शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

सुधारित धोरण झोपडीमाफियांच्या पथ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 07:04 IST

राज्य सरकारने २०११पर्यंतच्या झोपड्यांना अभय देण्याचे सुधारित धोरण जाहीर केले आहे. राज्य सरकारचा हा निर्णय २०००नंतर उभारलेल्या हजारो झोपडीधारकांच्या पथ्यावर पडला आहे. विशेष म्हणजे, मागील दहा वर्षांत नवी मुंबईत बेकायदा झोपड्यांचे पेव फुटले आहेत.

नवी मुंबई  - राज्य सरकारने २०११पर्यंतच्या झोपड्यांना अभय देण्याचे सुधारित धोरण जाहीर केले आहे. राज्य सरकारचा हा निर्णय २०००नंतर उभारलेल्या हजारो झोपडीधारकांच्या पथ्यावर पडला आहे. विशेष म्हणजे, मागील दहा वर्षांत नवी मुंबईत बेकायदा झोपड्यांचे पेव फुटले आहेत. राज्य सरकारच्या सुधारित धोरणांचा लाभ आता या झोपड्यांनाही मिळणार आहे, असे असले तरी पात्र झोपड्यांचे नव्याने सर्वेक्षण करण्याची जबाबदारी महापालिकेला पार पाडावी लागणार आहे.महापालिकेने २००१मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार शहरात सुमारे ४२ हजार झोपड्या आहेत. यापैकी सन २०००पर्यंतच्या झोपड्यांना अभय देण्याचे राज्य सरकारचे जुने धोरण होते. एसआरए योजनेअंतर्गत या झोपड्यांचे पुनर्वसन करण्यासंदर्भातील महापालिकेचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पडून आहे; परंतु आता झोपड्यांसाठी नवीन धोरण जाहीर झाल्याने हा प्रस्ताव कायमस्वरूपी बारगळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.शहरात बेकायदा झोपड्या उभारून त्याची अल्पदरात विक्री करण्याचा गोरखधंदा तेजीत सुरू आहे. विशेषत: ऐरोली, दिघा, चिंचपाडा, यादवनगर, महापे, तुर्भे आदी एमआयडीसी परिसरात मागील काही वर्षांत मोठ्या प्रमाणात नवीन झोपड्या उभारल्या आहेत.पूर्वी राज्य सरकारने १९९५पर्यंतच्या झोपड्यांना अभय दिले होते. त्यानंतर २०००पर्यंतच्या झोपड्यांना अभय देण्याचे सुधारित धोरण जाहीर करण्यात आले. आता २०११पर्यंतच्या झोपड्यांना अभय देण्याचे सुधारित धोरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार झोपडीधारकांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकूल देण्याची शासनाची योजना आहे. असे असले तरी या योजनेच्या अंमलबजावणीबाबत जाणकारांत संभ्रमाचे वातावरण आहे. त्या-त्या वेळी धोरण राबवून झोपड्यांचे पुनर्वसन केले असते, तर वेळोवेळी या धोरणात बदल करण्याची आवश्यकता भासली नसती, असे जाणकारांचे म्हणणे आहे. केवळ झोपडीधारकांच्या मतावर डोळा ठेवून हा निर्णय घेतला असल्याचा आरोप केला जात आहे.एमआयडीसीच्या जागेवर सर्वाधिक झोपड्यामहापालिका हद्दीत सिडको, एमआयडीसी आणि शासकीय जमिनीवर झोपडपट्ट्यांचा विस्तार झालेला आहे. महापालिकेने सन २००१मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार शहरात ४१ हजार ८०५ झोपड्या आहेत. यापैकी १९९५ पूर्वीच्या पात्र ठरलेल्या १९,०८९ झोपड्या आहेत. तर अपात्र ठरलेल्या झोपड्यांची संख्या २२,७१६ आहे. शहरातील एकूण झोपड्यांपैकी सर्वाधिक झोपड्या एमआयडीसीच्या जागेवर आहेत. मागील दहा वर्षांत यात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईnewsबातम्या