शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

केवाळे ब्रिज बनला धोकादायक, पर्यायी पुलाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 03:09 IST

पर्यायी पुलाची गरज : अरुंद पुलामुळे अपघाताची शक्यता

मयूर तांबडे

पनवेल : तालुक्यातील केवाळे जवळील अरुंद पुलामुळे नागरिकांना वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे. तसेच या पुलाला खालील बाजूस असणारे स्टील गंजू लागले असल्याने हा पूल धोकादायक बनला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे येथे दुसरा पूल बांधण्याची मागणी नागरिक करत आहेत.

पनवेल तालुक्यातील केवाळे गावाजवळ असलेल्या नदीवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत वाकडी व केवाळे गावाला जोडण्यासाठी पूल बांधण्यात आलेला आहे. मात्र वाढत्या लोकसंख्येचा विचार न करता हा पूल बांधण्यात आला असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. पूल अरुंद असल्याने एका वेळी एकच चारचाकी गाडी जात आहे त्यामुळे इतर मोठ्या वाहनांना थांबावे लागत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. पुलाच्या खाली बाजूस असणाऱ्या लोखंडी सळ्या दिसू लागल्याने पुलावरून वाहतूक करणे धोकादायक झाले आहे. खालील बाजूचे सिमेंटचे प्लास्टर देखील गळू लागले आहे. त्यामुळे या पुलाची डागडुजीकरण करण्याची आवश्यकता आहे. वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी दुसरा पूल देखील आवश्यक आहे. या भागात केवाळे, वाकडी, चिंचवली, उसर्ली, दुंदरे, मोरबे यांच्यासह आदिवासी वाड्यांचे प्रमाण अधिक आहे. पनवेल परिसरात विमानतळ होत असल्याने या परिसराचा कायापालट होताना दिसत आहे. त्यामुळे मोठमोठ्या इमारती व नवनवीन प्रोजेक्ट या परिसरात येत आहेत. मात्र अरुंद पुलामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. पुलाखालील बांधकामाचे स्टील गंजू लागल्याने तो खचण्याची भीती नागरिकांना वाटत आहे.केवाळे येथील हा जुना पूल पाडून त्याजागी दुसरा मोठा व रु ंद नवीन पूल बांधण्यात येणार आहे. लवकरच त्या कामाला सुरु वात करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे देण्यात आली आहे.केवाळे येथील पुलाची अवस्था दयनीय झालेली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडण्यापूर्वी त्याची डागडुजी करण्यात यावी व दुसरा पूल बांधण्यात यावा. ङ्क्त- रमेश पाटील,उपसरपंच, दुंदरे ग्रामपंचायत

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईpanvelपनवेल