शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

रायगड जिल्ह्यातील तापमानात वाढ

By admin | Updated: March 30, 2017 06:44 IST

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार सन २०१७ च्या उन्हाळ्यात राज्यात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव अधिक असणार आहे.

जयंत धुळप /अलिबागभारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार सन २०१७ च्या उन्हाळ्यात राज्यात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव अधिक असणार आहे. उष्णतेच्या लाटेमुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये याकरिता याबाबतच्या उपाययोजना करण्याचे निर्देश आपत्ती व्यवस्थापन विभाग, महाराष्ट्र शासनामार्फत देण्यात आले आहेत. रायगड जिल्ह्यातील सर्व म्हणजे १५ तालुक्यांत गेल्या दोन दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे. ३५ अंश.से. अशा अधिकतम तापमानाने माणगाव,महाड व पोलादपूर तालुक्यांतील जनता हैराण झाली आहे.बुधवारी जिल्ह्यात पेण, खालापूर व कर्जत येथे ३२, पनवेल येथे ३१, अलिबाग, मुरुड, उरण, म्हसळा, तळा व रोहा येथे ३०, पाली-सुधागड, श्रीवर्धन येथे २९ अंश से. तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान, थंड हवेचे ठिकाण असणाऱ्या माथेरान येथे २८ अंश से. तर महाबळेश्वर येथे २५ अंश. से. तापमानाची नोंद झाली आहे. कोकणात अन्यत्र रत्नागिरी ३१,चिपळूण ३३ तर कणकवली येथे ३२ अंश से. तापमानाची नोंद झाली आहे. उष्णतेच्या लाटेमुळे उष्माघाताची शक्यता अधिक असते. त्यामुळे शारीरिक ताण पडून मृत्यू होण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.उष्माघातापासून संरक्षण करण्याकरिता काय करावे?च्जास्तीत जास्त पाणी प्यावे.च्हलके, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत.च्बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बुट व चपलाचा वापर करण्यात यावा.च्प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत घ्यावी.च्जर उन्हात काम करीत असाल तर डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा.च्ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकण्यात यावा.च्अशक्तपणा, स्थुलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम आदी उन्हाचा चटका बसण्याची चिन्हे ओळखावीत.च्चक्कर येत असल्यास तत्काळ डॉक्टरांना दाखवावे.हलगर्जीपणा करू नये.च्वैयक्तिक कार्यवाहीसोबतच घरातही तसेच वातावरण हवे. घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा. च्रात्री खिडक्या उघड्या ठेवण्यात याव्यात. च्पंखे, ओले कपडे यांचा वापर करण्यात यावा, तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे. च्पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करावा. उष्माघात प्रसंगी काय करू नये?च्लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये.च्दुपारी १२ ते ३.३० या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे.च्गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे. च्बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत.च्दुपारी १२ ते ३.३० या कालावधीत बाहेर काम करणे टाळावे. च्उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे.च्मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात याव्यात.