शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

नवी मुंबईत २० वर्षे पाणी, घरपट्टी वाढ नाही, आता पुढच्या २० वर्षांतही करवाढ नाही

By नामदेव मोरे | Updated: January 16, 2024 17:01 IST

नवी मुंबईकरांना गणेश नाईक यांचे आश्वासन; दर्जेदार सुविधा देण्यास महानगरपालिका कटिबद्ध.

नामदेव मोरे, नवी मुंबई : ग्रामपंचायतीमधून महानगरपालिकेत रूपांतर झालेली नवी मुंबई एकमेव महानगरपालिका आहे. नवी मुंबईमध्ये मागील २० वर्षांत करवाढ केलेली नाही. पुढील २० वर्षेही ती केली जाणार नसल्याचे आश्वासन आमदार गणेश नाईक यांनी दिले.

नवी मुंबई विमानतळामुळे उपलब्ध होणारी विकासाची संधी या विषयावरील परिषदेमध्ये गणेश नाईक यांनी मंगळवारी त्यांची भूमिका मांडली. नवी मुंबईने स्वच्छतेमध्ये देशात तिसरा क्रमांक मिळविला आहे. प्रगतीचे अनेक टप्पे पूर्ण केले आहेत. २० वर्षे करवाढ न करता मनपाने दर्जेदार विकासकामे केली आहेत. प्रशासकीय काळात करवाढ करण्याचा विचार होता, पण ती केली तर तीव्र आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे करवाढ टळल्याचेही त्यांनी सांगितले. ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीमध्येही उद्योजकांना आवश्यक ते सहकार्य करून व्यवसाय वृद्धीला पोषक वातावरण तयार करून दिल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्येही दर्जेदार विकासकामे यापुढेही केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार मंदा म्हात्रे, आयाेजक विनय सहस्रबुद्धे, सतीश निकम, माजी आमदार संदीप नाईक, नीलेश म्हात्रे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. परिषदेला महाविद्यालयीन युवकांसह उद्योग क्षेत्रामधील अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी महानगरपालिका क्षेत्रातील प्रकल्पांविषयी माहिती दिली.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाTaxकर