शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

जलस्वराज्य योजनेची माहिती आॅनलाइन

By admin | Updated: April 7, 2016 01:23 IST

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी देशभर जलस्वराज्य-२ योजना राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यातील पाणी व स्वच्छता क्षेत्रासाठी सनियंत्रण व मूल्यमापन प्रणाली विकसित करण्यात

आविष्कार देसाई, अलिबागपाणीटंचाईवर मात करण्यासाठी देशभर जलस्वराज्य-२ योजना राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यातील पाणी व स्वच्छता क्षेत्रासाठी सनियंत्रण व मूल्यमापन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीची माहिती देण्यासाठी राज्यातून रायगड जिल्ह्याची प्रथम निवड केली आहे. सरकारने महाराष्ट्र राज्याकरिता मासटेक इंडिया लि. या संस्थेची निवड केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना याबाबतचे प्रशिक्षण बुधवारी देण्यात आले.जिल्ह्यात मुबलक प्रमाणात पाऊस पडूनही येथील नद्या, धरणे तलाव एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच कोरडे पडू लागतात. पावसाच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन न केल्यानेच जिल्ह्यातील जनतेला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाणीटंचाईची समस्या अत्यंत बिकट असल्यानेच जिल्ह्यातील टंचाई कृती आराखडा हा कोटीच्या कोटी उड्डाणे घेत असलल्याचे समोर आले आहे. यंदा सुमारे सात कोटी ८८ लाख रुपयांचा टंचाई कृती आराखडा मंजूर आहे. देशभरात बहुतांश ठिकाणी अशीच परिस्थिती उद्भवलेली असल्याने जलस्वराज्य-२ हा कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमानुसार रायगड जिल्ह्यातील टंचाईग्रस्त सुमारे ४६ गावांची निवड केली आहे. जलस्वराज्य-२ साठी जागतिक बँक अर्थसाहाय्य देणार आहे. काही महिन्यांपूर्वी जागतिक बँकेचे शिष्टमंडळ जिल्ह्यातील योजनेची पाहणी करून गेले आहे. जलस्वराज्य-२ कार्यक्रमांतर्गत रोजच्या होणाऱ्या कामाची माहिती, त्याच्या प्रगतीची अचूक नोंद आणि मोजमाप एकत्रित होणे गरजेचे होते. यासाठीही सर्व माहितीच्या संकलनासाठी एक विशिष्ठ आॅनलाइन प्रणालीची आवश्यकता होती. यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्यासाठी मासटेक इंडिया लि. या संस्थेची निवड केली आहे. प्रशिक्षणप्रसंगी मासटेक इंडियाचे रमेश गुरुदंती, क्षमता चाचणी तज्ज्ञ एस. सी. ए. हाश्मी, समाज व्यवस्थापन तज्ञ मंगेश भालेराव, पर्यावरण ज्ज्ञ डॉ. रामानंद जाधव आदींसह अधिकारी आणि कमचारी उपस्थित होते.