शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

बापट यांच्या कंपनी भेटीची चौकशी करा

By admin | Updated: November 12, 2015 02:06 IST

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी खालापूर तालुक्यातील रानसई येथे असलेल्या डाळ उत्पादन करणाऱ्या ईटीसी अ‍ॅग्रो या कंपनीला मंगळवारी दिलेली भेट वादात सापडली आहे

खालापूर : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी खालापूर तालुक्यातील रानसई येथे असलेल्या डाळ उत्पादन करणाऱ्या ईटीसी अ‍ॅग्रो या कंपनीला मंगळवारी दिलेली भेट वादात सापडली आहे. बापट यांची गुढ भेट संशय निर्माण करणारी असून मुख्यमंत्र्यांनी या भेटीची चौकशी करावी अशी मागणी आ. सुरेश लाड यांनी बुधवारी खालापूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे. या कंपनीत जप्त करण्यात आलेला तुरडाळीचा साठा रास्तभाव धान्य दुकानांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना वाटप करावा अशी विनंतीही लाड यांनी केली आहे.खालापूर तालुक्यातील ईटीसी या डाळ उत्पादन करणाऱ्या कंपनीवर धाड टाकून पुरवठा विभागाने २७ आॅक्टोबरला कारवाई करत ५५ कोटी रु पयांची ६ हजार टन तुरडाळ जप्त केली होती. या कंपनीला राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी मंगळवारी भेट दिली मंत्र्यांचा हा दौरा गुप्त ठेवण्यात आला होता. याबाबतचे वृत वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर आ. सुरेश लाड यांनी खालापूरमध्ये पत्रकार परिषद घेवून तुरडाळीचे भाव गगनाला भिडलेले असताना कारवाई केलेल्या ठिकाणी शासकीय यंत्रणेला अंधारात ठेवून अन्न पुरवठा मंत्री कंपनीची पाहणी करत असल्याने संशय निर्माण झाला असून मुख्यमंत्र्यांनी याबाबत चौकशी करून गिरीश बापट कशासाठी आले होते. याचा खुलासा करून संशय दूर करावा अशी मागणी केली आहे.(वार्ताहर)