शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

वाहतूकदारांच्या आंदोलनाचा जेएनपीटीवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 05:57 IST

देशभरातील वाहतूकदारांनी विविध मागण्यांसाठी शुक्रवार (२०)पासून बेमुदत सुरू केलेल्या चक्काजाम आंदोलनात जेएनपीटी बंदरातील ट्रान्सपोर्टरही सहभागी झाले आहेत.

उरण : देशभरातील वाहतूकदारांनी विविध मागण्यांसाठी शुक्रवार (२०)पासून बेमुदत सुरू केलेल्या चक्काजाम आंदोलनात जेएनपीटी बंदरातील ट्रान्सपोर्टरही सहभागी झाले आहेत. त्यामुळे जेएनपीटी बंदरातील आयात-निर्यात वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला असून, दररोज बंदरातून मालवाहतूक करणारी आठ ते दहा हजार वाहने रस्त्यावर धावलीच नसल्याची माहिती महाराष्टÑ राज्य हेवी वेहिकल स्टेट ट्रान्सपोर्टर असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पैठणकर यांनी दिली. मात्र, जेएनपीटी बंदरातील मालवाहतूक नेहमीप्रमाणेच सुरळीत सुरू असल्याचा दावा जेएनपीटी प्रशासनाकडून केला जात आहे.वाहतूकदारांना व्यवसायात अडचणीचे ठरणारे डीपीडी धोरण रद्द करा, जीएसटीअंतर्गत डिझेल दरवाढ कमी करण्यात यावी, राज्याचा टोल आणि सेस कमी करा आदी विविध मागण्या देशभरातील वाहतूकदारांच्या आहेत. दरवर्षी २०० क ोटींपेक्षा जास्त महसूल वाहतूकदारांकडून मिळत असताना त्यांच्या वाजवी मागण्यांची पूर्तता करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याने देशभरातील देशव्यापी चक्काजाम आंदोलनाला सुरुवात केली आहे.आंदोलनात जेएनपीटी बंदरात कंटेनर मालाची वाहतूक करणाऱ्या मालवाहू संघटनाही उतरल्या आहेत. दररोज जेएनपीटी आणि अंतर्गत असलेल्या अन्य चारही बंदरांतून सुमारे आठ ते दहा हजार वाहने कंटेनर मालाची वाहतूक करतात. मात्र, जेएनपीटी बंदरात कंटेनर मालाची वाहतूक करणाºया विविध वाहतूक संघटना आंदोलनात सहभागी झाल्याने बंदरातील मालाची वाहतूक रोडावली आहे. मात्र, जेएनपीटी बंदरातील कंटेनर मालवाहतूक नेहमीप्रमाणेच सुरळीत सुरू असल्याचा दावा जेएनपीटी प्रशासनाने केला आहे.>संपाला नवी मुंबईत संमिश्र प्रतिसादवाहतूकदारांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाला नवी मुंबईमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजी मार्केटमधील व्यवहार सुरळीत होते. इतर मार्केटमधील व्यवहारांवर परिणाम झाला होता. एमआयडीसी व इतर ठिकाणी अवजड वाहतूक बंद होती.बंदनंतरही बाजार समितीच्या पाच मार्केटमध्ये दिवसभरामध्ये तब्बल १७३९ ट्रक, टेम्पोमधून कृषी मालाची आवक झाली होती. मार्केटमधून मुंबईमध्ये माल घेऊन जाणाºया वाहतुकीवर परिणाम झाला होता. एमआयडीसी व इतर ठिकाणच्या मालवाहतुकीवर परिणाम झाल्याचे चित्र होते. पनवेल परिसरातील माल वाहतूकही बंदमुळे ठप्प झाली होती. पाच हजारांपेक्षा जास्त अवजड वाहने कळंबोली व इतर ठिकाणी दिवसभर उभी असल्याचे चित्र दिसत होते.