शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
3
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
4
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
5
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
6
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
7
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
8
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
10
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
11
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
12
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
13
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
14
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
15
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
16
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
17
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
18
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
19
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
20
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल

नवी मुंबईत २० वर्षे पाणी, घरपट्टी वाढ नाही, आता पुढच्या २० वर्षांतही करवाढ नाही

By नामदेव मोरे | Updated: January 16, 2024 17:01 IST

नवी मुंबईकरांना गणेश नाईक यांचे आश्वासन; दर्जेदार सुविधा देण्यास महानगरपालिका कटिबद्ध.

नामदेव मोरे, नवी मुंबई : ग्रामपंचायतीमधून महानगरपालिकेत रूपांतर झालेली नवी मुंबई एकमेव महानगरपालिका आहे. नवी मुंबईमध्ये मागील २० वर्षांत करवाढ केलेली नाही. पुढील २० वर्षेही ती केली जाणार नसल्याचे आश्वासन आमदार गणेश नाईक यांनी दिले.

नवी मुंबई विमानतळामुळे उपलब्ध होणारी विकासाची संधी या विषयावरील परिषदेमध्ये गणेश नाईक यांनी मंगळवारी त्यांची भूमिका मांडली. नवी मुंबईने स्वच्छतेमध्ये देशात तिसरा क्रमांक मिळविला आहे. प्रगतीचे अनेक टप्पे पूर्ण केले आहेत. २० वर्षे करवाढ न करता मनपाने दर्जेदार विकासकामे केली आहेत. प्रशासकीय काळात करवाढ करण्याचा विचार होता, पण ती केली तर तीव्र आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे करवाढ टळल्याचेही त्यांनी सांगितले. ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीमध्येही उद्योजकांना आवश्यक ते सहकार्य करून व्यवसाय वृद्धीला पोषक वातावरण तयार करून दिल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्येही दर्जेदार विकासकामे यापुढेही केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार मंदा म्हात्रे, आयाेजक विनय सहस्रबुद्धे, सतीश निकम, माजी आमदार संदीप नाईक, नीलेश म्हात्रे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. परिषदेला महाविद्यालयीन युवकांसह उद्योग क्षेत्रामधील अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी महानगरपालिका क्षेत्रातील प्रकल्पांविषयी माहिती दिली.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाTaxकर