शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

कांदा-बटाट्याची अवैध विक्री सुरूच

By admin | Updated: June 3, 2017 06:39 IST

भाजी मार्केटच्या प्रवेशद्वारावर बाजार समिती, वाहतूक पोलीस व महापालिकेच्या आशीर्वादाने कांदा - बटाट्याची अवैध विक्री

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : भाजी मार्केटच्या प्रवेशद्वारावर बाजार समिती, वाहतूक पोलीस व महापालिकेच्या आशीर्वादाने कांदा - बटाट्याची अवैध विक्री सुरू आहे. यामुळे रोज या परिसरात वाहतूककोंडी होत आहे. पालिकेच्या पदपथाचा वापर गोडावूनप्रमाणे केला जात असून याविषयी ठोस कारवाई केली जात नसल्याने निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची तक्रार त्यांच्या वरिष्ठांकडे करण्यात आली आहे. मुंबई बाजार समिती आवारामध्ये अन्नपूर्णा चौक ते माथाडी भवन दरम्यान रोज वाहतूककोंडी होवू लागली आहे. या वाहतूककोंडीला भाजी व फळ मार्केटच्या बाहेरील फेरीवाले व कांदा-बटाट्याची अवैध विक्री करणारे पूर्णपणे जबाबदार आहेत. भाजी मार्केटच्या प्रवेशद्वारावर व विस्तारित मार्केटच्या मध्ये २६ व्यापारी कांदा - बटाट्याची विक्री करत आहेत. पादचाऱ्यांच्या सुविधेसाठी बनविलेल्या पदपथावर शेकडो गोणी उतरवून ठेवल्या जात आहेत. यामुळे पदपथाची सुरक्षाच धोक्यात आली आहे. पदपथ खचण्याची शक्यता आहे. याशिवाय अतिक्रमणामुळे नागरिकांना रोडवरून चालावे लागत आहे. रोज सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत येथे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. कांदा - बटाट्याच्या अवैध व्यापाराविरोधात ‘लोकमत’ने आवाज उठविल्यानंतर काही दिवस विक्रेत्यांनी येथील व्यवसाय थांबला होता, परंतु नंतर पुन्हा सुरू झाला आहे. दोन दिवसांपूर्वी कारवाई करण्यासाठी गेलेल्या बाजार समितीच्या सुरक्षा रक्षकांना व्यापाऱ्यांनी हुसकावून लावले. अवैध विक्रेत्यांना वाहतूक पोलीस व महापालिकेच्या तुर्भे विभाग कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे अभय मिळत आहे. विभाग कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांनी कोणी कितीही विरोध केला तरी आम्ही तुम्हाला पाठिंबा देवू अशी आश्वासने दिली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. कारवाई केलीच जात नसल्याने आता काही माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी एपीएमसी वाहतूक चौकीमधील कर्मचारी व अधिकाऱ्यांविषयी पोलीस आयुक्त व उपआयुक्तांकडे व पालिका कर्मचाऱ्यांची महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांच्याकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला असून आयुक्त तरी यावर कारवाई करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुंढेही काही करू शकले नाहीतभाजी मार्केटच्या बाहेरील अवैध कांदा -बटाटा विक्रेत्यांना महापालिकेच्या तुर्भे विभाग कार्यालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यांचे अभय मिळत आहे. यामुळे काही व्यापारी तुकाराम मुंढे असतानाही आमच्यावर कोणी कारवाई करू शकले नाही, मग रामास्वामी एन. यांना भिण्याचे काहीच कारण नाही अशा वल्गना केल्या जावू लागल्या आहेत.बेलापूरमध्ये कारवाई एपीएमसीमध्ये अभय पालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी बेलापूरमध्ये फेरीवाल्यांना अभय दिल्यामुळे दोन कर्मचाऱ्यांवर कारवाई केली. परंतु एपीएमसीमध्ये वारंवार तक्रारी होवून व प्रसारमाध्यमांनी आवाज उठवूनही कारवाई न करणाऱ्यांवर मात्र काहीच कारवाई केली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.