शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

दगाफटका टाळण्यासाठी नगरसेवकांवर पाळत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 02:48 IST

कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये नगरसेवक फोडण्याची शक्यता गृहीत धरून, सर्वपक्षीयांनी काळजी घेण्यास सुरुवात केली आहे.

वैभव गायकर पनवेल : कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये नगरसेवक फोडण्याची शक्यता गृहीत धरून, सर्वपक्षीयांनी काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. शेतकरी कामगार पक्षाने त्यांचे नगरसेवक गोव्याला हलविले असून, भाजपाने खोपोलीमधील अ‍ॅडलॅब इमॅजिकामध्ये नगरसेवकांना पाठविले आहे.कर्नाटकामध्ये उद्भवलेल्या परिस्थितीची प्रचिती जणू स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत येत आहे. राज्यातील राजकारणात आपले वेगळे अस्तित्व निर्माण करणारे राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी आपल्या मुलाला अनिकेत तटकरेला या निवडणुकीत उतरविले आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. निवडणुकीत दगाफटका होऊ नये, म्हणून इतर स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्रतिनिधींसह पनवेल शेकापचे नगरसेवक मागील दोन दिवसांपासून २९ पैकी जवळ जवळ २५ नगरसेवक गोव्यामध्ये आहेत. तर भाजपाचेही नगरसेवक शुक्र वारी खोपोली येथील अ‍ॅडलॅब इमॅजिका येथे रवाना झाले.भाजपाच्या ५४ नागरसेवकांपैकी ४४ नगरसेवक सध्या इमॅजिका या ठिकाणी आहेत. यापैकी निम्मे नगरसेवक कुटुंबासह या ठिकाणी तळ ठोकून आहेत. २१ तारखेला निवडणूक असल्याने पुढील तीन दिवस भाजपा नगरसेवक बाहेरच असणार आहेत. विधानपरिषद निवडणुकीत स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिकेत तटकरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे, त्यामुळे अनिकेत तटकरे यांचे पारडे जड मानले जात आहे. माजी दिवंगत आमदार अशोक साबळे यांचे सुपुत्र अ‍ॅड. राजीव साबळे हे तटकरेंना अव्हान देत आहेत. सेना-भाजपाची या मतदार संघात अघोषित युती असली, तरी पालघरमधील लोकसभेच्या जागेसाठी सुरू असलेले शीतयुद्धाचे परिणाम या ठिकाणी उमटण्याची शक्यता आहे, त्यामुळे भाजपाची भूमिका निर्णायक असणार आहे.> पक्षीय बलाबलया निवडणुकीत एकूण ९४१ मतदार आहेत. ४४१ ही मॅजिक फिगर आहे. काँग्रेस राष्ट्रवादी, शेकाप, मनसेचे एकूण ३५० मतदान आहे. मात्र, राज ठाकरेंनी आमचा कोणालाच पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केल्याने, मनसेची २५ मते कमी होण्याची शक्यता आहे. स्वाभिमानी पक्षाची ९६ मते निर्णायक असणार आहेत. यामध्ये फोडाफोडीचे राजकारण महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. केंद्रीय मंत्री अनंत गीते, माजी आमदार मधुकर ठाकूर हे तटकरेंचे राजकीय वैरी मानेल जातात, त्यामुळे यांची भूमिकादेखील महत्त्वाची असणार आहे.