शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

अनधिकृत तबेल्यांचे पेव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2016 02:39 IST

यादवनगरमध्ये परप्रांतीयांनी एमआयडीसीची जागा बळकावून तेथे अनधिकृतपणे तबेले सुरू केले आहेत. कायदा धाब्यावर बसवून जवळपास २० तबेल्यांमध्ये ७०० ते ८०० जनावरे पाळण्यात आली

नामदेव मोरे, नवी मुंबई यादवनगरमध्ये परप्रांतीयांनी एमआयडीसीची जागा बळकावून तेथे अनधिकृतपणे तबेले सुरू केले आहेत. कायदा धाब्यावर बसवून जवळपास २० तबेल्यांमध्ये ७०० ते ८०० जनावरे पाळण्यात आली आहेत. स्वच्छतेचेही निकष पाळले जात नसल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, राजकीय वरदहस्त असल्यामुळेच शासकीय यंत्रणा संबंधितांवर काहीच कारवाई करीत नाहीत. महापालिकेच्या पोटनिवडणुकीनिमित्त यादवनगरमधील अनधिकृत साम्राज्य शहरवासीयांना पाहावयास मिळाले आहे. प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांवर बुलडोजर चालविला जात असताना उत्तर प्रदेश, बिहारमधून आलेल्या परप्रांतीयांनी बिनधास्तपणे जवळपास ५० एकर जमिनीवर वसाहत उभी केली आहे. प्रकल्पग्रस्तांनी एमआयडीसीला उद्योग उभारणीसाठी दिलेल्या जमिनीवर परप्रांतीयांनी झोपड्या बांधल्या आहेत. फक्त झोपड्या बांधून थांबलेले नसून, या जागेचा मोठ्या प्रमाणात व्यवसायासाठी वापर सुरू केला आहे. यादवनगरमध्ये एकाच प्रभागामध्ये जवळपास २० तबेले सुरू केले आहेत. महाराष्ट्र नागरी क्षेत्रामधील गुरे पाळणे आणि त्यांची ने-आण करणे नियंत्रण अधिनियम १९७६ मधील नियम धाब्यावर बसविण्यात आले आहेत. शहरांमध्ये तबेला सुरू करण्यासाठी व दूध व्यवसायासाठी जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकाऱ्यांची परवानगी घेणे बंधनकारक असते. ही परवानगी देताना त्या विभागातील जनावरांची संख्या, गुरे पाळणे प्रस्तावित केलेल्या क्षेत्राची योग्यता, जनावरांना पिण्यासाठी, धुण्यासाठी आणि साफसफाईसाठी तबेल्यामध्ये योग्य पाणीपुरवठ्याची व्यवस्था व स्वच्छतेचे सर्व नियम धाब्यावर बसविण्यात आले आहेत. परंतु यामधील एकाही नियमाचे पालन यादवनगरमध्ये केले जात नाही. एमआयडीसीच्या जागेवर स्वत:ची मालकी असल्याप्रमाणेच तबेलाचालक वागत आहेत. नागरी वस्तीमध्येच तबेले असल्यामुळे या परिसरातील १० हजारांपेक्षा जास्त नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जनावरांच्या आरोग्याचीही काळजी घेतली जात नाही. त्यांनी अधिकृत शासकीय डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी होते का, याविषयीही शंका उपस्थित केली जात आहे. जनावरांना देण्यात येणारा चारा व पाणी योग्य आहे का, याचीही तपासणी केलेली नाही. येथे अनधिकृतपणे बोरअवेल काढून त्याचे पाणी तबेल्यांसाठी वापरले आहे. परंतु हे पाणी पिण्यायोग्य आहे का, हे तपासलेले नाही. दूध विक्री व व्यवसायासाठी अधिकृत परवाना घेतलेला नाही. अन्न व औषध प्रशासन विभागाचा व महापालिकेचाही परवाना घेणे आवश्यक आहे. परंतु येथील परप्रांतीय व्यावसायिक नियम पायदळी तुडवत आहेत. > प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी परप्रांतीयांच्या घशातशासनाने नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांच्या १०० टक्के जमिनी संपादित करून तेथे ठाणे, बेलापूर औद्योगिक वसाहत व नवी मुंबई शहर वसविले आहे. एमआयडीसी व सिडकोने अद्याप प्रकल्पग्रस्तांना दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. गरजेपोटी बांधलेली घरे तोडली जात आहेत. प्रकल्पग्रस्तांना भूमाफिया ठरवून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचे प्रयत्न केले जात असून दुसरीकडे उत्तर प्रदेश, बिहारमधून आलेल्या परप्रांतीयांनी करोडो रुपयांच्या जमिनीवर अतिक्रमण केल्यानंतर काहीच कारवाई केली जात नाही.