शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

कामगार खात्याकडूनच कष्टकरी माथाडींवर अन्याय

By नामदेव मोरे | Updated: February 12, 2024 20:52 IST

नरेंद्र पाटील यांच्याकडून सरकारला घरचा आहेर : कामगार मंत्र्यांसह अधिकाऱ्यांवरही टिका

नवी मुंबई : महाराष्ट्र राज्याचे कामगार खातेच कष्टकरी माथाडी कामगारांवर अन्याय करत आहे. मंत्री व अधिकारी कामगारांचे प्रश्न सोडवत नाहीत अशा शब्दात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सरकारला घरचा आहेर दिला. कामगारांचे प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी दिला.

पिंपची चिंचवड येथील टाटा मोटर्स कंपनीमधील व राज्यातील माथाडी कामगारांचे प्रलंबीत प्रश्न सोडविण्यासाठी १२ फेब्रुवारीपासून आझाद मैदानावर उपोषण सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनीयनचे सरचिटणीस व अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आंदोलन करणाऱ्या कामगारांची भेट घेतली. कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी कामगार मंत्री, कामगार सचिव, आयुक्तांकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. परंतु त्यांच्याकडून प्रश्न सोडविण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. कामगार खात्याचे मंत्री व अधिकारीच कामगारांवर अन्याय करत आहेत. शासनाने तत्काळ कामगारांचे प्रश्न सोडविले नाहीत तर आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही पाटील यांनी यावेळी दिला.

आझाद मैदानावर उपोषण करणाऱ्या कामगारांनी टाटा मोटर्समध्ये काम करणाऱ्या टोळी क्रमांक ४९५ मधील कामगारांचे प्रश्न सोडविण्यात यावेत.कामगारांची मजूरी थेट मंडळामध्ये जमा करण्यात यावी. कोल्हापूर ग्रोसरी बोर्ड, भाजीपाला, रेल्वे बोर्डातील कामगारांचे प्रश्न सोडविण्यात यावेत अशी मागणी यावेळी केली.      आंदोलनस्थळी संघटनेचे संयुक्त सरचिटणीस रविकांत पाटील, दिलीप खोंड, पोपटराव देशमुख, कृष्णांत पाटील व इतर पदाधिकारीही उपस्थित होते. दिवसभरात कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची भेटही न घेतल्यामुळे दुसऱ्या दिवशीही उपोषण सुरू च ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई