शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पाण्यासाठी कळंबोलीत मोर्चा; एलआयजी परिसरामध्ये अपुरा पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 00:44 IST

कळंबोली वसाहतीत सेक्टर-३ मधील एलआयजी टाइपच्या घरांत गेल्या काही दिवसांपासून पाणी आले नाही, त्यामुळे येथील रहिवाशांवर पाणी, पाणी म्हणण्याची वेळ आल्याचे चित्र आहे.

कळंबोली : कळंबोली वसाहतीत सेक्टर-३ मधील एलआयजी टाइपच्या घरांत गेल्या काही दिवसांपासून पाणी आले नाही, त्यामुळे येथील रहिवाशांवर पाणी, पाणी म्हणण्याची वेळ आल्याचे चित्र आहे. याच कारणाने महिलांनी थेट कळंबोली येथील सिडको कार्यालय गाठले आणि तिथे ठिय्या मांडला. त्यामुळे सिडकोचे बेलापूर येथील कार्यकारी अभियंता गजानन दलाल यांना त्या ठिकाणी यावे लागले. त्यांच्याकडून ठोस आश्वासन दिल्यानंतर महिलांनी कार्यालये सोडले.कळंबोलीत सिडकोने एलआयजी टाइपची घरे बांधली आहेत. त्या ठिकाणी अनेक बऱ्याच समस्या व प्रश्नांनी डोके वर काढल्याची वस्तुस्थिती आहे. या परिसरात पाण्याची खूप म्हणजे खूपच ओरड सुरू आहे. सेक्टर-३ मध्ये पाणीच येत नाही. सोडले तरी ते रात्री २-३ वाजता सोडले जाते. थेट एमजेपीकडून येणारे पाणी या भागाला येत असल्याने शटडाउन व सुट्टीच्या वेळी पाण्याचा गंभीर प्रश्न असतोच. त्याशिवाय सिडकोकडून योग्य नियोजन करण्यात येत नसल्याने एलआयजींच्या घरांना पाणीच मिळत नाही. गेल्या महिन्याभरापासून अतिशय बिकट परिस्थिती आहे. त्यानुसार सिडकोकडे वारंवार तक्र ारीही करण्यात आल्या. मात्र, परिस्थितीत बदल अजिबात झाला नाही. त्या कारणाने या भागातील महिलांच्या नगरसेविका मोनिका महानवर व कमल कदम यांनी मोर्चा काढला. १०० पेक्षा जास्त महिला पाणीपुरवठा विभागात गेल्या. मात्र, तिथे अधिकारी तसेच जबाबदार व्यक्ती नसल्याने सर्वांनी संताप व्यक्त केला. जोपर्यंत कोणी येत नाही, तोपर्यंत कार्यालयाच्या परिसरातून हलायचे नाही, अशी भूमिका सर्वांनी घेतली. दुपारी १.४५ वाजता कार्यकारी अभियंता गजानन दलाल हे कळंबोली कार्यालयात आले. आंदोलनामध्ये मोनिका महानवर, कमल कदम व इतर मान्यवर उपस्थित होते. केवळ एकाच दिवसाचे नाही तर गेल्या काही वर्षांपासून सेक्टर-३ ला पाणी येत नसल्याबद्दल आंदोलकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.अधिकारी निवडणूक ड्युटीवरया विभागाच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी असलेले गणेश चंदनकर यांना ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक ड्युटी लावण्यात आली आहे. तर सहायक कार्यकारी अभियंता चंद्रहास सोनकुसरे यांनाही निवडणुकीत नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे, त्यामुळे कळंबोलीतील पाण्याचे नियोजन, तक्र ारी निवारणार्थ अधिकारीच नाही.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई