शहरं
Join us  
Trending Stories
1
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
2
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
3
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
4
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
5
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
6
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
7
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
8
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
9
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
10
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
11
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
12
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
13
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
14
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
15
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
16
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
17
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
18
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
19
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
20
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!

खैरवाडी दोन दिवसांपासून अंधारात

By admin | Updated: November 10, 2016 03:44 IST

पनवेल तालुक्यातील खैरवाडी येथील विजेचे पोल कोसळल्यामुळे दोन दिवसांपासून आदिवासी बांधवांना अंधारात राहावे लागत आहे.

पनवेल : पनवेल तालुक्यातील खैरवाडी येथील विजेचे पोल कोसळल्यामुळे दोन दिवसांपासून आदिवासी बांधवांना अंधारात राहावे लागत आहे. महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका येथील नागरिकांना बसत आहे. दोन दिवस उलटून गेले तरी देखील महावितरणने येथील विजेचे पोल बसविले नाहीत. त्यामुळे येथील नागरिकांचे हाल होत आहेत.पनवेलपासून जवळपास १० किलोमीटरवर वसलेल्या खैरवाडी आदिवासी वाडीत ४० ते ४५ घरांची वस्ती आहे. २५० आदिवासी बांधव येथे राहतात. ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास विजेचा पोल खाली पडल्याने येथील वीज गायब झाली व येथील रहिवाशांना अंधारात राहावे लागले. दोन दिवसांपासून येथील वीज गायब झाल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. मात्र महावितरणच्या अधिकाऱ्यांना याकडे लक्ष देता येत नाही. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वीज नसल्यामुळे अंधारातच रात्र काढावी लागत आहे. त्यामुळे मच्छरांचा त्रास होत असल्याचे आदिवासी बांधवांनी सांगितले. पोल पडल्यामुळे येथील वीज पुरवठा चालूच होता. सुदैवाने यावेळी कोणतीही जीवितहानी घडली नाही. गंज लागल्यामुळे येथील अनेक पोल पाडण्याच्या स्थितीत आहेत. मात्र महावितरण त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आदिवासी बांधवांनी केला.ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी वीज यंत्रणा जुनाट झाली आहे. काही ठिकाणच्या विजेच्या खांबांना वेलींनी आलिंगन घातले आहे. तर बहुतांश ठिकाणी विजेच्या तारा लोंबकळताना दिसत आहेत. विजेच्या तारा तुटणे, खांब पडणे यामुळे ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे ग्रामीण भागात महावितरणचा भोंगळ कारभार पहावयास मिळत आहे. बहुतांश भागातील डीपींना झाकणे नाहीत तर काही डीपी दिवस-रात्र उघड्या आहेत. त्यामुळे मोठा अपघात घडू शकतो. विजेच्या खांबांमध्ये असलेले जास्त अंतर यामुळे काही ठिकाणी तारा लोंबकळल्या आहेत. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याचे गांभीर्य लक्षात घेऊन जीर्ण विद्युत तारा व विजेचे खांब तत्काळ बदलावेत अशी येथील जनतेची मागणी आहे. याबाबत कनिष्ठ अभियंता जी.एस.सूर्यवंशी यांना विचारले असता शनिवारपर्यंत वीज येईल असे सांगण्यात आले. (वार्ताहर)