शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
4
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
5
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
6
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
7
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
8
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
9
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
10
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
11
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
12
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
13
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
14
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
15
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
16
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
17
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
18
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
19
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
20
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी

उरणमधील कचऱ्यामुळे कांदळवनाचे अस्तित्व धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 22:45 IST

सामाजिक कार्यकर्त्यांची तक्रार; कचरा न टाकण्याचे आदेश

नवी मुंबई : उरण नगरपालिका कार्यक्षेत्रामधील कचरा बोरी पाखाडीजवळील कचरा भुमीवर टाकला जात असून त्यामुळे कांदळवन नष्ट होत आहे. याविषयी सामाजिक कार्यकर्त्यांनी कोकण पाणथळ तक्रार निवारण समितीकडे तक्रार केली आहे. समितीने कांदळवनामध्ये कचरा टाकू नये अशा सूचना दिल्या आहेत.नगरपालिका कार्यक्षेत्रामधील कचरा टाकण्यासाठी जमीन उपलब्ध व्हावी अशी मागणी जिल्हाअधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. जिल्हाअधिकाºयांनी सन २००० मध्ये हनुमान कोळीवाड्याजवळील बोरी पाखाडी येथे भूखंड उपलब्ध करून दिला होता. त्या ठिकाणी कचरा टाकला जात आहे. या कचºयामुळे कांदळवन नष्ट होत असल्याची तक्रार नॅट कनेक्ट संस्थेचे बी. एन. कुमार व श्री एकवीरा आई प्रतिष्ठानचे नंदकुमार पवार यांनी केली होती. याविषयी कोकण पाणथळ तक्रार निवारण समितीच्या बैठकीमध्येही तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेवून जिल्हाअधिकारी प्रशासनास कांदळवनावर कचरा टाकला जावू नये. कांदळवनात जो कचना टाकला असेल तो काढून घेण्यात यावा अशा सूचना दिल्या आहेत. यासाठी एक समितीने घटनास्थळी जावूनही पाहणी केली होती. कांदळवन समितीच्या आदेशामुळे कचरा भुमीमुळे त्रस्त असणाºया नागरिकांना दिलासा मिळणार आहे. पर्यावरण प्रेमींनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे.बोरी पाखाडी मधील कचरा भुमीमुळे परिसरामधील नागरिक त्रस्त झाले होते. कांदळवन नष्ट होवून पर्यावरणाची हानी होत होती. याविषयी अनेक महिन्यांपासून आम्ही पाठपुरावा करत असून कांदळवन समितीने दिलेल्या निर्णयामुळे या लढ्यास यश आले आहे.- बी. एन. कुमार, संस्थापक, नॅड कनेक्ट फाऊंडेशनकचरा भुमीविषयी कांदळवन समितीने काही आदेश दिले असल्याचे ते अद्याप आमच्यापर्यंत पोहचलेले नाहीत. जिल्हाअधिकाºयांनी दिलेल्या जमीनीवरच कचºयाचे विल्हेवाट लावली जात आहे. खारफुटी नष्ट होणार नाही याची काळजी घेत आहोत. पर्यायी जमीन मिळविण्यासाठीही आमचा पाठपुरावा सुरू आहे.- अवधूत तावडे, मुख्याधीकारी, उरण नगरपालिका