शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

प्रदूषणाबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 00:04 IST

मानवाधिकार आयोगाची कारवाई : २ मार्च रोजी सुनावणी

नवी मुंबई : कोपरी आणि वाशी परिसरातील वायू आणि जलप्रदूषणाबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने महापालिकेला दिले आहेत. या संदर्भात येत्या २ मार्च रोजी सुनावणी होणार आहे.

ठाणे-बेलापूर रस्त्याच्या एका बाजूला औद्योगिक वसाहत, तर दुसऱ्या बाजूला नागरी वसाहती आहेत. औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कारखान्यातील सांडपाणी प्रक्रिया न करताच मोठ्या नाल्याच्या माध्यमातून खाडीत सोडले जाते. पावणे एमआयडीसी येथून एक मोठा नाला कोपरखैरणे सेक्टर ११ मार्गे वाशी सेक्टर २८ आणि २९ येथील वसाहतीमधून पुढे खाडीला जाऊन मिळतो. साधारण चार कि.मी. लांबीच्या व २५० मीटर रुंदीच्या या नाल्याच्या दोन्ही बाजूला नागरी वसाहती आहेत. या वसाहतीतून जवळपास २० हजार रहिवासी राहतात. विशेष म्हणजे, अनेकदा या नाल्यातून प्रक्रिया न केलेले रसायनमिश्रित पाणी सोडले जाते. त्यामुळे हा संपूर्ण नाला प्रदूषित झाला आहे. त्यातून २४ तास उग्र वास येत असल्याने त्याचा नागरी आरोग्यावर परिणाम जाणवत आहे. तसेच पावणे औद्योगिक क्षेत्रातील काही कंपन्यांतून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे कोपरखैरणे, कोपरी आणि वाशीच्या काही भागात मोठ्या प्रमाणात वायुप्रदूषण होत आहे.

सकाळी व सायंकाळच्या वेळी या परिसरात धुके साचल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. याचा प्रत्यक्ष फटका कोपरखैरणे सेक्टर ११, वाशी सेक्टर २८ व २९ मधील रहिवाशांना बसत आहे. प्रदूषणामुळे श्वसन, दमा, टीबी, कॅन्सर अशा जीवघेण्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे.कोपरखैरणे सेक्टर ११ रेसिडेन्स वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातून यासंदर्भात मागील दोन-अडीच वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. विशेष म्हणजे, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने या प्रकरणी कार्यवाही करण्याचे निर्देश प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले होते; परंतु त्यानंतरसुद्धा काही कारवाई करण्यात आली नाही.

या संदर्भात ‘लोकमत’मधून वारंवार वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने या वृत्ताची गंभीर दखल घेत सुओ-मोटो दाखल करून घेतला आहे. यात महापालिकेसह पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संचालक व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. संबंधितांना आयोगाने तशा आशयाच्या नोटिसाही बजावल्या आहेत.

दरम्यान, या प्रकरणी येत्या २ मार्च रोजी आयोगाच्या मुख्यालयात सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे, मागील सुनावणी दरम्यान महापालिकेच्या वतीने या संदर्भातील सविस्तर अहवाल सादर करण्यासाठी वेळ मागून घेतला होता. त्यानुसार २ मार्च रोजीच्या सुनावणी दरम्यान, या परिसरातील प्रदूषणाला आळा घालण्यासाठी संबंधित प्राधिकरणांनी काय उपाययोजना केली, याचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत.