर वसलेल्या खैरवाडी आदिवासी वाडीत ४० ते ४५ घरांची वस्ती आहे. २५० आदिवासी बांधव येथे राहतात. ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास विजेचा पोल खाली पडल्याने येथील वीज गायब झाली व येथील रहिवाशांना अंधारात राहावे लागले. दोन दिवसांपासून येथील वीज गायब झाल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. मात्र महावितरणच्या अधिकाऱ्यांना याकडे लक्ष देता येत नाही. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वीज नसल्यामुळे अंधारातच रात्र काढावी लागत आहे. त्यामुळे मच्छरांचा त्रास होत असल्याचे आदिवासी बांधवांनी सांगितले. पोल पडल्यामुळे येथील वीज पुरवठा चालूच होता. सुदैवाने यावेळी कोणतीही जीवितहानी घडली नाही. गंज लागल्यामुळे येथील अनेक पोल पाडण्याच्या स्थितीत आहेत. मात्र महावितरण त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आदिवासी बांधवांनी केला.ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी वीज यंत्रणा जुनाट झाली आहे. काही ठिकाणच्या विजेच्या खांबांना वेलींनी आलिंगन घातले आहे. तर बहुतांश ठिकाणी विजेच्या तारा लोंबकळताना दिसत आहेत. विजेच्या तारा तुटणे, खांब पडणे यामुळे ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे ग्रामीण भागात महावितरणचा भोंगळ कारभार पहावयास मिळत आहे. बहुतांश भागातील डीपींना झाकणे नाहीत तर काही डीपी दिवस-रात्र उघड्या आहेत. त्यामुळे मोठा अपघात घडू शकतो. विजेच्या खांबांमध्ये असलेले जास्त अंतर यामुळे काही ठिकाणी तारा लोंबकळल्या आहेत. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याचे गांभीर्य लक्षात घेऊन जीर्ण विद्युत तारा व विजेचे खांब तत्काळ बदलावेत अशी येथील जनतेची मागणी आहे. याबाबत कनिष्ठ अभियंता जी.एस.सूर्यवंशी यांना विचारले असता शनिवारपर्यंत वीज येईल असे सांगण्यात आले. (वार्ताहर)