शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्पामध्ये ३०० कोटी रुपयांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 23:41 IST

४,१५० कोटींच्या खर्चास स्थायी समितीची मंजुरी; अंदाजपत्रक अंतिम मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेकडे

नवी मुंबई : आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकावर स्थायी समितीमध्ये चर्चा करण्यात आली. स्थायी समितीने मूळ अंदाजपत्रकामध्ये ३०० कोटी रुपयांची वाढ करून ४,१५० कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी दिली. अर्थसंकल्प अंतिम मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेमध्ये सादर केला जाणार असून, तेथे किती वाढ होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी स्थायी समितीमध्ये १८ फेब्रुवारीला २०२०-२१ साठीचे ३,८५० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले होते. स्थायी समितीमध्ये बुधवारी या अंदाजपत्रकावर चर्चा करण्यात आली. आयुक्तांनी मालमत्ताकर विभागाला ६३० कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले होते. स्थायी समितीने त्यामध्ये १५० कोटींची वाढ करून ७८० कोटी रुपये केले आहे. नगर रचना विभागाचे उद्दिष्ट १२५ कोटींवरून २२५ कोटी व स्थानिक संस्था कराचे उद्दिष्ट १,२५० कोटींवरून १,३०० कोटी रुपये करण्यात आले आहे. आयुक्तांनी परिवहनसाठी ९५ कोटी रुपये अनुदान मंजूर केले होते. स्थायी समितीने त्यामध्ये तब्बल ४२ कोटी ७५ लाख रुपयांची वाढ केली असून, १३७ कोटी ७५ लाख रुपये केले आहे. परिवहन डेपोसाठी जमीन विकत घेण्यासाठी ७० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. उघड्या नाल्यांचे काम करण्यासाठी मूळ अंदाजपत्रकामध्ये १२ कोटी ६५ लाख रुपयांची तरतूद केली होती. त्यामध्ये वाढ करून तरतूद १५० कोटी रुपये करण्यात आली आहे.सदस्यांची अनुपस्थितीमहापालिकेच्या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी बुधवारी स्थायी समिती सभा बोलाविण्यात आली होती. सकाळी ११ वाजता सुरू होणारी सभा तब्बल दीड तास उशिराने सुरू झाली. या सभेला सभापतींसह नऊ सदस्य उपस्थित होते. दुपारी २:३० वाजता जेवणासाठी एक तासाची सुट्टी करण्यात आली; परंतु सदस्यांची संख्या कमी झाल्याने ३:३० वाजता सुरू होणारी सभा ४:३० वाजता सुरू झाली. जेवणाच्या सुट्टीनंतर सभापतींसह पाच सदस्य सभेला उपस्थित होते.सर्वच एनएमएमटी डेपोंची बांधणी करावी, त्या ठिकाणी निर्माण करण्यात येणाऱ्या विविध सुविधा आणि उपाययोजनांमधून महापालिकेला उत्पन्न प्राप्त होणार आहे. शहरातील सर्व नोडमध्ये अद्ययावत वाहनतळ उभारण्यात यावेत.- डॉ. जयाजी नाथ, नगरसेवक, प्रभाग क्रमांक १०४विद्यार्थ्यांसाठी राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ पादचारी पूल उभारण्यात यावा. तलावांची चांगल्या पद्धतीने सुधारणा करण्यात यावी. गावठाण भागासाठी अग्निशमनच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात.- ज्ञानेश्वर सुतार, नगरसेवक, प्रभाग क्र मांक ८९शहरात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत, त्यामधून कोट्यवधी रु पयांची वसुली होऊ शकते. पदपथावरील फेरीवाल्यांवर ठोस कारवाई होत नसून, भरारी पथकावर नाहक खर्च होत आहे.- सलुजा सुतार, नगरसेविका, प्रभाग क्र मांक ९९अभय योजनेच्या जाहिराती मोठ्या प्रमाणावर कराव्यात, यामुळे थकीत करवसुली होण्यास मदत होणार आहे. फेरीवाल्यांवर निर्बंध घालणे गरजेचे आहे.- चेतन नाईक, नगरसेवक, प्रभाग क्र मांक २२शहराच्या सौंदर्यात भर टाकण्यासाठी शहरात मुख्य चार प्रवेशद्वार उभारणे गरजेचे आहे. सिडकोकालीन गंजलेल्या पाण्याच्या मुख्य वाहिन्या बदलण्यात याव्यात.- रवींद्र इथापे, सभागृह नेतासीबीडी येथे रस्त्याच्या दुतर्फा अवजड वाहने उभी असतात, यासाठी ट्रक टर्मिनल उभारावे. आयकर कॉलनी समोर असलेल्या डॅमची सुधारणा करण्यात यावी. तसेच तलावात कारंजे आणि नौकाविहार सुरू केल्यास उत्पन्न प्राप्त होणार आहे.- सरोज पाटील, नगरसेविका, प्रभाग क्र मांक १०१सदस्यांनी केलेल्या विविध सूचनांनुसार ३०० कोटींची वाढ करून ४१५० कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. अर्थसंकल्प अंतिम मंजुरीसाठी महासभेत सादर केला जाणार आहे.- नवीन गवते, सभापती, स्थायी समिती

टॅग्स :nmmcनवी मुंबई महापालिका