शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
2
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के; पाकिस्तान सीमेजवळही धक्के जाणवले
3
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
4
गुंतवणूकदारांसाठी लॉटरी! ५ वर्षात 'या' शेअरने दिला ४.९९ कोटी रुपये परतावा; अजूनही गुंतवणुकीची संधी?
5
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल! स्वस्त झाले की महागले? जाणून घ्या आजचे दर
6
Amit Thackeray: "युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा"; अमित ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र
7
पाकचा नापाक इरादा भारताला आधीच लक्षात आला, सुवर्ण मंदिरावरील हल्ला 'अशा' प्रकारे उधळून लावला!
8
EPFO चा धमाका! तुमच्या PF आणि पेन्शनमध्ये मोठे बदल, जाणून घ्या ५ महत्त्वाचे अपडेट्स
9
स्वतंत्र झाल्यावर कसा असेल बलुचिस्तान देश? जाणून घ्या
10
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
11
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रावर भडकली टीव्ही अभिनेत्री, म्हणाली- "अशा लोकांना..."
12
'ठरलं तर मग' मालिकेत पुन्हा येतेय 'ही' अभिनेत्री, लेकीच्या जन्मानंतर दोन महिन्यात कमबॅक
13
Jyoti Mlhotra : "माझ्या मुलीला फसवलं जातंय, ती पाकिस्तानला..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांचा खळबळजनक दावा
14
"माझ्या ११ वर्षांच्या मुलाचं निधन झालं अन् मी देव्हाऱ्यातील मूर्ती काढल्या", अभिनेत्याचा मोठा खुलासा
15
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
16
'सितारे जमीन पर' थिएटरमधून थेट युट्यूबवर होणार प्रदर्शित, आमिर खान आणणार PPV मॉडेल
17
बाजारात संमिश्र कल! 'हे' दिग्गज आयटी शेअर घसरले, बँकिंगमध्ये तेजी; एफपीआयचा विश्वास कायम
18
सख्खे शेजारी बनले पक्के वैरी! दारूच्या नशेत वाद विकोपाला गेला; हाणामारीत ३ जणांचा मृत्यू
19
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
20
कैलास मानसरोवर यात्रेसाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार! चीनशी आहे थेट संबंध

जोगेश्वरी-विक्रोळी रोड प्रकल्पबाधितांची फरफट

By admin | Updated: August 3, 2015 02:52 IST

एमएमआरडीमार्फत उभारण्यात आलेल्या जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड प्रकल्पावेळी बाधित झालेल्या सात कुटुंबांची फरफट अद्यापही थांबलेली नाही.

मुंबई : एमएमआरडीमार्फत उभारण्यात आलेल्या जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड प्रकल्पावेळी बाधित झालेल्या सात कुटुंबांची फरफट अद्यापही थांबलेली नाही. गेल्या १५ वर्षांमध्ये तब्बल नऊ वेळा या नागरिकांचे स्थलांतर झाल्यानंतरही त्यांचे योग्य पुनर्वसन झाले नसल्याने हे कुटुंबीय संतप्त झाले आहेत. एमएमआरडीएकडून पुनर्वसन होत नसल्याने प्रकल्पबाधितांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड उभारताना पुलाखालील २२ झोपड्या बाधित झाल्या. यापैकी १३ झोपडीधारकांचे गोरेगाव येथील संतोष नगर येथे पुनर्वसन करण्यात आले. तर यामधील सात झोपडीधारकांना स्पार्क संस्थेने उभारलेल्या महर्षी कर्वे नगर संक्रमण शिबिरामध्ये घरे देण्यात आली. येथे घरासमोर तुंबलेली गटारे आणि त्यामध्येच महावितरणच्या केबल असल्याने हे रहिवासी जीव मुठीत घेऊन वास्तव्य करीत आहेत.कांजूरमार्ग पूर्व हरियाली व्हिलेज येथे एमएमआरडीएमार्फत उभारण्यात आलेल्या इमारतींमध्येही या रहिवाशांना घर देण्यात आले नाही. पात्र असूनही या रहिवाशांची दखल एमएमआरडीएने अद्यापही घेतलेली नाही. स्पार्क संस्थेने या कुटुंबीयांचे योग्य पुनर्वसन करावे, असे पत्र दिल्यानंतरही एमएमआरडीए अधिकारी रहिवाशांना दाद देत नसल्याने रहिवासी संतप्त झाले आहेत.स्थानिक आमदार सुनील राऊत यांनीही प्रकल्पबाधितांचे योग्य पुनर्वसन करण्याची मागणी एमएमआरडीएकडे केली आहे. त्यानंतरही एमएमआरडीए दाद देत नसल्याने प्रकल्पबाधित कुटुंबीय आमरण उपोषण करतील, असा इशारा कांजूरमार्ग रेल्वे पुनर्वसन विस्थापित संघर्ष समितीचे सेक्रेटरी राजाराम रेणुसे यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)