शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
3
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
4
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
5
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
6
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
7
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
8
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
9
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
10
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
11
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
12
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
13
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
14
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
15
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
16
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
17
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
18
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
19
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
20
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय

केडीएमटीची छुपी भाडेवाढ

By admin | Updated: December 11, 2015 01:20 IST

सुट्ट्या पैशावरून कंडक्टर आणि प्रवासी यांच्यात तू तू मै मै होत असल्याने बसचे किमान भाडे ६ रुपयांवरून ५ रुपये करण्याचा निर्णय कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या

कल्याण : सुट्ट्या पैशावरून कंडक्टर आणि प्रवासी यांच्यात तू तू मै मै होत असल्याने बसचे किमान भाडे ६ रुपयांवरून ५ रुपये करण्याचा निर्णय कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन समितीच्या बैठकीत गुरुवारी घेण्यात आला. महासभेची मंजुरी मिळताच हे नवे दर लागू होतील. त्यामुळे किमान टप्प्याचा प्रवास करणाऱ्यांना एक रुपयांचा दिलासा मिळाला असला तरी दूरच्या टप्प्यांचा प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला खार लागणार असल्याने प्रवाशांमध्ये कही खुशी, कही गम, असे वातावरण आहे.बसच्या २ कि.मी पर्यंतच्या प्रवासाचे भाडे ६ रूपयांवरून ५ रूपयांवर येणार आहे तर पुढील काही टप्प्यातील भाडयांमध्ये २, ४, ५ रूपयांनी वाढ होणार आहे. वेळोवेळी झालेल्या डिझेल दरवाढीच्या अनुषंगाने मागील १५ वर्षात ८ वेळा प्रवासी तिकिट दरात वाढ करण्यात आली आहे. ८ वी भाडेवाढ ५ जानेवारी २०१५ पासून लागू करण्यात आली.>>> परिवहनचा तोटा कमी?या भाडेवाढीनंतर सरासरी प्रवासी उत्पन्न १ कोटी ९० लाख असून महिन्याचा खर्च ३ कोटी १७ लाख होत आहे. हे पाहता परिवहन उपक्रमाला महिन्याला १ कोटी २७ लाख इतका तोटा सहन करावा लागत आहे. किमान भाडे सहा रुपये असल्याने सुट्टे पैसे देण्यावरून वाहक आणि प्रवासी यांच्यात वाद निर्माण होत असत. तसेच बाजारात सुट्टया नाण्यांची चणचण मोठया प्रमाणावर भासत आहे. परिवहन समितीच्या बैठकीत फारशी चर्चा न करता सभापती नितिन पाटील यांनी प्रस्ताव मंजूर केल्याचे जाहीर केले. तिकिट दरात अशत: वाढ आणि सुसूत्रता आणणे जरूरीचे होते. यामुळे हा प्रस्ताव दाखल करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.