शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

नवी मुंबईत २० वर्षे पाणी, घरपट्टी वाढ नाही, आता पुढच्या २० वर्षांतही करवाढ नाही

By नामदेव मोरे | Updated: January 16, 2024 17:01 IST

नवी मुंबईकरांना गणेश नाईक यांचे आश्वासन; दर्जेदार सुविधा देण्यास महानगरपालिका कटिबद्ध.

नामदेव मोरे, नवी मुंबई : ग्रामपंचायतीमधून महानगरपालिकेत रूपांतर झालेली नवी मुंबई एकमेव महानगरपालिका आहे. नवी मुंबईमध्ये मागील २० वर्षांत करवाढ केलेली नाही. पुढील २० वर्षेही ती केली जाणार नसल्याचे आश्वासन आमदार गणेश नाईक यांनी दिले.

नवी मुंबई विमानतळामुळे उपलब्ध होणारी विकासाची संधी या विषयावरील परिषदेमध्ये गणेश नाईक यांनी मंगळवारी त्यांची भूमिका मांडली. नवी मुंबईने स्वच्छतेमध्ये देशात तिसरा क्रमांक मिळविला आहे. प्रगतीचे अनेक टप्पे पूर्ण केले आहेत. २० वर्षे करवाढ न करता मनपाने दर्जेदार विकासकामे केली आहेत. प्रशासकीय काळात करवाढ करण्याचा विचार होता, पण ती केली तर तीव्र आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे करवाढ टळल्याचेही त्यांनी सांगितले. ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीमध्येही उद्योजकांना आवश्यक ते सहकार्य करून व्यवसाय वृद्धीला पोषक वातावरण तयार करून दिल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्येही दर्जेदार विकासकामे यापुढेही केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार मंदा म्हात्रे, आयाेजक विनय सहस्रबुद्धे, सतीश निकम, माजी आमदार संदीप नाईक, नीलेश म्हात्रे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. परिषदेला महाविद्यालयीन युवकांसह उद्योग क्षेत्रामधील अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी महानगरपालिका क्षेत्रातील प्रकल्पांविषयी माहिती दिली.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाTaxकर