शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

उरणमधील कचऱ्यामुळे कांदळवनाचे अस्तित्व धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 22:45 IST

सामाजिक कार्यकर्त्यांची तक्रार; कचरा न टाकण्याचे आदेश

नवी मुंबई : उरण नगरपालिका कार्यक्षेत्रामधील कचरा बोरी पाखाडीजवळील कचरा भुमीवर टाकला जात असून त्यामुळे कांदळवन नष्ट होत आहे. याविषयी सामाजिक कार्यकर्त्यांनी कोकण पाणथळ तक्रार निवारण समितीकडे तक्रार केली आहे. समितीने कांदळवनामध्ये कचरा टाकू नये अशा सूचना दिल्या आहेत.नगरपालिका कार्यक्षेत्रामधील कचरा टाकण्यासाठी जमीन उपलब्ध व्हावी अशी मागणी जिल्हाअधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. जिल्हाअधिकाºयांनी सन २००० मध्ये हनुमान कोळीवाड्याजवळील बोरी पाखाडी येथे भूखंड उपलब्ध करून दिला होता. त्या ठिकाणी कचरा टाकला जात आहे. या कचºयामुळे कांदळवन नष्ट होत असल्याची तक्रार नॅट कनेक्ट संस्थेचे बी. एन. कुमार व श्री एकवीरा आई प्रतिष्ठानचे नंदकुमार पवार यांनी केली होती. याविषयी कोकण पाणथळ तक्रार निवारण समितीच्या बैठकीमध्येही तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेवून जिल्हाअधिकारी प्रशासनास कांदळवनावर कचरा टाकला जावू नये. कांदळवनात जो कचना टाकला असेल तो काढून घेण्यात यावा अशा सूचना दिल्या आहेत. यासाठी एक समितीने घटनास्थळी जावूनही पाहणी केली होती. कांदळवन समितीच्या आदेशामुळे कचरा भुमीमुळे त्रस्त असणाºया नागरिकांना दिलासा मिळणार आहे. पर्यावरण प्रेमींनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे.बोरी पाखाडी मधील कचरा भुमीमुळे परिसरामधील नागरिक त्रस्त झाले होते. कांदळवन नष्ट होवून पर्यावरणाची हानी होत होती. याविषयी अनेक महिन्यांपासून आम्ही पाठपुरावा करत असून कांदळवन समितीने दिलेल्या निर्णयामुळे या लढ्यास यश आले आहे.- बी. एन. कुमार, संस्थापक, नॅड कनेक्ट फाऊंडेशनकचरा भुमीविषयी कांदळवन समितीने काही आदेश दिले असल्याचे ते अद्याप आमच्यापर्यंत पोहचलेले नाहीत. जिल्हाअधिकाºयांनी दिलेल्या जमीनीवरच कचºयाचे विल्हेवाट लावली जात आहे. खारफुटी नष्ट होणार नाही याची काळजी घेत आहोत. पर्यायी जमीन मिळविण्यासाठीही आमचा पाठपुरावा सुरू आहे.- अवधूत तावडे, मुख्याधीकारी, उरण नगरपालिका