शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

कर्जत-नेरळ सिग्नल यंत्रणा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 00:41 IST

मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे विस्कळीत

नेरळ : शुक्रवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे. रेल्वेने रविवारी काही भागात दुरुस्तीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक घेतला आहे. मात्र कल्याण-कर्जत भागात असा कोणताही ब्लॉक घेण्यात आला नव्हता. मात्र पूर्ण सिग्नल यंत्रणा ही बंद करून ठेवण्यात आली होती. सिग्नलचे खांब ब्लॅक आऊट झालेले दिसत होते.शनिवारी देखील कर्जत लोकल तासभर उशिरा धावत होत्या आणि त्या कल्याण तर कधी ठाणे नावाने पुढे सरकत होत्या. शनिवारी रात्री तर पावसाचा प्रचंड जोर होता, त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक थांबविण्यात आली होती. रविवारी सकाळी उपनगरीय लोकलची सेवा बंद असल्याची उद्घोषणा होत होती. त्याचवेळी सकाळपासून मध्य रेल्वेची सिग्नल यंत्रणा देखील बंद ठेवण्यात आली होती. आणीबाणीच्या काळात सिग्नल यंत्रणा पूर्ण पणे ब्लॅक आऊट केली जाते. त्याप्रमाणे सिग्नलच्या खांबावर लाल, पिवळे, हिरवे असे कोणत्याही रंगाचे दिवे पेटलेले दिसत नव्हते. त्यामुळे अशी अद्भुत परिस्थिती पाहून मुंबईच्या लोकलची प्रतीक्षा करणारे असंख्य पर्यटक हे कर्जत,नेरळ स्थानकात तासनतास बसून होते. त्यात मध्य रेल्वेकडून वाहतूक बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येत असल्याने प्रवासी आणि पर्यटक यांचा जीव धस्स झाला होता. मात्र शनिवारपासून पाऊस सुरू असल्याने स्थानिक कोणी प्रवासी अडकून पडले नसल्याचे चित्र सर्व स्थानकात आहे; परंतु पर्यटक मात्र अडकून पडले होते.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वे