शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
3
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
4
"रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?" मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
5
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
6
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
7
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
8
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
10
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
11
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
12
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
13
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
14
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
15
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
16
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
17
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
19
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
20
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!

उरणमध्ये इंटरनेट सेवा कोलमडली

By admin | Updated: June 14, 2017 03:20 IST

तालुक्यात एमटीएनएलची इंटरनेट सेवा मागील काही दिवसांपासून पुरती कोलमडली आहे. इंटरनेट सेवा कोलमडल्याचा फटका उरण तालुक्यातील जेएनपीटी, शेवा,

लोकमत न्यूज नेटवर्कउरण : तालुक्यात एमटीएनएलची इंटरनेट सेवा मागील काही दिवसांपासून पुरती कोलमडली आहे. इंटरनेट सेवा कोलमडल्याचा फटका उरण तालुक्यातील जेएनपीटी, शेवा, एनएडी, जासई, उरण शहर आदि विभागातील हजारो ग्राहकांना बसला आहे. बंद पडलेल्या इंटरनेट सेवेमुळे मंगळवारी दहावीचा निकालही शेकडो विद्यार्थी, पालकांना सायबर कॅफेत जाऊन पैसे मोजून पहावा लागल्याने एमटीएनएलच्या गलथान कारभाराबाबत ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.उरण तालुक्यातील एमटीएनएलची इंटरनेट सेवा मागील महिनाभरापासून कोलमडली आहे. खंडित झालेल्या इंटरनेट सेवेचा फटका येथील हजारो ग्राहकांबरोबरच परिसरातील अनेक महत्त्वाच्या कंपन्यांनाही बसला आहे. याबाबत तक्रार करण्याचीही सोय उरलेली नाही. कारण तक्रार घेवून जाणाऱ्या ग्राहकांना उरण एमटीएनएलचे अधिकारी तकलादू आणि थातूरमातूर उत्तरे देवून वाटेला लावून देत आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या संतापाचा पारा अधिकच चढू लागला आहे. मंगळवारी दहावीचा रिझल्ट आॅनलाइन जाहीर करण्यात आला होता. मात्र बंद पडलेल्या इंरटनेट सेवेमुळे मंगळवारी दहावीचा रिझल्टही शेकडो विद्यार्थी पालकांनी सायबर कॅॅफेत जावून पैसे मोजून पहावा लागला. त्यामुळे अनेक ग्राहकांनी एमटीएनएलच्या कार्यालयात जाऊन विचारणा केली असता उरण जासई दरम्यान सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरण आणि मजबुतीकरणाच्या कामामुळे वारंवार आॅप्टिकल फायबरच्या केबल्स तोडल्या जात आहेत. त्यामुळेच उरणमधील इंटरनेट सेवा कोलमडली असल्याची माहिती डीएम एल. आर. यादव यांनी दिली. दुरुस्तीचे काम सुरू असून अधिक माहितीसाठी जीएम कार्यालयाशी संपर्क साधावा असा सल्लाही त्यांनी दिला.एमटीएनएलचे जीएम नंदलाल सत्यदेव यांनीही उरण परिसरातील इंटरनेटसेवा मागील पाच दिवसांपासून कोलमडली असल्याचे मान्य करून दुरुस्तीनंतरच सेवा पूर्वपदावर येणार असल्याचा दावा केला आहे. याबाबत कामगार सेनेचे अध्यक्ष खा. अरविंद सावंत यांनीही लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे.मात्र उरण येथील एमटीएनएलच्या दुरुस्तीचे काम अद्याप तरी सुरू झाले नसल्याने इंटरनेट सेवा कधी पूर्वपदावर येईल याची शाश्वती नसल्याचे कर्मचाऱ्यांकडूनच सांगण्यात येत आहे. वारंवार होणाऱ्या इंटरनेट सेवा दुरुस्तीमध्ये अधिकारी वर्गालाच फारसे स्वारस्य नाही. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होण्यात कामचुकार अधिकारी जादा जबाबदार असल्याचा आरोपही कर्मचारी वर्गातून केला जात आहे.मात्र उरण परिसरातील कोलमडलेल्या इंटरनेट सेवेमुळे ग्राहकांमध्ये तीव्र असंतोष आहे.