शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

कामगार खात्याकडूनच कष्टकरी माथाडींवर अन्याय

By नामदेव मोरे | Updated: February 12, 2024 20:52 IST

नरेंद्र पाटील यांच्याकडून सरकारला घरचा आहेर : कामगार मंत्र्यांसह अधिकाऱ्यांवरही टिका

नवी मुंबई : महाराष्ट्र राज्याचे कामगार खातेच कष्टकरी माथाडी कामगारांवर अन्याय करत आहे. मंत्री व अधिकारी कामगारांचे प्रश्न सोडवत नाहीत अशा शब्दात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सरकारला घरचा आहेर दिला. कामगारांचे प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी दिला.

पिंपची चिंचवड येथील टाटा मोटर्स कंपनीमधील व राज्यातील माथाडी कामगारांचे प्रलंबीत प्रश्न सोडविण्यासाठी १२ फेब्रुवारीपासून आझाद मैदानावर उपोषण सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनीयनचे सरचिटणीस व अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आंदोलन करणाऱ्या कामगारांची भेट घेतली. कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी कामगार मंत्री, कामगार सचिव, आयुक्तांकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. परंतु त्यांच्याकडून प्रश्न सोडविण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. कामगार खात्याचे मंत्री व अधिकारीच कामगारांवर अन्याय करत आहेत. शासनाने तत्काळ कामगारांचे प्रश्न सोडविले नाहीत तर आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही पाटील यांनी यावेळी दिला.

आझाद मैदानावर उपोषण करणाऱ्या कामगारांनी टाटा मोटर्समध्ये काम करणाऱ्या टोळी क्रमांक ४९५ मधील कामगारांचे प्रश्न सोडविण्यात यावेत.कामगारांची मजूरी थेट मंडळामध्ये जमा करण्यात यावी. कोल्हापूर ग्रोसरी बोर्ड, भाजीपाला, रेल्वे बोर्डातील कामगारांचे प्रश्न सोडविण्यात यावेत अशी मागणी यावेळी केली.      आंदोलनस्थळी संघटनेचे संयुक्त सरचिटणीस रविकांत पाटील, दिलीप खोंड, पोपटराव देशमुख, कृष्णांत पाटील व इतर पदाधिकारीही उपस्थित होते. दिवसभरात कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची भेटही न घेतल्यामुळे दुसऱ्या दिवशीही उपोषण सुरू च ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई