शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

रायगड जिल्ह्यातील तापमानात वाढ

By admin | Updated: March 30, 2017 06:44 IST

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार सन २०१७ च्या उन्हाळ्यात राज्यात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव अधिक असणार आहे.

जयंत धुळप /अलिबागभारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार सन २०१७ च्या उन्हाळ्यात राज्यात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव अधिक असणार आहे. उष्णतेच्या लाटेमुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये याकरिता याबाबतच्या उपाययोजना करण्याचे निर्देश आपत्ती व्यवस्थापन विभाग, महाराष्ट्र शासनामार्फत देण्यात आले आहेत. रायगड जिल्ह्यातील सर्व म्हणजे १५ तालुक्यांत गेल्या दोन दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे. ३५ अंश.से. अशा अधिकतम तापमानाने माणगाव,महाड व पोलादपूर तालुक्यांतील जनता हैराण झाली आहे.बुधवारी जिल्ह्यात पेण, खालापूर व कर्जत येथे ३२, पनवेल येथे ३१, अलिबाग, मुरुड, उरण, म्हसळा, तळा व रोहा येथे ३०, पाली-सुधागड, श्रीवर्धन येथे २९ अंश से. तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान, थंड हवेचे ठिकाण असणाऱ्या माथेरान येथे २८ अंश से. तर महाबळेश्वर येथे २५ अंश. से. तापमानाची नोंद झाली आहे. कोकणात अन्यत्र रत्नागिरी ३१,चिपळूण ३३ तर कणकवली येथे ३२ अंश से. तापमानाची नोंद झाली आहे. उष्णतेच्या लाटेमुळे उष्माघाताची शक्यता अधिक असते. त्यामुळे शारीरिक ताण पडून मृत्यू होण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.उष्माघातापासून संरक्षण करण्याकरिता काय करावे?च्जास्तीत जास्त पाणी प्यावे.च्हलके, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत.च्बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बुट व चपलाचा वापर करण्यात यावा.च्प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत घ्यावी.च्जर उन्हात काम करीत असाल तर डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा.च्ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकण्यात यावा.च्अशक्तपणा, स्थुलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम आदी उन्हाचा चटका बसण्याची चिन्हे ओळखावीत.च्चक्कर येत असल्यास तत्काळ डॉक्टरांना दाखवावे.हलगर्जीपणा करू नये.च्वैयक्तिक कार्यवाहीसोबतच घरातही तसेच वातावरण हवे. घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा. च्रात्री खिडक्या उघड्या ठेवण्यात याव्यात. च्पंखे, ओले कपडे यांचा वापर करण्यात यावा, तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे. च्पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करावा. उष्माघात प्रसंगी काय करू नये?च्लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये.च्दुपारी १२ ते ३.३० या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे.च्गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे. च्बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत.च्दुपारी १२ ते ३.३० या कालावधीत बाहेर काम करणे टाळावे. च्उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे.च्मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात याव्यात.