शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानच्या हल्ल्यात पाकिस्तानचे ५८ सैनिक ठार; तालिबान सरकारने ISIS बद्दल काय सांगितलं?
2
'वनडे क्वीन' स्मृतीनं रचला नवा इतिहास; ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन विरुद्ध साधला मोठा डाव
3
‘लंच पे चर्चा’! राज ठाकरे आईसोबत पुन्हा मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंसोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम
4
गृह कर्जाचा हप्ता भरणं जड जातंय? ईएमआय कमी करण्यासाठी 'या' ५ स्मार्ट ट्रिक्स वापरा आणि मोठी बचत करा!
5
“दादा भुसेंचे ट्रम्प यांच्याशी घनिष्ट संबंध असतील, पालकमंत्रीपद...”; गिरीश महाजनांचा टोला
6
अर्धा संघ तंबूत धाडत कुलदीप यादवनं रचला इतिहास; दिल्लीच्या मैदानात मारला विश्वविक्रमी 'पंजा'
7
'मुलींनी रात्री बाहेर पडू नये', दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरणावर ममता बॅनर्जींचे वादग्रस्त वक्तव्य
8
तुम्हालाही मस्त नेलपेंट लावायला आवडते? ठरेल जीवघेणं, वाढू शकतो स्किन कॅन्सरचा धोका
9
तुम्हीही होऊ शकता कोट्यधीश! विद्यार्थी, गिग वर्कर्ससाठी 'मायक्रो SIP' चा नवा सुपरहिट ट्रेंड
10
"जर तुम्ही कॉफी बनवायला शिकला असाल तर...", राहुल गांधींच्या दक्षिण अमेरिका दौऱ्यावर भाजपचा निशाणा
11
“तरे म्हणाले होते हा माणूस दगा देईल, तेच झाले, आता पश्चाताप झाला नसता”; ठाकरेंची शिंदेवर टीका
12
नोकरीच्या बचतीची चिंता सोडा! 'या' ४ सोप्या मार्गांनी घरबसल्या तपासा तुमचा PF बॅलन्स
13
Pune Crime: गर्लफ्रेंडच्या मोबाईलमध्ये दुसऱ्या पुरुषासोबतचे नग्न फोटो, बॉयफ्रेंडने केक कापायच्या चाकूनेच तरुणीची हत्या
14
घाईत घेतलेला निर्णय महागात; अमिताभ बच्चन यांनी मुलांच्या ओव्हर कॉन्फिडन्सवर टाकला प्रकाश
15
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पुन्हा पत्रकार परिषद घेणार, महिला पत्रकारांना विशेष आमंत्रण
16
अफगाणिस्तान vs पाकिस्तान; थेट युद्धात कोणाचे सैन्य वरचढ ठरेल? जाणून घ्या...
17
IND vs WI : बुमराहचा 'ट्रिपल फिफ्टी'चा रेकॉर्ड; वेळ घेतला; पण परफेक्ट यॉर्करसह साधला विकेटचा डाव
18
Rajya Sabha Election: भाजपने मुस्लीम नेत्याला उतरवले निवडणुकीच्या रिंगणात, तीन नावाची घोषणा
19
हवाई हल्ल्यानंतर तालिबानचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, १५ सैनिक ठार; अनेक प्रांतांमध्ये गोळीबार
20
IND vs WI : कुलदीपचा 'पंजा'! टीम इंडियानं पाहुण्या वेस्ट इंडिजला दिला फॉलोऑन

खैरवाडी दोन दिवसांपासून अंधारात

By admin | Updated: November 10, 2016 03:44 IST

पनवेल तालुक्यातील खैरवाडी येथील विजेचे पोल कोसळल्यामुळे दोन दिवसांपासून आदिवासी बांधवांना अंधारात राहावे लागत आहे.

पनवेल : पनवेल तालुक्यातील खैरवाडी येथील विजेचे पोल कोसळल्यामुळे दोन दिवसांपासून आदिवासी बांधवांना अंधारात राहावे लागत आहे. महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका येथील नागरिकांना बसत आहे. दोन दिवस उलटून गेले तरी देखील महावितरणने येथील विजेचे पोल बसविले नाहीत. त्यामुळे येथील नागरिकांचे हाल होत आहेत.पनवेलपासून जवळपास १० किलोमीटरवर वसलेल्या खैरवाडी आदिवासी वाडीत ४० ते ४५ घरांची वस्ती आहे. २५० आदिवासी बांधव येथे राहतात. ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास विजेचा पोल खाली पडल्याने येथील वीज गायब झाली व येथील रहिवाशांना अंधारात राहावे लागले. दोन दिवसांपासून येथील वीज गायब झाल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. मात्र महावितरणच्या अधिकाऱ्यांना याकडे लक्ष देता येत नाही. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वीज नसल्यामुळे अंधारातच रात्र काढावी लागत आहे. त्यामुळे मच्छरांचा त्रास होत असल्याचे आदिवासी बांधवांनी सांगितले. पोल पडल्यामुळे येथील वीज पुरवठा चालूच होता. सुदैवाने यावेळी कोणतीही जीवितहानी घडली नाही. गंज लागल्यामुळे येथील अनेक पोल पाडण्याच्या स्थितीत आहेत. मात्र महावितरण त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आदिवासी बांधवांनी केला.ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी वीज यंत्रणा जुनाट झाली आहे. काही ठिकाणच्या विजेच्या खांबांना वेलींनी आलिंगन घातले आहे. तर बहुतांश ठिकाणी विजेच्या तारा लोंबकळताना दिसत आहेत. विजेच्या तारा तुटणे, खांब पडणे यामुळे ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे ग्रामीण भागात महावितरणचा भोंगळ कारभार पहावयास मिळत आहे. बहुतांश भागातील डीपींना झाकणे नाहीत तर काही डीपी दिवस-रात्र उघड्या आहेत. त्यामुळे मोठा अपघात घडू शकतो. विजेच्या खांबांमध्ये असलेले जास्त अंतर यामुळे काही ठिकाणी तारा लोंबकळल्या आहेत. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याचे गांभीर्य लक्षात घेऊन जीर्ण विद्युत तारा व विजेचे खांब तत्काळ बदलावेत अशी येथील जनतेची मागणी आहे. याबाबत कनिष्ठ अभियंता जी.एस.सूर्यवंशी यांना विचारले असता शनिवारपर्यंत वीज येईल असे सांगण्यात आले. (वार्ताहर)