शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

कांदा-बटाट्याची अवैध विक्री सुरूच

By admin | Updated: June 3, 2017 06:39 IST

भाजी मार्केटच्या प्रवेशद्वारावर बाजार समिती, वाहतूक पोलीस व महापालिकेच्या आशीर्वादाने कांदा - बटाट्याची अवैध विक्री

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : भाजी मार्केटच्या प्रवेशद्वारावर बाजार समिती, वाहतूक पोलीस व महापालिकेच्या आशीर्वादाने कांदा - बटाट्याची अवैध विक्री सुरू आहे. यामुळे रोज या परिसरात वाहतूककोंडी होत आहे. पालिकेच्या पदपथाचा वापर गोडावूनप्रमाणे केला जात असून याविषयी ठोस कारवाई केली जात नसल्याने निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची तक्रार त्यांच्या वरिष्ठांकडे करण्यात आली आहे. मुंबई बाजार समिती आवारामध्ये अन्नपूर्णा चौक ते माथाडी भवन दरम्यान रोज वाहतूककोंडी होवू लागली आहे. या वाहतूककोंडीला भाजी व फळ मार्केटच्या बाहेरील फेरीवाले व कांदा-बटाट्याची अवैध विक्री करणारे पूर्णपणे जबाबदार आहेत. भाजी मार्केटच्या प्रवेशद्वारावर व विस्तारित मार्केटच्या मध्ये २६ व्यापारी कांदा - बटाट्याची विक्री करत आहेत. पादचाऱ्यांच्या सुविधेसाठी बनविलेल्या पदपथावर शेकडो गोणी उतरवून ठेवल्या जात आहेत. यामुळे पदपथाची सुरक्षाच धोक्यात आली आहे. पदपथ खचण्याची शक्यता आहे. याशिवाय अतिक्रमणामुळे नागरिकांना रोडवरून चालावे लागत आहे. रोज सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत येथे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. कांदा - बटाट्याच्या अवैध व्यापाराविरोधात ‘लोकमत’ने आवाज उठविल्यानंतर काही दिवस विक्रेत्यांनी येथील व्यवसाय थांबला होता, परंतु नंतर पुन्हा सुरू झाला आहे. दोन दिवसांपूर्वी कारवाई करण्यासाठी गेलेल्या बाजार समितीच्या सुरक्षा रक्षकांना व्यापाऱ्यांनी हुसकावून लावले. अवैध विक्रेत्यांना वाहतूक पोलीस व महापालिकेच्या तुर्भे विभाग कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे अभय मिळत आहे. विभाग कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांनी कोणी कितीही विरोध केला तरी आम्ही तुम्हाला पाठिंबा देवू अशी आश्वासने दिली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. कारवाई केलीच जात नसल्याने आता काही माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी एपीएमसी वाहतूक चौकीमधील कर्मचारी व अधिकाऱ्यांविषयी पोलीस आयुक्त व उपआयुक्तांकडे व पालिका कर्मचाऱ्यांची महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांच्याकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला असून आयुक्त तरी यावर कारवाई करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुंढेही काही करू शकले नाहीतभाजी मार्केटच्या बाहेरील अवैध कांदा -बटाटा विक्रेत्यांना महापालिकेच्या तुर्भे विभाग कार्यालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यांचे अभय मिळत आहे. यामुळे काही व्यापारी तुकाराम मुंढे असतानाही आमच्यावर कोणी कारवाई करू शकले नाही, मग रामास्वामी एन. यांना भिण्याचे काहीच कारण नाही अशा वल्गना केल्या जावू लागल्या आहेत.बेलापूरमध्ये कारवाई एपीएमसीमध्ये अभय पालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी बेलापूरमध्ये फेरीवाल्यांना अभय दिल्यामुळे दोन कर्मचाऱ्यांवर कारवाई केली. परंतु एपीएमसीमध्ये वारंवार तक्रारी होवून व प्रसारमाध्यमांनी आवाज उठवूनही कारवाई न करणाऱ्यांवर मात्र काहीच कारवाई केली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.