शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
2
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
3
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
4
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
5
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
6
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
7
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
8
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
9
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
10
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
11
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
12
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
13
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
14
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
15
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
16
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
17
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
18
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
19
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
20
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार

जलस्वराज्य योजनेची माहिती आॅनलाइन

By admin | Updated: April 7, 2016 01:23 IST

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी देशभर जलस्वराज्य-२ योजना राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यातील पाणी व स्वच्छता क्षेत्रासाठी सनियंत्रण व मूल्यमापन प्रणाली विकसित करण्यात

आविष्कार देसाई, अलिबागपाणीटंचाईवर मात करण्यासाठी देशभर जलस्वराज्य-२ योजना राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यातील पाणी व स्वच्छता क्षेत्रासाठी सनियंत्रण व मूल्यमापन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीची माहिती देण्यासाठी राज्यातून रायगड जिल्ह्याची प्रथम निवड केली आहे. सरकारने महाराष्ट्र राज्याकरिता मासटेक इंडिया लि. या संस्थेची निवड केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना याबाबतचे प्रशिक्षण बुधवारी देण्यात आले.जिल्ह्यात मुबलक प्रमाणात पाऊस पडूनही येथील नद्या, धरणे तलाव एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच कोरडे पडू लागतात. पावसाच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन न केल्यानेच जिल्ह्यातील जनतेला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाणीटंचाईची समस्या अत्यंत बिकट असल्यानेच जिल्ह्यातील टंचाई कृती आराखडा हा कोटीच्या कोटी उड्डाणे घेत असलल्याचे समोर आले आहे. यंदा सुमारे सात कोटी ८८ लाख रुपयांचा टंचाई कृती आराखडा मंजूर आहे. देशभरात बहुतांश ठिकाणी अशीच परिस्थिती उद्भवलेली असल्याने जलस्वराज्य-२ हा कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमानुसार रायगड जिल्ह्यातील टंचाईग्रस्त सुमारे ४६ गावांची निवड केली आहे. जलस्वराज्य-२ साठी जागतिक बँक अर्थसाहाय्य देणार आहे. काही महिन्यांपूर्वी जागतिक बँकेचे शिष्टमंडळ जिल्ह्यातील योजनेची पाहणी करून गेले आहे. जलस्वराज्य-२ कार्यक्रमांतर्गत रोजच्या होणाऱ्या कामाची माहिती, त्याच्या प्रगतीची अचूक नोंद आणि मोजमाप एकत्रित होणे गरजेचे होते. यासाठीही सर्व माहितीच्या संकलनासाठी एक विशिष्ठ आॅनलाइन प्रणालीची आवश्यकता होती. यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्यासाठी मासटेक इंडिया लि. या संस्थेची निवड केली आहे. प्रशिक्षणप्रसंगी मासटेक इंडियाचे रमेश गुरुदंती, क्षमता चाचणी तज्ज्ञ एस. सी. ए. हाश्मी, समाज व्यवस्थापन तज्ञ मंगेश भालेराव, पर्यावरण ज्ज्ञ डॉ. रामानंद जाधव आदींसह अधिकारी आणि कमचारी उपस्थित होते.