शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

वाढत्या उन्हामुळे प्रचारात लाहीलाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 23:25 IST

कार्यकर्ते घामाघूम : ग्रामीण भागात पायपीट

- मयूर तांबडे

पनवेल : विधानसभा निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. रणरणत्या उन्हात प्रचाराची धुरा सांभाळताना कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात दमछाक होत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांकडून प्रचारात थंड पेयांची व पाण्याची मागणी वाढू लागली आहे.विधानसभा निवडणुकीच्या काळात पनवेलमधील सर्वच पक्षांचे कार्यकर्ते सध्या प्रचारात व्यस्त आहेत. आपल्या पक्षाच्या नेत्याला निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांची लगबग सुरू असून घरोघरी प्रचारावर भर दिला जात आहे. मात्र, ऑक्टोबर हिटमुळे कार्यकर्त्यांचा घाम निघत आहे. त्यामुळे डोक्यावर टोप्या घालूनच सर्व पुरुष आणि महिला कार्यकर्ते फिरताना दिसत आहेत.

निवडणुकीसाठी जेमतेम चार ते पाच दिवस राहिलेले असल्याने उमेदवारांनीही प्रचाराचा जोर वाढवला आहे. तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचाराला वेग आला असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.प्रचारासाठी उमेदवारांकडून वेगवेगळे फंडे वापरण्यात येत असून त्यामध्ये विविध गावांतील सभा, मतदारांसाठी जेवणावळी, घरोघरी जाऊन मतांचा जोगवा मागितला जात आहे.

काही उमेदवार ना प्रचार करीत आहेत, ना मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यामुळे केवळ हौस म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेल्या अशा हौशी उमेदवारांची केवळ प्रसिद्धीपत्रके वर्तमानपत्रांतून घरोघरी पडलेली दिसत आहेत.पनवेल तालुक्यातील काही गावे व वाड्यावस्त्यांपर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्याने पायपीट करीत मतदारांपर्यंत जावे लागत आहे. परिणामी, उमेदवार व कार्यकर्त्यांची चांगलीच दमछाक होत आहे. सोमवार, २१ आॅक्टोबर रोजी मतदान असल्याने प्रचारासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत, त्यामुळे विधानसभा निवडणुकीचा रंग चढू लागला आहे.प्रचारास मिळालेला कमी कालावधीमुळे मतदारांपर्यंत पोहोचताना प्रमुख पक्षांच्या उमेदवारांची चांगलीच दमछाक झाली आहे. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार घरोघरी भेट घेत परिसर पिंजून काढत आहेत. काहींनी हायटेक प्रचार यंत्रणा राबवली असून सोशल मीडियाचा मार्ग अवलंबला आहे.

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019panvel-acपनवेल