शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
3
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
4
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
5
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
6
यंदा आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
7
'आम्हाला न्याय हवाय', अमित शाहांना बघताच मृतांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा फुटला बांध
8
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
9
घटनास्थळी दहशतीच्या खुणा, रस्त्यांवर शुकशुकाट, लष्कराची वर्दळ, हल्ल्यानंतर पहलगाममध्ये आहे अशी परिस्थिती
10
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
11
Pahalgam Attack Update : "इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
12
पहलगाम म्हणजे काश्मीराचा स्वर्ग; हिरव्यागार दऱ्या आणि खळकळणाऱ्या नद्या; पर्यटक का करतात हजारो खर्च?
13
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
14
महेश भट आणि पूजा भटच्या लिप किसवर पहिल्यांदाच बोलला त्यांचा मुलगा, म्हणाला- "हे मी लहानपणासून बघत आलोय..."
15
हॉटेल बाहेर बसलेले, गोळी लागली,अर्धा तास मदत मिळाली नाही;पुण्यातील पर्यटकांसोबत नेमकं काय घडलं?
16
Terrorist Attack: महाजन श्रीनगरला रवाना, तीन मंत्री विमानतळावर; मुख्यमंत्री कार्यालयाने काय माहिती दिली?
17
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
18
Pahalgam Attack : "न्याय मिळायलाच पाहिजे..."; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विराट कोहली संतापला
19
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
20
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा

'विधानसभेसह मनपा निवडणुकीसाठी सज्ज व्हा'; गणेश नाईक यांचे कार्यकर्त्यांना आवाहन 

By नामदेव मोरे | Updated: July 11, 2024 17:32 IST

नवी मुंबईत जनसंवाद अभियान राबविणार.

नामदेव मोरे, नवी मुंबई : कार्यकर्त्यांनी विधानसभेसह महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सज्ज रहावे. जनतेचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्यावे. प्रत्येक वार्डामध्ये आपले कार्यालय असले पाहिजे. कार्यालयामध्ये सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविले पाहिजेत. मी स्वत: संपूर्ण नवी मुंबईत जनसंवाद अभियान राबवून नागरिकांचे प्रश्न, समस्या सोडविणार असल्याचे मत आमदार गणेश नाईक यांनी व्यक्त केले आहे.

बेलापुरमध्ये भाजपा अध्यक्ष संदीप नाईक यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी गणेश नाईक यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. येथील कार्यालय भाजपाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे व नवी मुंबईतील जनतेचे आहे. येथे सामान्यांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल. फक्त बेलापुरच नाही तर प्रत्येक तालुका स्तरावर कार्यालय असले पाहिजे. प्रत्येक वार्डामध्ये कार्यालय असले पाहिजे. या कार्यालयांमध्ये जनतेचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. लोकसभा निवडणुकीमध्ये राहिलेल्या त्रुटी सुधारण्यावर भर द्या. विधानसभा व महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वांनी सज्ज रहावे. भारतीय जनता पक्षाला यश मिळवून द्यायचे आहे. कोरोनापासून आतापर्यंत ७९ वेळा महानगरपालिका आयुक्तांच्या भेटी घेवून जनतेचे प्रश्न सोडविले. आता संपूर्ण शहरभर जनसंवाद कार्यक्रम राबविण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला.

 भाजपा जिल्हा अध्यक्ष संदीप नाईक यांनीही सीबीडीमध्ये महानगरपालिका, सिडको, कोकणभवन, पोलीस आयुक्तालय ही कार्यालये असून हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे येथे कार्यालय सुरू केले आहे. गणेश नाईक यांचे नेतृत्व व मार्गदर्शनाखाली ३६५ दिवस या कार्यालयात जनतेचे प्रश्न सोडविले जातील. भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी व संपूर्ण नवी मुंबईकरांसाठी हे कार्यालय उपलब्ध असणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी माजी खासदार संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक, जे. डी. सुतार, अनंत सुतार, नेत्रा शिर्के, रविंद्र इथापे व पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यकर्त्यांमध्ये आमचं ठरलंय अशी चर्चा-

कार्यालय उद्धाटन प्रसंगी भाजपाच्या माजी नगरसेवकांनी आमचं ठरलय आता आमच्या हक्काचा आमदार हवा अशा प्रतिक्रिया व्यक्त करण्यास सुरुवात केली होती. बेलापूर मतदार संघात संदीप नाईक तयारी करत असल्याच्या चर्चाही सुरू होत्या. याविषयी गणेश नाईक यांना विचारले असता मी ऐरोलीचे प्रतिनिधीत्व करत आहे. पक्षाने ठरवले तर तेथून लढेल. पक्षाने दुसऱ्या कोणाला संधी दिली तरी स्वागत असेल. बेलापूरमध्येही कोणी उभे रहायचे हे पक्ष ठरवेल असे सांगून या मुद्याला व चर्चेला बगल दिली. संदीप नाईक यांनीही याविषयी भाष्य टाळले व आमचं ठरलय शहराचा विकास एवढीच प्रतिक्रिया दिली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024