शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
2
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
3
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
4
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
5
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
6
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
7
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
8
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
9
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
10
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
11
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
12
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
13
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
14
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
15
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
16
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
17
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
18
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
19
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
20
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...

कर्जत-नेरळ सिग्नल यंत्रणा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 00:41 IST

मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे विस्कळीत

नेरळ : शुक्रवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे. रेल्वेने रविवारी काही भागात दुरुस्तीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक घेतला आहे. मात्र कल्याण-कर्जत भागात असा कोणताही ब्लॉक घेण्यात आला नव्हता. मात्र पूर्ण सिग्नल यंत्रणा ही बंद करून ठेवण्यात आली होती. सिग्नलचे खांब ब्लॅक आऊट झालेले दिसत होते.शनिवारी देखील कर्जत लोकल तासभर उशिरा धावत होत्या आणि त्या कल्याण तर कधी ठाणे नावाने पुढे सरकत होत्या. शनिवारी रात्री तर पावसाचा प्रचंड जोर होता, त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक थांबविण्यात आली होती. रविवारी सकाळी उपनगरीय लोकलची सेवा बंद असल्याची उद्घोषणा होत होती. त्याचवेळी सकाळपासून मध्य रेल्वेची सिग्नल यंत्रणा देखील बंद ठेवण्यात आली होती. आणीबाणीच्या काळात सिग्नल यंत्रणा पूर्ण पणे ब्लॅक आऊट केली जाते. त्याप्रमाणे सिग्नलच्या खांबावर लाल, पिवळे, हिरवे असे कोणत्याही रंगाचे दिवे पेटलेले दिसत नव्हते. त्यामुळे अशी अद्भुत परिस्थिती पाहून मुंबईच्या लोकलची प्रतीक्षा करणारे असंख्य पर्यटक हे कर्जत,नेरळ स्थानकात तासनतास बसून होते. त्यात मध्य रेल्वेकडून वाहतूक बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येत असल्याने प्रवासी आणि पर्यटक यांचा जीव धस्स झाला होता. मात्र शनिवारपासून पाऊस सुरू असल्याने स्थानिक कोणी प्रवासी अडकून पडले नसल्याचे चित्र सर्व स्थानकात आहे; परंतु पर्यटक मात्र अडकून पडले होते.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वे