शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

केवाळे ब्रिज बनला धोकादायक, पर्यायी पुलाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 03:09 IST

पर्यायी पुलाची गरज : अरुंद पुलामुळे अपघाताची शक्यता

मयूर तांबडे

पनवेल : तालुक्यातील केवाळे जवळील अरुंद पुलामुळे नागरिकांना वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे. तसेच या पुलाला खालील बाजूस असणारे स्टील गंजू लागले असल्याने हा पूल धोकादायक बनला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे येथे दुसरा पूल बांधण्याची मागणी नागरिक करत आहेत.

पनवेल तालुक्यातील केवाळे गावाजवळ असलेल्या नदीवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत वाकडी व केवाळे गावाला जोडण्यासाठी पूल बांधण्यात आलेला आहे. मात्र वाढत्या लोकसंख्येचा विचार न करता हा पूल बांधण्यात आला असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. पूल अरुंद असल्याने एका वेळी एकच चारचाकी गाडी जात आहे त्यामुळे इतर मोठ्या वाहनांना थांबावे लागत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. पुलाच्या खाली बाजूस असणाऱ्या लोखंडी सळ्या दिसू लागल्याने पुलावरून वाहतूक करणे धोकादायक झाले आहे. खालील बाजूचे सिमेंटचे प्लास्टर देखील गळू लागले आहे. त्यामुळे या पुलाची डागडुजीकरण करण्याची आवश्यकता आहे. वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी दुसरा पूल देखील आवश्यक आहे. या भागात केवाळे, वाकडी, चिंचवली, उसर्ली, दुंदरे, मोरबे यांच्यासह आदिवासी वाड्यांचे प्रमाण अधिक आहे. पनवेल परिसरात विमानतळ होत असल्याने या परिसराचा कायापालट होताना दिसत आहे. त्यामुळे मोठमोठ्या इमारती व नवनवीन प्रोजेक्ट या परिसरात येत आहेत. मात्र अरुंद पुलामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. पुलाखालील बांधकामाचे स्टील गंजू लागल्याने तो खचण्याची भीती नागरिकांना वाटत आहे.केवाळे येथील हा जुना पूल पाडून त्याजागी दुसरा मोठा व रु ंद नवीन पूल बांधण्यात येणार आहे. लवकरच त्या कामाला सुरु वात करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे देण्यात आली आहे.केवाळे येथील पुलाची अवस्था दयनीय झालेली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडण्यापूर्वी त्याची डागडुजी करण्यात यावी व दुसरा पूल बांधण्यात यावा. ङ्क्त- रमेश पाटील,उपसरपंच, दुंदरे ग्रामपंचायत

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईpanvelपनवेल