शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

हुतात्म्यांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या आदिवासींवर अन्याय

By admin | Updated: January 5, 2017 06:07 IST

इंग्रजांनी हुतात्मा भाई कोतवाल व हिराजी पाटील यांचे मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिले नव्हते. तीन दिवस उघड्यावर असलेल्या मृतदेहांवर सिद्धगडावरील आदिवासी घिगे

नामदेव मोरे, नवी मुंबईइंग्रजांनी हुतात्मा भाई कोतवाल व हिराजी पाटील यांचे मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिले नव्हते. तीन दिवस उघड्यावर असलेल्या मृतदेहांवर सिद्धगडावरील आदिवासी घिगे कुटुंबीयांनी विधिवत अंत्यसंस्कार केले. ७३ वर्षांपासून समाधीची देखभाल करणाऱ्या या आदिवासींचा साधा सन्मानही शासनाने केला नाहीच; परंतु पिढ्यानपिढ्या कसणारी शेतजमीन व घरांवरील हक्क नाकारून त्यांना बेघर करण्याच्या हालचाली सुरू आहेत. आझाद दस्ता ही स्वातंत्र्यचळवळीतील महत्त्वाची क्रांतिकारी संघटना. रेल्वे रूळ उखडून व विजेचे टॉवर कापून इंग्रजांना जेरीस आणणाऱ्या या संघटनेचे प्रमुख भाई कोतवाल मुरबाड तालुक्यातील सिद्धगडावर इंग्रजांशी लढताना शहीद झाले. त्यांचे सहकारी हिराजी पाटील हेही गोळीबारात ठार झाले. इंग्रजांनी कोतवाल यांचा मृतदेह जवळपास ५०० मीटर फरफटत खाली आणला. वडील व नातेवाइकांच्या ताब्यात मृतदेह देण्यास नकार दिला होता. या मृतदेहावर कोणीही अंत्यसंस्कार करायचे नाहीत, असा आदेश इंग्रजांनी दिला होता; परंतु सिद्धगडावरील देशप्रेमी भागो रावजी घिगे व त्यांचे भाऊ राघो घिगे, बाळा घिगे व कुसा घिगे यांनी त्यांच्या शेतामध्ये या क्रांतिकारकावर अंत्यसंस्कार केले. अंत्यसंस्कार झालेले ठिकाण स्मारक म्हणून जतन केले. २ जानेवारी, १९४३पासून आतापर्यंत ७३ वर्षे घिगे कुटुंबीय स्मारकाची देखभाल करत आहेत. त्यांनी अंत्यसंस्कार केले नसते व घटना कुठे घडली याची माहिती दिली नसती, तर या महान क्रांतिकारकाच्या पराक्रमाच्या रक्ताने पावन झालेली ही वीरभूमी जगाला कळलीच नसती. या कामगिरीसाठी घिगे कुटुंबीयांनाही स्वातंत्र्यसैनिकांचा दर्जा देणे आवश्यक होते. त्यांच्या वारसांना नोकरी व इतर सुविधा देणे आवश्यक होते; मात्र १९७७मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री यशवंतराव चव्हाण व मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते फक्त एक नारळ दिला. भाई कोतवाल यांच्यावर अंत्यसंस्कार करणाऱ्या भागोजी घिगे यांचे चिरंजीव सावळाराम घिगे (वय ७५) व त्यांचे कुटुंबीय समाधीची वर्षभर देखभाल करतात. येथे येणाऱ्या इतिहासप्रेमींना २ जानेवारी, १९४३च्या पहाटे इंग्रजांनी केलेला हल्ला व नंतर हुतात्म्यांच्या पार्थिवाची केलेली अवहेलना ते विद्यमान स्थितीपर्यंतचा सर्व इतिहास सांगण्याचे काम करत आहेत. या कुटुंबीयांचा शासनाकडून उचित सन्मान करण्याऐवजी त्यांना या परिसरातून हाकलून देण्याच्या हालचाली सुरू आहेत. हा परिसर अभयारण्य घोषित झाल्यापासून वनविभाग वारंवार त्यांना नोटीस देत आहे.