शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
3
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
4
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
5
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
6
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
7
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
8
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
9
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
10
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
11
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
12
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
13
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
14
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
15
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
16
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
17
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
18
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
19
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
20
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी

नोकरभरतीत स्थानिकांवर अन्याय

By admin | Updated: January 2, 2017 04:08 IST

जेएनपीटीअंतर्गत सुरू असलेल्या चौथ्या बंदरात होणाऱ्या नोकरभरती आणि व्यवसायांमध्ये प्रकल्पबाधित १५ गावांतील स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय होत आहे.

उरण : जेएनपीटीअंतर्गत सुरू असलेल्या चौथ्या बंदरात होणाऱ्या नोकरभरती आणि व्यवसायांमध्ये प्रकल्पबाधित १५ गावांतील स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय होत आहे. स्थानिक भूमिपुत्रांवर सुरू असलेला अन्याय आणि चौथ्या बंदराच्या कामांमुळे परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीविरोधात ३ जानेवारी रोजी लाक्षणिक उपोषण सुरू करण्याचा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल भगत यांनी जेएनपीटीला दिला आहे.जेएनपीटी बंदरासाठी १८ गावांची जमीन संपादन करण्यात आली आहे. जेएनपीटी बंदरात कामगार भरती करताना या १८ ही गावातील प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्यांत प्राधान्य दिले गेले. प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या नोकऱ्यांची संख्या कमी आहे. शिवाय नव्याने उभारण्यात येत असलेल्या चौथ्या सिंगापूर पोर्ट या खासगी बंदरात मात्र १८ गावातील प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना डावलून फक्त दोन-तीन गावातील नागरिकांनाच प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप जेएनपीटी अध्यक्षांना दिलेल्या इशारा पत्रातून केला आहे. या तिन्ही खासगी बंदरात भूमिपुत्रांना डावलून परप्रांतीयांची मोठ्या प्रमाणात कामगार भरती केली जात आहे. परप्रांतीय आणि १८ गावातील भूमिपुत्रांऐवजी एक-दोन गावे वगळता होत असलेल्या कामगार भरतीमुळे स्थानिक प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होत आहे. जेएनपीटी बंदराबरोबरच अन्य खासगी दोन बंदरातील कामगार भरतीमध्ये भूमिपुत्रांना डावलून होणाऱ्या भरतीमुळे स्थानिकांमध्ये तीव्र असंतोष आहे. त्यामुळे १५ गावे विरोधात दोन-तीन गावांविरोधात अंतर्गत संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.जेएनपीटी बंदर उभारणीनंतरही परिसरात वाहनांची वर्दळ वाढली आहे. रहदारीमुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. चौथ्या बंदराच्या उभारणीपूर्वी सर्व्हिस रोड बनविण्याच्या मागणीसाठी मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने चेअरमन अनिल डिग्गीकर यांचीही भेट घेतली होती, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशीही पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्यावेळी सर्व्हिस रोड बनविण्याचे आणि करळ रेल्वे फाटक वाहतुकीसाठी खुले करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप करळ रेल्वे फाटक खुले करण्यात आलेले नाही, तसेच सर्व्हिस रोडचाही प्रश्न सुटला नाही. त्यामुळे दोन्ही समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात या मागणीसाठी लाक्षणिक उपोषण सुरू करण्याचा इशारा मनसेने दिला आहे.