शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

उद्योग गुजरातला पळविले आणि ड्रग्ज महाराष्ट्रात येताहेत; आदित्य ठाकरेंची टिका

By नामदेव मोरे | Updated: July 1, 2024 00:04 IST

नवी मुंबईमधील विष्णूदास भावे नाट्यगृहात पाटण तालुक्यातील मुंबई, नवी मुंबईमधील रहिवाशांचा मेळावा आयोजीत केला होता. या मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी महायुतीवर जोरदार टिका केली.

नवी मुंबई : महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळविले जात आहेत. उद्योग तिकडे जात आहेत व ड्रग्ज इकडे येत आहेत. राज्यातील बेरोजगारी वाढू लागली आहे. संविधान बदलू इच्छीणारांना आपण लोकसभेत रोखले. विधानसभेला पुन्हा रोखायचे आहे. महाराष्ट्राच्या हिताच्या आड येणारांना धडा शिकविण्यासाठी सर्वांनी एकत्र या असे आवाहन उद्धवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

नवी मुंबईमधील विष्णूदास भावे नाट्यगृहात पाटण तालुक्यातील मुंबई, नवी मुंबईमधील रहिवाशांचा मेळावा आयोजीत केला होता. या मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी महायुतीवर जोरदार टिका केली. त्यांना देशाचे संविधान बदलायचे होते. देशावर हुकूमशाही लादायची आहे. त्यांनी महाराष्ट्रात दोन पक्ष, एक घर फोडून हुकूमशाहीचे दर्शन घडविले. दोन वर्ष घटनाबाह्य सरकार सुरू आहे. महानगरपालिकांच्या निवडणूका घेतल्या जात नाहीत. लोकसभेला महाराष्ट्राने त्यांना रोखले. विधानसभेला पुन्हा रोखायचे आहे. राज्यातील उद्योग गुजरातला पळविले जात आहेत. औषध उद्योगही तिकडे नेला व ड्रग्ज मात्र तेथून येथे येत आहेत. राज्यातील तरूणांचा हाताला रोजगार नाही. ड्रग्जचा विळखा वाढत आहे. हे ड्रग्ज कोणत्या राज्यातून येताहेत हे पण पाहिले पाहिजे असे मतही त्यांनी व्यक्त केले. राज्याचे हित जपण्यासाठी सर्वांनी एकत्र येवून लढा देवूया गद्दारांना धडा शिकवूया असे आवाहनही त्यांनी केले.उद्धवसेनेचे नेते नितीन बानुगडे पाटील यांनीही भाजपावर टिका केली. राज्यातील १६ प्रकल्प गुजरातला पळविले. आता ५६ टीमसी पाणी पळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्यात ४७ टक्के तरूण बेरोजगार असून नशेचा बाजार सुरू आहे. राज्यातील उद्योग पळविणारा विधानसभा निवडणुकीत धडा शिकविण्याचे आवाहनही त्यांनी केले. सातारा जिल्हा प्रमुख हर्षद कदम यांनी पाटणमध्ये दबावाचे राजकारण करणाऱ्या गद्दारांना जनता धडा शिकवेल असे स्पष्ट केले. यावेळी बेलापूरचे जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे, ऐरोलीचे द्वारकानाथ भोईर, एम. के. मढवी. सोमनाथ वास्कर, विजयानंद माने व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेNavi Mumbaiनवी मुंबईShiv Senaशिवसेना