शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
4
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
5
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
6
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
7
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
8
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
9
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
10
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
11
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
12
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
13
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
14
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
15
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
16
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
17
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
18
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
19
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
20
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'

नोकरभरतीत स्थानिकांवर अन्याय

By admin | Updated: January 2, 2017 04:08 IST

जेएनपीटीअंतर्गत सुरू असलेल्या चौथ्या बंदरात होणाऱ्या नोकरभरती आणि व्यवसायांमध्ये प्रकल्पबाधित १५ गावांतील स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय होत आहे.

उरण : जेएनपीटीअंतर्गत सुरू असलेल्या चौथ्या बंदरात होणाऱ्या नोकरभरती आणि व्यवसायांमध्ये प्रकल्पबाधित १५ गावांतील स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय होत आहे. स्थानिक भूमिपुत्रांवर सुरू असलेला अन्याय आणि चौथ्या बंदराच्या कामांमुळे परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीविरोधात ३ जानेवारी रोजी लाक्षणिक उपोषण सुरू करण्याचा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल भगत यांनी जेएनपीटीला दिला आहे.जेएनपीटी बंदरासाठी १८ गावांची जमीन संपादन करण्यात आली आहे. जेएनपीटी बंदरात कामगार भरती करताना या १८ ही गावातील प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्यांत प्राधान्य दिले गेले. प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या नोकऱ्यांची संख्या कमी आहे. शिवाय नव्याने उभारण्यात येत असलेल्या चौथ्या सिंगापूर पोर्ट या खासगी बंदरात मात्र १८ गावातील प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना डावलून फक्त दोन-तीन गावातील नागरिकांनाच प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप जेएनपीटी अध्यक्षांना दिलेल्या इशारा पत्रातून केला आहे. या तिन्ही खासगी बंदरात भूमिपुत्रांना डावलून परप्रांतीयांची मोठ्या प्रमाणात कामगार भरती केली जात आहे. परप्रांतीय आणि १८ गावातील भूमिपुत्रांऐवजी एक-दोन गावे वगळता होत असलेल्या कामगार भरतीमुळे स्थानिक प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होत आहे. जेएनपीटी बंदराबरोबरच अन्य खासगी दोन बंदरातील कामगार भरतीमध्ये भूमिपुत्रांना डावलून होणाऱ्या भरतीमुळे स्थानिकांमध्ये तीव्र असंतोष आहे. त्यामुळे १५ गावे विरोधात दोन-तीन गावांविरोधात अंतर्गत संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.जेएनपीटी बंदर उभारणीनंतरही परिसरात वाहनांची वर्दळ वाढली आहे. रहदारीमुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. चौथ्या बंदराच्या उभारणीपूर्वी सर्व्हिस रोड बनविण्याच्या मागणीसाठी मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने चेअरमन अनिल डिग्गीकर यांचीही भेट घेतली होती, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशीही पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्यावेळी सर्व्हिस रोड बनविण्याचे आणि करळ रेल्वे फाटक वाहतुकीसाठी खुले करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप करळ रेल्वे फाटक खुले करण्यात आलेले नाही, तसेच सर्व्हिस रोडचाही प्रश्न सुटला नाही. त्यामुळे दोन्ही समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात या मागणीसाठी लाक्षणिक उपोषण सुरू करण्याचा इशारा मनसेने दिला आहे.