शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

नवी मुंबईत ३८ टन निर्माल्यातून खत निर्मिती; सामाजिक संस्थांकडून तीन ठिकाणी निर्माल्यावर प्रक्रिया

By नामदेव मोरे | Updated: September 12, 2022 18:26 IST

नवी मुंबईत ३८ टन निर्माल्यातून खत निर्मिती करण्यात आली आहे. 

मुंबई : गणेशोत्सवात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने विविध उपक्रम राबविले होते. विसर्जन तलावांवर निर्माल्य संकलन व त्याची वाहतूक करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी केली केली होती. दहा दिवसामध्ये ३८.७९ टन निर्माल्य संकलीत झाले असून त्यामधून तुर्भेमध्ये खतनिर्मीती केली जाणार आहे. याशिवाय सामाजिक संस्थांच्या माध्यमातून तीन ठिकाणी खतनिर्मीती करण्यात येणार आहे.

विसर्जनाच्यावेळी निर्माल्य तलावांमध्ये टाकून जलप्रदुषण केले जाऊ नये यासाठी महानगरपालिकेने काटेकोरपणे उपाययोजना केल्या होत्या. २२ नैसर्गिक तलाव व १३४ कृत्रीम तलावांवर ओले व सुके निर्माल्य संकलीत करण्यासाठी व्यवस्था केली होती. संपूर्ण शहरात निर्माल्य वाहतुकीसाठी ४० स्वतंत्र वाहनांची व्यवस्था केली होती. शहरात दिड दिवसाच्या विसर्जनाच्यादिवशी ६ टन, पाचव्या दिवशी ५.६९ टन, गौरी विसर्जनाच्या दिवशी १२.५७ टन, सातव्या दिवशी ४.५७ टन व दहाव्या दिवशी ९.८८ टन असे एकूण ३८.७९ टन निर्माल्य संकलीत झाले आहे. यामध्ये फुले, दुर्वा, पुष्पमाळा, शमी, फळांच्या साली यांचा समावेश आहे. तुर्भे येथील मनपाच्या कचराभुमीवर त्यावर प्रक्रिया करून खतनिर्मीती केली जाणार आहे. 

कृत्रीम तलावांना नागरिकांचा चांगला प्रतिसादशहरातील उद्याने व इतर ठिकाणी या खताचा उपयोग केला जाणार आहे. याशिवाय अंकुर सामाजिक संस्थेच्या माध्यमातून चिंचोली व करावे तलाव, नानासाहेब धर्माधीकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून कोपरखैरणे येथे निर्माल्यातून कचरा निर्मीती केली जात आहे. महानगरपालिकेने तयार केलेल्या कृत्रीम तलावांनाही नागरिकांनी प्रतिसाद दिला. या तलावांमध्ये १५ हजार पेक्षा जास्त श्रीमुर्तींचे विसर्जन करण्यात आले. विसर्जनाच्यावेळी संकलीत झालेली फळे व इतर प्रसादांंचे निराधार, गरजू नागरिकांना वितरण करण्यात आले आहेत.

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाGanesh Mahotsavगणेशोत्सव