शहरं
Join us  
Trending Stories
1
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
2
या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अ‍ॅक्शनमोडवर
3
अतूट नातं! "पतीची सेवा करणं हेच..."; पाठीवर घेऊन पत्नीने पूर्ण केली १५० किमीची कावड यात्रा
4
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
5
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
6
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
7
'गुगल अन् मेटा'च्या अडचणी वाढणार! ईडीने पाठवली नोटीस, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशीसाठी बोलावले
8
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
9
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
10
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
11
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
12
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
13
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
14
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
15
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
16
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
17
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
18
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
19
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
20
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले

बापट यांच्या कंपनी भेटीची चौकशी करा

By admin | Updated: November 12, 2015 02:06 IST

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी खालापूर तालुक्यातील रानसई येथे असलेल्या डाळ उत्पादन करणाऱ्या ईटीसी अ‍ॅग्रो या कंपनीला मंगळवारी दिलेली भेट वादात सापडली आहे

खालापूर : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी खालापूर तालुक्यातील रानसई येथे असलेल्या डाळ उत्पादन करणाऱ्या ईटीसी अ‍ॅग्रो या कंपनीला मंगळवारी दिलेली भेट वादात सापडली आहे. बापट यांची गुढ भेट संशय निर्माण करणारी असून मुख्यमंत्र्यांनी या भेटीची चौकशी करावी अशी मागणी आ. सुरेश लाड यांनी बुधवारी खालापूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे. या कंपनीत जप्त करण्यात आलेला तुरडाळीचा साठा रास्तभाव धान्य दुकानांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना वाटप करावा अशी विनंतीही लाड यांनी केली आहे.खालापूर तालुक्यातील ईटीसी या डाळ उत्पादन करणाऱ्या कंपनीवर धाड टाकून पुरवठा विभागाने २७ आॅक्टोबरला कारवाई करत ५५ कोटी रु पयांची ६ हजार टन तुरडाळ जप्त केली होती. या कंपनीला राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी मंगळवारी भेट दिली मंत्र्यांचा हा दौरा गुप्त ठेवण्यात आला होता. याबाबतचे वृत वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर आ. सुरेश लाड यांनी खालापूरमध्ये पत्रकार परिषद घेवून तुरडाळीचे भाव गगनाला भिडलेले असताना कारवाई केलेल्या ठिकाणी शासकीय यंत्रणेला अंधारात ठेवून अन्न पुरवठा मंत्री कंपनीची पाहणी करत असल्याने संशय निर्माण झाला असून मुख्यमंत्र्यांनी याबाबत चौकशी करून गिरीश बापट कशासाठी आले होते. याचा खुलासा करून संशय दूर करावा अशी मागणी केली आहे.(वार्ताहर)