शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

एमआयडीसीत अनियमित पाणीपुरवठा; रहिवाशांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 23:58 IST

शहरात सर्वांना समान पाणीपुरवठा करण्याची मागणी

नवी मुंबई : ऐन पावसाळ्यात शहराच्या काही भागातील रहिवाशांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. अनेक भागात अनियमित व अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने रहिवाशांत संभ्रम निर्माण झाला आहे. विशेषत: एमआयडीसी भागातील झोपडपट्ट्यांच्या वसाहतीत पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाची पातळी खालावली आहे. यावर्षी पावसानेही दडी मारली आहे. त्यामुळे पाण्याचे भविष्यकालीन नियोजन म्हणून महापालिकेने पाणीपुरवठ्यात दहा टक्के कपात केली आहे. मात्र अनेक भागात ही कपात जवळपास ५0 टक्केच्या घरात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. कारण घणसोली, कोपरखैरणे, रबाळे या परिसरातील रहिवाशांना मागील काही दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे रहिवाशांचे हाल होत आहेत. कोपरखैरणे सेक्टर १ येथील मागील अनेक वर्षांपासून अनियमित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे परिसरातील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांना टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. यासंदर्भात येथील रहिवाशांनी महापालिकेच्या कोपरखैरणे विभाग कार्यालयात अनेकदा तक्रारी केल्या आहेत. मात्र येथील पाणी प्रश्न सोडविण्यास प्रशासनाला अपयश आले आहे. आता तर शहरात सरसकट दहा टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. त्यामुळे येथील रहिवाशांची कसरत होत आहे.

एमआयडीसी क्षेत्रातील वसाहतींना बारवी धरणातून थेट पाणीपुरवठा होतो. परंतु एमआयडीसीने सुध्दा २५ टक्के पाणीकपात केली आहे. यातच सोमवारी शिळफाटा येथे एमआयडीसीच्या जलवाहिनीला गळती लागली. ही जलवाहिनी दुरुस्त करण्यासाठी तब्बल चोवीस तास लागल्याने या क्षेत्रातील रहिवाशांना तीस ते पस्तीस तास पाणीपुरवठा झाला नाही. बुधवारी सकाळी नियमित पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. परंतु पाण्याचा दाब अत्यंत कमी असल्याने रहिवाशांना हंडाभर पाणीसुध्दा मिळू शकले नाही. ऐन पावसाळ्यात ही परिस्थिती ओढावल्याने नाराजी व्यक्त केली आहे.

गृहनिर्माण सोसायट्यांना नोटिसानागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन संबंधित विभागाकडून करण्यात आले आहे. मात्र अनेक गृहनिर्माण सोसायट्यांकडून पाण्याचा वारेमाप वापर सुरूच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मंजूर कोट्यापेक्षा अधिक पाणी वापर करणाºया शहरातील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांना महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत.

टॅग्स :MIDCएमआयडीसी