शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

कामगार खात्याकडूनच कष्टकरी माथाडींवर अन्याय

By नामदेव मोरे | Updated: February 12, 2024 20:52 IST

नरेंद्र पाटील यांच्याकडून सरकारला घरचा आहेर : कामगार मंत्र्यांसह अधिकाऱ्यांवरही टिका

नवी मुंबई : महाराष्ट्र राज्याचे कामगार खातेच कष्टकरी माथाडी कामगारांवर अन्याय करत आहे. मंत्री व अधिकारी कामगारांचे प्रश्न सोडवत नाहीत अशा शब्दात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सरकारला घरचा आहेर दिला. कामगारांचे प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी दिला.

पिंपची चिंचवड येथील टाटा मोटर्स कंपनीमधील व राज्यातील माथाडी कामगारांचे प्रलंबीत प्रश्न सोडविण्यासाठी १२ फेब्रुवारीपासून आझाद मैदानावर उपोषण सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनीयनचे सरचिटणीस व अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आंदोलन करणाऱ्या कामगारांची भेट घेतली. कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी कामगार मंत्री, कामगार सचिव, आयुक्तांकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. परंतु त्यांच्याकडून प्रश्न सोडविण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. कामगार खात्याचे मंत्री व अधिकारीच कामगारांवर अन्याय करत आहेत. शासनाने तत्काळ कामगारांचे प्रश्न सोडविले नाहीत तर आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही पाटील यांनी यावेळी दिला.

आझाद मैदानावर उपोषण करणाऱ्या कामगारांनी टाटा मोटर्समध्ये काम करणाऱ्या टोळी क्रमांक ४९५ मधील कामगारांचे प्रश्न सोडविण्यात यावेत.कामगारांची मजूरी थेट मंडळामध्ये जमा करण्यात यावी. कोल्हापूर ग्रोसरी बोर्ड, भाजीपाला, रेल्वे बोर्डातील कामगारांचे प्रश्न सोडविण्यात यावेत अशी मागणी यावेळी केली.      आंदोलनस्थळी संघटनेचे संयुक्त सरचिटणीस रविकांत पाटील, दिलीप खोंड, पोपटराव देशमुख, कृष्णांत पाटील व इतर पदाधिकारीही उपस्थित होते. दिवसभरात कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची भेटही न घेतल्यामुळे दुसऱ्या दिवशीही उपोषण सुरू च ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई