शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

पाण्यासाठी कळंबोलीत मोर्चा; एलआयजी परिसरामध्ये अपुरा पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 00:44 IST

कळंबोली वसाहतीत सेक्टर-३ मधील एलआयजी टाइपच्या घरांत गेल्या काही दिवसांपासून पाणी आले नाही, त्यामुळे येथील रहिवाशांवर पाणी, पाणी म्हणण्याची वेळ आल्याचे चित्र आहे.

कळंबोली : कळंबोली वसाहतीत सेक्टर-३ मधील एलआयजी टाइपच्या घरांत गेल्या काही दिवसांपासून पाणी आले नाही, त्यामुळे येथील रहिवाशांवर पाणी, पाणी म्हणण्याची वेळ आल्याचे चित्र आहे. याच कारणाने महिलांनी थेट कळंबोली येथील सिडको कार्यालय गाठले आणि तिथे ठिय्या मांडला. त्यामुळे सिडकोचे बेलापूर येथील कार्यकारी अभियंता गजानन दलाल यांना त्या ठिकाणी यावे लागले. त्यांच्याकडून ठोस आश्वासन दिल्यानंतर महिलांनी कार्यालये सोडले.कळंबोलीत सिडकोने एलआयजी टाइपची घरे बांधली आहेत. त्या ठिकाणी अनेक बऱ्याच समस्या व प्रश्नांनी डोके वर काढल्याची वस्तुस्थिती आहे. या परिसरात पाण्याची खूप म्हणजे खूपच ओरड सुरू आहे. सेक्टर-३ मध्ये पाणीच येत नाही. सोडले तरी ते रात्री २-३ वाजता सोडले जाते. थेट एमजेपीकडून येणारे पाणी या भागाला येत असल्याने शटडाउन व सुट्टीच्या वेळी पाण्याचा गंभीर प्रश्न असतोच. त्याशिवाय सिडकोकडून योग्य नियोजन करण्यात येत नसल्याने एलआयजींच्या घरांना पाणीच मिळत नाही. गेल्या महिन्याभरापासून अतिशय बिकट परिस्थिती आहे. त्यानुसार सिडकोकडे वारंवार तक्र ारीही करण्यात आल्या. मात्र, परिस्थितीत बदल अजिबात झाला नाही. त्या कारणाने या भागातील महिलांच्या नगरसेविका मोनिका महानवर व कमल कदम यांनी मोर्चा काढला. १०० पेक्षा जास्त महिला पाणीपुरवठा विभागात गेल्या. मात्र, तिथे अधिकारी तसेच जबाबदार व्यक्ती नसल्याने सर्वांनी संताप व्यक्त केला. जोपर्यंत कोणी येत नाही, तोपर्यंत कार्यालयाच्या परिसरातून हलायचे नाही, अशी भूमिका सर्वांनी घेतली. दुपारी १.४५ वाजता कार्यकारी अभियंता गजानन दलाल हे कळंबोली कार्यालयात आले. आंदोलनामध्ये मोनिका महानवर, कमल कदम व इतर मान्यवर उपस्थित होते. केवळ एकाच दिवसाचे नाही तर गेल्या काही वर्षांपासून सेक्टर-३ ला पाणी येत नसल्याबद्दल आंदोलकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.अधिकारी निवडणूक ड्युटीवरया विभागाच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी असलेले गणेश चंदनकर यांना ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक ड्युटी लावण्यात आली आहे. तर सहायक कार्यकारी अभियंता चंद्रहास सोनकुसरे यांनाही निवडणुकीत नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे, त्यामुळे कळंबोलीतील पाण्याचे नियोजन, तक्र ारी निवारणार्थ अधिकारीच नाही.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई