शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
2
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
3
२ मुख्यमंत्र्यांना अटक करून चर्चेत आलेले ईडीमधील दिग्गज अधिकाऱ्याने अचानक का दिला राजीनामा?
4
Reliance Q1 Results: ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या
5
Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा
6
धक्कादायक! ठाण्यात रेल्वे प्लॅटफॉर्मवर महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच मालगाडीसमोर ढकललं
7
ऋतुराज गायकवाडनं चांगली संधी गमावली! आयत्या वेळी इंग्लंडला न जाण्याचा निर्णय घेत संघाला दिला धक्का
8
मुलींसाठी पार्टनरने घेतली होती खेळणी, पण रशियन महिलेची भेटच झाली नाही; गुहेतील कुटुंबाबत नवी माहिती
9
या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अ‍ॅक्शनमोडवर
10
अतूट नातं! "पतीची सेवा करणं हेच..."; पाठीवर घेऊन पत्नीने पूर्ण केली १५० किमीची कावड यात्रा
11
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
12
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
13
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
14
'गुगल अन् मेटा'च्या अडचणी वाढणार! ईडीने पाठवली नोटीस, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशीसाठी बोलावले
15
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
16
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
17
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
18
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
19
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
20
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत

कळंबोली अग्निशमन केंद्राचा झाला कोंडवाडा

By admin | Updated: January 31, 2016 02:30 IST

सिडकोच्या कळंबोली अग्निशमन दलाचा कोंडवाडा झाला आहे. वीज नसल्याने दोन पैकी एक इमारतीचा वापर होत नाही. एका इमारतीमध्ये चार ते पाच कर्मचाऱ्यांना रहावे लागत आहे.

- नामदेव मोरे,  नवी मुंबई

सिडकोच्या कळंबोली अग्निशमन दलाचा कोंडवाडा झाला आहे. वीज नसल्याने दोन पैकी एक इमारतीचा वापर होत नाही. एका इमारतीमध्ये चार ते पाच कर्मचाऱ्यांना रहावे लागत आहे. जवानांना तळमजल्यावरून तिसऱ्या मजल्यापर्यंत पाणी घेवून जावे लागत असून अस्वच्छतेमुळे डेंगू, मलेरियाची साथ पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विमानतळ, मेट्रो व इतर भव्य प्रकल्प उभारण्यास प्राधान्य देणारी सिडको अग्निशमन सारख्या अतीमहत्वाच्या विभागाकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होवू लागला आहे. अग्निशमन यंत्रणा सक्षम नसल्याने रहिवाशांची सुरक्षा धोक्यात आहेच. परंतू जे जवान आग विझविण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालतात त्यांनाही आवश्यक सुविधा मिळत नाहीत. कळंबोली अग्निशमन केंद्राची मागील काही वर्षात प्रचंड दुरवस्था झाली आहे. याठिकाणी अनेक नवीन रिस्क्यू व्हॅन दिसत असल्या तरी त्यांचा वापर होत नाही. अनेक महिन्यांपासून धुळ घात आहेत. केंद्रामध्ये फक्त एकच फायर इंजीन सुस्थितीमध्ये असून इतर सर्व वाहने भंगार झाली आहेत. उपलब्ध वाहनाचा वापर करून जास्तीत जास्त सहाव्या मजल्यापर्यंतची आग विझविता येते. अग्निशमन केंद्रामध्ये कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी दोन इमारती बांधल्या आहेत. यामधील एक इमारतीमध्ये वीजपुरवठा बंद असल्याने तीचा वापर होत नाही. एकाच इमारतीमध्ये सर्व कर्मचाऱ्यांची सोय केली आहे. एका खोलीत चार ते पाच कर्मचारी दाटीवाटीने रहात आहेत. इमारतीमध्ये पाणी उपलब्ध होत नाही. यामुळे कर्मचाऱ्यांना तळमजल्यावरून स्वत: इमारतीमध्ये पाणी घेवून जावे लागत आहे. येथील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी सिडकोने पाच हजार लिटर क्षमतेचे दोन भुमीगत जलकुंभ तयार केले होते. परंतु निकृष्ट दर्जाचे काम असल्यामुळे तिन महिन्यातच त्यांची दुरावस्था झाली आहे. या जलकुंभाचा काहीही उपयोग होत नाही. यामध्ये साचलेल्या पाण्यामुळे परिसरात डेंगू व मलेरियाची साथ पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सिडकोने अग्निशमन दलामध्ये नवीन जवानांची भरती केली आहे. तिन महिन्यापासून काम करणाऱ्या अनेक जवानांना अद्याप गणवेश दिलेला नाही. आग विझविण्यासाठी फायरप्रुप जॅकेट नाही. बुट नसल्याने चप्पल घालून आग विझविण्यासाठी जावे लागत आहे. आग विझविताना दुर्घटना होण्याचीही शक्यता असल्याने कर्मचाऱ्यांचा आपघात विमा काढणे अत्यंत आवश्यक असते. परंतु नवीन भरती केलेल्या जवानांचा अद्याप विमा काढण्यात आलेला नाही. अग्निशमन अधिकारी जीवावर उधार होवून काम करत आहेत. तिजोरीत करोडो रूपये असताना अग्निशमन दलामधील जवानांना भेडसावणारे प्रश्न सोडविण्यासाठी खर्च का केला जात नाही असा प्रश्न विचारला जात आहे. यापुर्वी २००५ मध्ये आग विझविताना टी. आर. घरत हा जवान शहीद झाला होता. यानंतर दहा वर्षातही काहीच सुधारणा झाल्या नसल्याची खंत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. जलकुंभाच्या कामाची चौकशी कराअग्निशमन केंद्रामध्ये एक वर्षापूर्वी प्रत्येकी पाच हजार लिटर क्षमतेचे दोन जलकुंभ बसविले आहेत. तीन महिन्यात प्लास्टीकच्या टाक्या तुटल्या आहेत. वापर न होणाऱ्या या टाक्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे डेंगू, मलेरियाची साथ पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निकृष्ट पाण्याच्या टाक्या बसविल्याच्या कामाची अद्याप चौकशीही केलेली नाही. अधिकाऱ्यांना २४ तास पाणीकळंबोली अग्निशमन केंद्रातील अधिकाऱ्यांच्या सदनीकेमध्ये चोवीस तास पाणीपुरवठा होत आहे. परंतू ज्या इमारतीमध्ये कोंडवाड्याप्रमाणे जवानांच्या राहण्याची सोय केली त्यांच्यासाठी गरजेपुरते पाणीही मिळत नाही. कर्मचाऱ्यांना अनेकवेळा इमारतीच्या बाजूला असणाऱ्या नळावरून पाणी घेवून जावे लागत आहे. ही तफावत कधी दुर होणार अशी विचारणा केली जात आहे. कर्मचाऱ्यांची ही गैरसोय दुर करावी, इमारतीमधील विजपुरवठा व इतर कामे करून ती कर्मचाऱ्यांसाठी खुली करण्याची मागणी केली आहे. अधिकाऱ्यांना २४ तास पाणीकळंबोली अग्निशमन केंद्रातील अधिकाऱ्यांच्या सदनीकेमध्ये चोवीस तास पाणीपुरवठा होत आहे. परंतू ज्या इमारतीमध्ये कोंडवाड्याप्रमाणे जवानांच्या राहण्याची सोय केली त्यांच्यासाठी गरजेपुरते पाणीही मिळत नाही. कर्मचाऱ्यांना अनेकवेळा इमारतीच्या बाजूला असणाऱ्या नळावरून पाणी घेवून जावे लागत आहे. ही तफावत कधी दुर होणार अशी विचारणा केली जात आहे. कर्मचाऱ्यांची ही गैरसोय दुर करावी, इमारतीमधील विजपुरवठा व इतर कामे करून ती कर्मचाऱ्यांसाठी खुली करण्याची मागणी केली आहे. सिडकोने प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांना कंत्राटी स्वरूपात वाहन चालक म्हणून अग्निशमन दलात भरती केले आहे. अद्याप कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेतले जात नाही. प्रशासनाने नवीन भरती केली परंतू अनेक वर्षापासून काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना अद्याप न्याय दिला जात नसल्याने चालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.