शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
2
फडणवीसांबद्दल अपशब्द वापरल्यास जीभ हासडून हातात देऊ; मंत्री नितेश राणेंचा मनोज जरांगेंना इशारा
3
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
4
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
5
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
6
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
7
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर
8
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!
9
स्मशानभूमीला पाणीपट्टीचे बिल पाठवले, १० टक्के सवलतही दिली; महापालिकेचा अजब पराक्रम!
10
जगदीप धनखड नजरकैदेत? अमित शाहांच्या उत्तरावर जयराम रमेश यांची टीका; म्हणाले- 'रहस्य...'
11
'माय फ्रेंड गणेशा' मधला छोटासा मुलगा आता आहे प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा कशी दिसते? (Photos)
12
Jio IPO ची प्रतीक्षा आता संपणार! शुक्रवारी मुकेश अंबानी देणार सरप्राईज?
13
व्हिएतनाममधील ५.८ लाख लोकांना आपली घरं सोडावी लागणार! नेमकं कारण तरी काय?
14
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
15
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
16
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
17
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
18
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
19
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
20
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल

हुतात्म्यांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या आदिवासींवर अन्याय

By admin | Updated: January 5, 2017 06:07 IST

इंग्रजांनी हुतात्मा भाई कोतवाल व हिराजी पाटील यांचे मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिले नव्हते. तीन दिवस उघड्यावर असलेल्या मृतदेहांवर सिद्धगडावरील आदिवासी घिगे

नामदेव मोरे, नवी मुंबईइंग्रजांनी हुतात्मा भाई कोतवाल व हिराजी पाटील यांचे मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिले नव्हते. तीन दिवस उघड्यावर असलेल्या मृतदेहांवर सिद्धगडावरील आदिवासी घिगे कुटुंबीयांनी विधिवत अंत्यसंस्कार केले. ७३ वर्षांपासून समाधीची देखभाल करणाऱ्या या आदिवासींचा साधा सन्मानही शासनाने केला नाहीच; परंतु पिढ्यानपिढ्या कसणारी शेतजमीन व घरांवरील हक्क नाकारून त्यांना बेघर करण्याच्या हालचाली सुरू आहेत. आझाद दस्ता ही स्वातंत्र्यचळवळीतील महत्त्वाची क्रांतिकारी संघटना. रेल्वे रूळ उखडून व विजेचे टॉवर कापून इंग्रजांना जेरीस आणणाऱ्या या संघटनेचे प्रमुख भाई कोतवाल मुरबाड तालुक्यातील सिद्धगडावर इंग्रजांशी लढताना शहीद झाले. त्यांचे सहकारी हिराजी पाटील हेही गोळीबारात ठार झाले. इंग्रजांनी कोतवाल यांचा मृतदेह जवळपास ५०० मीटर फरफटत खाली आणला. वडील व नातेवाइकांच्या ताब्यात मृतदेह देण्यास नकार दिला होता. या मृतदेहावर कोणीही अंत्यसंस्कार करायचे नाहीत, असा आदेश इंग्रजांनी दिला होता; परंतु सिद्धगडावरील देशप्रेमी भागो रावजी घिगे व त्यांचे भाऊ राघो घिगे, बाळा घिगे व कुसा घिगे यांनी त्यांच्या शेतामध्ये या क्रांतिकारकावर अंत्यसंस्कार केले. अंत्यसंस्कार झालेले ठिकाण स्मारक म्हणून जतन केले. २ जानेवारी, १९४३पासून आतापर्यंत ७३ वर्षे घिगे कुटुंबीय स्मारकाची देखभाल करत आहेत. त्यांनी अंत्यसंस्कार केले नसते व घटना कुठे घडली याची माहिती दिली नसती, तर या महान क्रांतिकारकाच्या पराक्रमाच्या रक्ताने पावन झालेली ही वीरभूमी जगाला कळलीच नसती. या कामगिरीसाठी घिगे कुटुंबीयांनाही स्वातंत्र्यसैनिकांचा दर्जा देणे आवश्यक होते. त्यांच्या वारसांना नोकरी व इतर सुविधा देणे आवश्यक होते; मात्र १९७७मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री यशवंतराव चव्हाण व मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते फक्त एक नारळ दिला. भाई कोतवाल यांच्यावर अंत्यसंस्कार करणाऱ्या भागोजी घिगे यांचे चिरंजीव सावळाराम घिगे (वय ७५) व त्यांचे कुटुंबीय समाधीची वर्षभर देखभाल करतात. येथे येणाऱ्या इतिहासप्रेमींना २ जानेवारी, १९४३च्या पहाटे इंग्रजांनी केलेला हल्ला व नंतर हुतात्म्यांच्या पार्थिवाची केलेली अवहेलना ते विद्यमान स्थितीपर्यंतचा सर्व इतिहास सांगण्याचे काम करत आहेत. या कुटुंबीयांचा शासनाकडून उचित सन्मान करण्याऐवजी त्यांना या परिसरातून हाकलून देण्याच्या हालचाली सुरू आहेत. हा परिसर अभयारण्य घोषित झाल्यापासून वनविभाग वारंवार त्यांना नोटीस देत आहे.