शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

नवी मुंबईतील उद्यानांच्या समस्येत वाढ; झाडाच्या फांद्या पडल्या, कचराकुंड्या तुटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 23:42 IST

पालिकेकडून देखभाल नाही

नवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, तसेच सुरक्षेच्या दृष्टीने नवी मुंबई शहरातील उद्यानांमध्ये नागरिकांना बंदी करण्यात आली होती, परंतु आता उद्याने खुली करण्यात आलेली आहेत. गेल्या काही महिन्यांपासून उद्यानांची आणि मैदानांची देखभाल आणि दुरुस्ती केली नसल्याने उद्यानांची दुरवस्था झाली आहे. यामुळे उद्यानात येणाऱ्या नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

नवी मुंबई शहरात महापालिकेच्या माध्यमातून अनेक उद्याने विकसित करण्यात आली असून, नागरिकांना, लहान मुलांसाठी आकर्षक खेळणी, ओपन जिम, जॉगिंग ट्रॅक, आसन व्यवस्था आदी अत्याधुनिक सुविधा निर्माण करून देण्यात आल्या आहेत. नागरिकांनीही उद्यानांना पसंती दिली असून, नवी मुंबई शहराला उद्यानांचे शहर म्हणून ओळखले जाते. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी घेण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात महापालिकेच्या माध्यमातून उद्याने बंद ठेवण्यात आली होती.

सद्यस्थितीत उद्याने सुरू करण्यात आली आहेत, परंतु गेल्या काही महिन्यांपासून उद्यानांच्या आणि मैदानांच्या देखभाल, दुरुस्तीकडेही महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. पावसात झालेल्या वादळामुळे उद्याने आणि मैदानांमधील अनेक मोठी झाडे आणि फांद्या पडल्या होत्या, त्या अद्याप उचलण्यात आलेल्या नाहीत. मैदानामध्ये मोठ्या प्रमाणावर गवत उगवले असून, उद्यानात बसविण्यात आलेल्या कचराकुंड्या तुटून पडल्या आहेत. आसन व्यवस्थाही खराब झाली आहे. त्यामुळे उद्यानात येणारे नागरिक आणि मैदानात येणाºया खळाडूंना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन उद्याने आणि मैदानांमधील समस्या सोडविण्याची मागणी केली जात आहे.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका