शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

हुतात्म्यांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या आदिवासींवर अन्याय

By admin | Updated: January 5, 2017 06:07 IST

इंग्रजांनी हुतात्मा भाई कोतवाल व हिराजी पाटील यांचे मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिले नव्हते. तीन दिवस उघड्यावर असलेल्या मृतदेहांवर सिद्धगडावरील आदिवासी घिगे

नामदेव मोरे, नवी मुंबईइंग्रजांनी हुतात्मा भाई कोतवाल व हिराजी पाटील यांचे मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिले नव्हते. तीन दिवस उघड्यावर असलेल्या मृतदेहांवर सिद्धगडावरील आदिवासी घिगे कुटुंबीयांनी विधिवत अंत्यसंस्कार केले. ७३ वर्षांपासून समाधीची देखभाल करणाऱ्या या आदिवासींचा साधा सन्मानही शासनाने केला नाहीच; परंतु पिढ्यानपिढ्या कसणारी शेतजमीन व घरांवरील हक्क नाकारून त्यांना बेघर करण्याच्या हालचाली सुरू आहेत. आझाद दस्ता ही स्वातंत्र्यचळवळीतील महत्त्वाची क्रांतिकारी संघटना. रेल्वे रूळ उखडून व विजेचे टॉवर कापून इंग्रजांना जेरीस आणणाऱ्या या संघटनेचे प्रमुख भाई कोतवाल मुरबाड तालुक्यातील सिद्धगडावर इंग्रजांशी लढताना शहीद झाले. त्यांचे सहकारी हिराजी पाटील हेही गोळीबारात ठार झाले. इंग्रजांनी कोतवाल यांचा मृतदेह जवळपास ५०० मीटर फरफटत खाली आणला. वडील व नातेवाइकांच्या ताब्यात मृतदेह देण्यास नकार दिला होता. या मृतदेहावर कोणीही अंत्यसंस्कार करायचे नाहीत, असा आदेश इंग्रजांनी दिला होता; परंतु सिद्धगडावरील देशप्रेमी भागो रावजी घिगे व त्यांचे भाऊ राघो घिगे, बाळा घिगे व कुसा घिगे यांनी त्यांच्या शेतामध्ये या क्रांतिकारकावर अंत्यसंस्कार केले. अंत्यसंस्कार झालेले ठिकाण स्मारक म्हणून जतन केले. २ जानेवारी, १९४३पासून आतापर्यंत ७३ वर्षे घिगे कुटुंबीय स्मारकाची देखभाल करत आहेत. त्यांनी अंत्यसंस्कार केले नसते व घटना कुठे घडली याची माहिती दिली नसती, तर या महान क्रांतिकारकाच्या पराक्रमाच्या रक्ताने पावन झालेली ही वीरभूमी जगाला कळलीच नसती. या कामगिरीसाठी घिगे कुटुंबीयांनाही स्वातंत्र्यसैनिकांचा दर्जा देणे आवश्यक होते. त्यांच्या वारसांना नोकरी व इतर सुविधा देणे आवश्यक होते; मात्र १९७७मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री यशवंतराव चव्हाण व मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते फक्त एक नारळ दिला. भाई कोतवाल यांच्यावर अंत्यसंस्कार करणाऱ्या भागोजी घिगे यांचे चिरंजीव सावळाराम घिगे (वय ७५) व त्यांचे कुटुंबीय समाधीची वर्षभर देखभाल करतात. येथे येणाऱ्या इतिहासप्रेमींना २ जानेवारी, १९४३च्या पहाटे इंग्रजांनी केलेला हल्ला व नंतर हुतात्म्यांच्या पार्थिवाची केलेली अवहेलना ते विद्यमान स्थितीपर्यंतचा सर्व इतिहास सांगण्याचे काम करत आहेत. या कुटुंबीयांचा शासनाकडून उचित सन्मान करण्याऐवजी त्यांना या परिसरातून हाकलून देण्याच्या हालचाली सुरू आहेत. हा परिसर अभयारण्य घोषित झाल्यापासून वनविभाग वारंवार त्यांना नोटीस देत आहे.