शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
4
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
5
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
6
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
7
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
8
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
9
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
10
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
11
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
12
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
13
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
14
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
15
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
16
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
17
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
18
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
19
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

जेएनपीटी खासगीकरणास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 01:23 IST

जेएनपीटीने कामगारांशी कोणत्याही प्रकारची चर्चा न करता, खासगीकरणाच्या माध्यमातून आॅपरेशन विभागातील एक शिफ्ट ठेकेदारी पद्धतीवर चालविण्याच्या निर्णयावर तिन्ही मान्यताप्राप्त कामगार संघटनांनी तीव्र शब्दात विरोध दर्शविला.

उरण : जेएनपीटीने कामगारांशी कोणत्याही प्रकारची चर्चा न करता, खासगीकरणाच्या माध्यमातून आॅपरेशन विभागातील एक शिफ्ट ठेकेदारी पद्धतीवर चालविण्याच्या निर्णयावर तिन्ही मान्यताप्राप्त कामगार संघटनांनी तीव्र शब्दात विरोध दर्शविला. जेएनपीटीच्या बंदराचा कंटेनर हाताळणीचा घसरता डोलारा सांभाळण्यासाठी कामगार आणि व्यवस्थापन यांनी एकत्रित येऊन संयुक्तरीत्या उपाययोजना करण्याचा निर्णय गुरुवारी आयोजित केलेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती जेएनपीटी अधिकाऱ्यांनी दिली.जेएनपीटीचा व्यवसाय २७ टक्क्यांनी घसरला आहे. जेएनपीटीची सातत्याने होणारी घसरण रोखण्यासाठी आॅपरेशन विभागाची एक शिफ्ट खासगीकरणातून चालविण्याचा निर्णय जेएनपीटीने घेतला आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी जेएनपीटी व्यवस्थापनाने तातडीने बैठक बोलाविली होती. या बैठकीसाठी जेएनपीटीच्या मान्यताप्राप्त संघटनांना आमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये जेएनपीटी कामगार एकता संघटनेचे अध्यक्ष तथा कामगार ट्रस्टी दिनेश पाटील, जेएनपीटी जनरल वर्कर्स युनियनचे सरचिटणीस तथा कामगार ट्रस्टी रवींद्र पाटील, न्हावा शेवा बंदर कामगार (अंतर्गत) संघटनेचे अध्यक्ष दिनेश घरत, माजी कामगार ट्रस्टी तथा संघटनेचे सरचिटणीस भूषण पाटील आणि तिन्ही कामगार संघटनेच्या पदाधिकाºयांसह जेएनपीटीचे विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते. जेएनपीटी कामगारांशी कोणत्याही प्रकारची चर्चा न करता खासगीकरणाच्या माध्यमातून आॅपरेशन विभागातील एक शिफ्ट ठेकेदारी पद्धतीवर चालविण्याच्या निर्णयाला तिन्ही मान्यताप्राप्त कामगार संघटनांनी तीव्र शब्दात जोरदार विरोध दर्शविला. जेएनपीटीची पिछेहाट होण्यात सर्वस्वी व्यवस्थापनच जबाबदार असल्याचा आरोप करतानाच बंदरातील जाणविणाºया उणिवांचा पाढा व्यवस्थापनासमोर मांडला. ट्रॅक्टर, ट्रेलर्सची रोडावलेली संख्या, मेंटेनन्ससाठी लागणाºया स्पेअरपार्टची सातत्याने भासणारी उणीव, कामगार निवृत्त असतानाही मागील २५ वर्षांत न झालेली कामगार भरती, नव्या योजना राबविण्यास व्यवस्थापनाकडून होणारी दिरंगाई आदी जेएनपीटीच्या पिछेहाटीची कारणे ठरू लागल्याचा गंभीर आरोप कामगारांनी बैठकीतूनच केला.व्यवस्थापनानेच कामगारांच्या काही उणिवांवर बोट ठेवत यापुढे कामगार आणि व्यवस्थापन यांनी एकत्रित येऊन जेएनपीटीच्या व्यवसायवाढीसाठी उपाययोजना करण्याचा निर्णय कामगार आणि जेएनपीटी अधिकारी यांच्यात झालेल्या चर्चेअंती घेण्यात आला. आजच्या बैठकीतील चर्चेत झालेला निर्णय संबंधित मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतरच याबाबत ठोस निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती जेएनपीटी अधिकाºयांनी दिली.

टॅग्स :JNPTजेएनपीटीNavi Mumbaiनवी मुंबई