शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

कर्जत-कल्याण राज्यमार्ग धोकादायक !

By admin | Updated: October 5, 2016 03:12 IST

कर्जत-कल्याण मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. दोनच वर्षांपूर्वी मुंबई महानगर प्राधिकरण महामंडळ यांच्याकडून नवीन

नेरळ : कर्जत-कल्याण मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. दोनच वर्षांपूर्वी मुंबई महानगर प्राधिकरण महामंडळ यांच्याकडून नवीन रस्त्याचे चौपदीकरणाचे काम करण्यात आले होते. संबंधित ठेकेदाराकडून रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे कर्जत-कल्याण या मार्गावर कर्जतकडे येणारी बाजू काही प्रमाणात सुस्थितीत असल्याने वाहनचालक एकेरी वाहतूक करतात, परंतु काही वाहनचालक बेकायदा अतिवेगाने वाहन चालवत असल्याने या एकेरी वाहतुकीमुळे येथे अपघात होण्याची शक्यता असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे.कल्याण- कर्जत-पळसदरीमार्गे मुंबई- पुणे महामार्गापर्यंत असलेल्या मार्गाचे दोन वर्षांपूर्वी मुंबई महानगर प्राधिकरणामार्फत कोट्यवधी रुपये खर्च करून नवीन चौपदीकरणाचे काम करण्यात आले होते. परंतु संबंधित खाजगी ठेकेदाराकडून अतिशय निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. कर्जत-कल्याण रस्त्याचे काम मागील अनेक वर्षांपासून रखडलेले होते यासाठी संबंधित ठेकेदाराने जलदगतीने काम उरकण्याच्या नादात दर्जाहीन निकृष्ट काम केले, यामुळे थोड्याच दिवसात रस्त्याची स्थिती अतिशय दयनीय झाली असून वाहन चालकांना याचा फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हा रस्ता रायगड आणि ठाणे अशा दोन जिल्ह्यांना जोडला असल्यामुळे नेहमीच या रस्त्यावर वर्दळ असते.कर्जत - कल्याण राज्यमार्गावर दोन वर्षांपूर्वी एमएमआरडीएने चौपदरीकरण केले होते. परंतु काही महिन्यांपूर्वी एमएमआरडीएने या रस्त्यांवरील कर्जत ते शेलूपर्यंतचा भाग हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केला. त्यानंतर या रस्त्यावर कर्जतच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे भरले होते. परंतु काही दिवसातच पुन्हा या रस्त्यावर खड्डेच खड्डे झाल्याने वाहने कशी चालवायची, असा प्रश्न वाहन चालकांना पडला आहे. त्यामुळे अनेक वाहन चालक या रस्त्यावर एकेरी वाहतूक करत आहेत. यामुळे अपघाताची शक्यता आहे. (वार्ताहर) कर्जतहून कल्याण-बदलापूरकडे जाणाऱ्या लेनवर मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वर्दळ असल्याने या लेनवरील रस्त्याची फारच दयनीय अवस्था झाली आहे. कर्जतकडे येणाऱ्या रस्त्याची स्थिती काही प्रमाणात ठीक असल्याने वाहन चालक एकेरी वाहतूक करत आहेत.परंतु काही वाहन चालक अतिशय बेकायदा वेगाने वाहन चालवत असून नियमित शाळेत ने-आण करणाऱ्या वाहनांना तसेच दुचाकीस्वारांसाठी धोकादायक ठरत आहे. यासाठी पोलिसांनी या रस्त्यावरील गस्त वाढवून अतिवेगाने वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मानव विकास सामाजिक संस्था आणि नागरिकांची मागणी आहे. तसेच बांधकाम विभागाने या रस्त्यावर लवकरात लवकर दुरु स्ती करावी, अशी मागणी प्रवासी, वाहनचालकांकडून केली जात आहे.मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर खड्डेरोहा : मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गावर मध्यवर्ती ठिकाणी वसलेल्या कोलाड-खांब रस्त्याच्या दरम्यान ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. यामुळे नेहमीच रहदारी असणाऱ्या या महामार्गावर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे जीव मुठीत घेऊनच प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या मुंबई- गोवा महामार्गावर गणेशोत्सव काळात खड्डे भरण्यात आले होते. मात्र गणपतीनंतर कोकणात मुसळधार पाऊस दाखल झाल्याने पुन्हा मुंबई- गोवा महामार्गावर कोलाड व खांब परिसरात खड्डे पडले आहेत. हा परिसर नेहमी गजबजलेला असतो. या महामार्गावरून दिवसभरात हजारो प्रवासी प्रवास करत असतात. तसेच कोलाड या ठिकाणाहून धाटाव व विळा एमआयडीसी जवळ येत असल्यामुळे येथे जाणाऱ्या मालवाहू कंटेनर व अवजड वाहनाची संख्या मोठ्या प्रमाणात असते. एकंदरीत अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे कोलाड ते खांब दरम्यान महामार्गावर मोठमोठे खड्डे पडलेले दिसत आहेत. याचा सर्वाधिक त्रास प्रवाशांना होत असल्याने प्रवाशांमध्ये संतापाचे वातवरण पसरले आहे. तरी प्रवासी वर्गाला कायम डोकेदुखी ठरणाऱ्या व अपघाताला आमंत्रण देणाऱ्या मुंबई -गोवा महामार्गावरील कोलाड ते खांब परिसरातील खड्डे लवकरात लवकर भरावे, अशी मागणी कोलाड तेथील सामाजिक कार्यकर्ते शंकर महाबळे आणि पुई गावचे माजी सरपंच संजय मांडलुस्कर यांनी केली आहे.(वार्ताहर)