शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
3
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
4
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
5
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
6
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
7
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
8
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
9
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
10
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
11
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
12
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
14
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
15
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
16
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
17
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
18
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
19
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
20
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'

सुधारित धोरण झोपडीमाफियांच्या पथ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 07:04 IST

राज्य सरकारने २०११पर्यंतच्या झोपड्यांना अभय देण्याचे सुधारित धोरण जाहीर केले आहे. राज्य सरकारचा हा निर्णय २०००नंतर उभारलेल्या हजारो झोपडीधारकांच्या पथ्यावर पडला आहे. विशेष म्हणजे, मागील दहा वर्षांत नवी मुंबईत बेकायदा झोपड्यांचे पेव फुटले आहेत.

नवी मुंबई  - राज्य सरकारने २०११पर्यंतच्या झोपड्यांना अभय देण्याचे सुधारित धोरण जाहीर केले आहे. राज्य सरकारचा हा निर्णय २०००नंतर उभारलेल्या हजारो झोपडीधारकांच्या पथ्यावर पडला आहे. विशेष म्हणजे, मागील दहा वर्षांत नवी मुंबईत बेकायदा झोपड्यांचे पेव फुटले आहेत. राज्य सरकारच्या सुधारित धोरणांचा लाभ आता या झोपड्यांनाही मिळणार आहे, असे असले तरी पात्र झोपड्यांचे नव्याने सर्वेक्षण करण्याची जबाबदारी महापालिकेला पार पाडावी लागणार आहे.महापालिकेने २००१मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार शहरात सुमारे ४२ हजार झोपड्या आहेत. यापैकी सन २०००पर्यंतच्या झोपड्यांना अभय देण्याचे राज्य सरकारचे जुने धोरण होते. एसआरए योजनेअंतर्गत या झोपड्यांचे पुनर्वसन करण्यासंदर्भातील महापालिकेचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पडून आहे; परंतु आता झोपड्यांसाठी नवीन धोरण जाहीर झाल्याने हा प्रस्ताव कायमस्वरूपी बारगळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.शहरात बेकायदा झोपड्या उभारून त्याची अल्पदरात विक्री करण्याचा गोरखधंदा तेजीत सुरू आहे. विशेषत: ऐरोली, दिघा, चिंचपाडा, यादवनगर, महापे, तुर्भे आदी एमआयडीसी परिसरात मागील काही वर्षांत मोठ्या प्रमाणात नवीन झोपड्या उभारल्या आहेत.पूर्वी राज्य सरकारने १९९५पर्यंतच्या झोपड्यांना अभय दिले होते. त्यानंतर २०००पर्यंतच्या झोपड्यांना अभय देण्याचे सुधारित धोरण जाहीर करण्यात आले. आता २०११पर्यंतच्या झोपड्यांना अभय देण्याचे सुधारित धोरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार झोपडीधारकांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकूल देण्याची शासनाची योजना आहे. असे असले तरी या योजनेच्या अंमलबजावणीबाबत जाणकारांत संभ्रमाचे वातावरण आहे. त्या-त्या वेळी धोरण राबवून झोपड्यांचे पुनर्वसन केले असते, तर वेळोवेळी या धोरणात बदल करण्याची आवश्यकता भासली नसती, असे जाणकारांचे म्हणणे आहे. केवळ झोपडीधारकांच्या मतावर डोळा ठेवून हा निर्णय घेतला असल्याचा आरोप केला जात आहे.एमआयडीसीच्या जागेवर सर्वाधिक झोपड्यामहापालिका हद्दीत सिडको, एमआयडीसी आणि शासकीय जमिनीवर झोपडपट्ट्यांचा विस्तार झालेला आहे. महापालिकेने सन २००१मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार शहरात ४१ हजार ८०५ झोपड्या आहेत. यापैकी १९९५ पूर्वीच्या पात्र ठरलेल्या १९,०८९ झोपड्या आहेत. तर अपात्र ठरलेल्या झोपड्यांची संख्या २२,७१६ आहे. शहरातील एकूण झोपड्यांपैकी सर्वाधिक झोपड्या एमआयडीसीच्या जागेवर आहेत. मागील दहा वर्षांत यात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईnewsबातम्या